शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

सिंधुदुर्ग : सभापतींना गढूळ पाणी भेट, ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 16:36 IST

तेरवण-मेढे रामघाट धनगरवाडीतील पाणीटंचाईकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबित चक्क पंचायत समितीच्या सभापतींनाच गढूळ पाणी बाटलीत भरून भेट दिले. या अनोख्या आंदोलनामुळे खडबडून जागे झालेले प्रशासन मंगळवारी उशिरा तेरवण-मेढेत पाहणीसाठी रवाना झाले.

ठळक मुद्देसभापतींना गढूळ पाणी भेट, ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन तेरवण-मेढे धनगरवाडीतील पाणीटंचाईकडे दुर्लक्ष

दोडामार्ग : तेरवण-मेढे रामघाट धनगरवाडीतील पाणीटंचाईकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबित चक्क पंचायत समितीच्या सभापतींनाच गढूळ पाणी बाटलीत भरून भेट दिले. या अनोख्या आंदोलनामुळे खडबडून जागे झालेले प्रशासन मंगळवारी उशिरा तेरवण-मेढेत पाहणीसाठी रवाना झाले.तेरवण-मेढे ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात रामघाट धनगरवाडी येते. याठिकाणच्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची योग्य ती सुविधा नाही. त्यामुळे एका डबक्यातील पाण्याचा आधार पिण्याच्या पाण्यासाठी घ्यावा लागतो. परिणामी या पाणीटंचाईच्या समस्येवर योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तेरवण-मेढेचे सरपंच प्रवीण गवस यांनीदेखील पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधले होते.मात्र, पाणीटंचाईच्या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. रामघाट धनगरवाडीत पिण्याच्या पाण्याची दुसरी कोणतीच सोय नसल्याने ऐन उन्हाळ्यात येथील डबक्यातील पाण्याची पातळी खालावल्याने पाणी गढूळ बनले आहे. हेच पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरीत आहेत. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.परिणामी झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी मंगळवारी ग्रामस्थांनी गांधीगिरी करीत चक्क गढूळ पाणी बाटलीत भरून सभापती नाईक यांना भेट दिले. त्यामुळे पंचायत समिती प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सभापती गणपत नाईक, तहसीलदार रोहिणी रजपूत व पंचायत समितीचे अधिकारी तातडीने तेरवण-मेढेत प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी रवाना झाले होते. यावेळी ग्रामस्थ महेश काळे, बबन जंगले आदी उपस्थित होते.तडफडून मेल्यावर प्रशासन जागे होणार का?पाणीटंचाईकडे संबंधित विभागाचे वारंवार लक्ष वेधूनही विभागाचे दुर्लक्ष झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी गढूळ पाणी सभापती गणपत नाईक यांना देऊन संताप व्यक्त केला. हे गढूळ पाणी पिऊन ग्रामस्थ तडफडून मेल्यावर प्रशासन जागे होणार का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणी