शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिंधुदुर्ग : आंबा, काजू बागेला आग लागून नुकसान, एक लाखाची हानी, नाटळ-हुमलेटेंब येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 16:20 IST

नाटळ-हुमलेटेंबवाडी येथील शेतकरी प्रभाकर भोगले यांच्या तीन एकर बागेला अचानक आग लागल्याने त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबतचा पंचनामा तलाठ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. भोगले यांनी हुमलेटेंबवाडी येथे तीन एकर जमिनीत काजू कलमे, हापूस आंबा कलमे तसेच इतर जंगली झाडे लावली होती.

ठळक मुद्देआंबा, काजू बागेला आग लागून नुकसानएक लाखाची हानी, नाटळ-हुमलेटेंब येथील घटनावीज कंपनीने तारांची दुरूस्ती करण्याची मागणी

कनेडी : नाटळ-हुमलेटेंबवाडी येथील शेतकरी प्रभाकर भोगले यांच्या तीन एकर बागेला अचानक आग लागल्याने त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबतचा पंचनामा तलाठ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.भोगले यांनी हुमलेटेंबवाडी येथे तीन एकर जमिनीत काजू कलमे, हापूस आंबा कलमे तसेच इतर जंगली झाडे लावली होती. त्यांच्या बागेला अचानक आग लागल्याने आंबा, काजू व जंगली झाडे जळून खाक झाली आहेत. काही आंबा कलमे ही गेल्यावर्षी लावलेली होती तर काही कलमे ही अनेक वर्षांपूर्वीची होती.

त्या बागेच्या मध्यावरून वीज वितरणच्या वीजवाहिन्या गेल्या आहेत. त्या वाहिन्या काही ठिकाणी एकमेकांच्या जवळ आल्याने वादळात चिकटत असलेल्या दिसत आहेत. प्रथमदर्शनी या वाहिन्या चिकटल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे दिसत आहे.वीज कंपनीने तारांची दुरूस्ती करण्याची मागणीया आगीला सुरुवात विद्युत तारा चिकटलेल्या ठिकाणीच झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पावसाळ््यातही याठिकाणच्या विद्युत तारा एकमेकांना चिकटतात आणि याचा परिणाम म्हणून गावाचा वीजपुरवठा खंडित होतो. वीज वितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार सांगूनही याबाबतची दखल घेतली जात नाही.

दखल वेळीच घेतली असती तर हा प्रसंग घडलाच नसता. याठिकाणी विद्युत तारा या ग्रामस्थांच्या डोक्याला टेकतील एवढ्या खाली आल्या आहेत. त्या पूर्वस्थितीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी वीज वितरणकडे केली आहे. तसे न झाल्यास वीज वितरणविरूद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग