शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सिंधुदुर्ग : सभापतींना गढूळ पाणी भेट, ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 16:36 IST

तेरवण-मेढे रामघाट धनगरवाडीतील पाणीटंचाईकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबित चक्क पंचायत समितीच्या सभापतींनाच गढूळ पाणी बाटलीत भरून भेट दिले. या अनोख्या आंदोलनामुळे खडबडून जागे झालेले प्रशासन मंगळवारी उशिरा तेरवण-मेढेत पाहणीसाठी रवाना झाले.

ठळक मुद्देसभापतींना गढूळ पाणी भेट, ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन तेरवण-मेढे धनगरवाडीतील पाणीटंचाईकडे दुर्लक्ष

दोडामार्ग : तेरवण-मेढे रामघाट धनगरवाडीतील पाणीटंचाईकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबित चक्क पंचायत समितीच्या सभापतींनाच गढूळ पाणी बाटलीत भरून भेट दिले. या अनोख्या आंदोलनामुळे खडबडून जागे झालेले प्रशासन मंगळवारी उशिरा तेरवण-मेढेत पाहणीसाठी रवाना झाले.तेरवण-मेढे ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात रामघाट धनगरवाडी येते. याठिकाणच्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची योग्य ती सुविधा नाही. त्यामुळे एका डबक्यातील पाण्याचा आधार पिण्याच्या पाण्यासाठी घ्यावा लागतो. परिणामी या पाणीटंचाईच्या समस्येवर योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तेरवण-मेढेचे सरपंच प्रवीण गवस यांनीदेखील पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधले होते.मात्र, पाणीटंचाईच्या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. रामघाट धनगरवाडीत पिण्याच्या पाण्याची दुसरी कोणतीच सोय नसल्याने ऐन उन्हाळ्यात येथील डबक्यातील पाण्याची पातळी खालावल्याने पाणी गढूळ बनले आहे. हेच पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरीत आहेत. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.परिणामी झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी मंगळवारी ग्रामस्थांनी गांधीगिरी करीत चक्क गढूळ पाणी बाटलीत भरून सभापती नाईक यांना भेट दिले. त्यामुळे पंचायत समिती प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सभापती गणपत नाईक, तहसीलदार रोहिणी रजपूत व पंचायत समितीचे अधिकारी तातडीने तेरवण-मेढेत प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी रवाना झाले होते. यावेळी ग्रामस्थ महेश काळे, बबन जंगले आदी उपस्थित होते.तडफडून मेल्यावर प्रशासन जागे होणार का?पाणीटंचाईकडे संबंधित विभागाचे वारंवार लक्ष वेधूनही विभागाचे दुर्लक्ष झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी गढूळ पाणी सभापती गणपत नाईक यांना देऊन संताप व्यक्त केला. हे गढूळ पाणी पिऊन ग्रामस्थ तडफडून मेल्यावर प्रशासन जागे होणार का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणी