शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : सभापतींना गढूळ पाणी भेट, ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 16:36 IST

तेरवण-मेढे रामघाट धनगरवाडीतील पाणीटंचाईकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबित चक्क पंचायत समितीच्या सभापतींनाच गढूळ पाणी बाटलीत भरून भेट दिले. या अनोख्या आंदोलनामुळे खडबडून जागे झालेले प्रशासन मंगळवारी उशिरा तेरवण-मेढेत पाहणीसाठी रवाना झाले.

ठळक मुद्देसभापतींना गढूळ पाणी भेट, ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन तेरवण-मेढे धनगरवाडीतील पाणीटंचाईकडे दुर्लक्ष

दोडामार्ग : तेरवण-मेढे रामघाट धनगरवाडीतील पाणीटंचाईकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबित चक्क पंचायत समितीच्या सभापतींनाच गढूळ पाणी बाटलीत भरून भेट दिले. या अनोख्या आंदोलनामुळे खडबडून जागे झालेले प्रशासन मंगळवारी उशिरा तेरवण-मेढेत पाहणीसाठी रवाना झाले.तेरवण-मेढे ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात रामघाट धनगरवाडी येते. याठिकाणच्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची योग्य ती सुविधा नाही. त्यामुळे एका डबक्यातील पाण्याचा आधार पिण्याच्या पाण्यासाठी घ्यावा लागतो. परिणामी या पाणीटंचाईच्या समस्येवर योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तेरवण-मेढेचे सरपंच प्रवीण गवस यांनीदेखील पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधले होते.मात्र, पाणीटंचाईच्या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. रामघाट धनगरवाडीत पिण्याच्या पाण्याची दुसरी कोणतीच सोय नसल्याने ऐन उन्हाळ्यात येथील डबक्यातील पाण्याची पातळी खालावल्याने पाणी गढूळ बनले आहे. हेच पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरीत आहेत. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.परिणामी झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी मंगळवारी ग्रामस्थांनी गांधीगिरी करीत चक्क गढूळ पाणी बाटलीत भरून सभापती नाईक यांना भेट दिले. त्यामुळे पंचायत समिती प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सभापती गणपत नाईक, तहसीलदार रोहिणी रजपूत व पंचायत समितीचे अधिकारी तातडीने तेरवण-मेढेत प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी रवाना झाले होते. यावेळी ग्रामस्थ महेश काळे, बबन जंगले आदी उपस्थित होते.तडफडून मेल्यावर प्रशासन जागे होणार का?पाणीटंचाईकडे संबंधित विभागाचे वारंवार लक्ष वेधूनही विभागाचे दुर्लक्ष झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी गढूळ पाणी सभापती गणपत नाईक यांना देऊन संताप व्यक्त केला. हे गढूळ पाणी पिऊन ग्रामस्थ तडफडून मेल्यावर प्रशासन जागे होणार का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणी