शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सिंधुदुर्ग : आंबा, काजू बागेला आग लागून नुकसान, एक लाखाची हानी, नाटळ-हुमलेटेंब येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 16:20 IST

नाटळ-हुमलेटेंबवाडी येथील शेतकरी प्रभाकर भोगले यांच्या तीन एकर बागेला अचानक आग लागल्याने त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबतचा पंचनामा तलाठ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. भोगले यांनी हुमलेटेंबवाडी येथे तीन एकर जमिनीत काजू कलमे, हापूस आंबा कलमे तसेच इतर जंगली झाडे लावली होती.

ठळक मुद्देआंबा, काजू बागेला आग लागून नुकसानएक लाखाची हानी, नाटळ-हुमलेटेंब येथील घटनावीज कंपनीने तारांची दुरूस्ती करण्याची मागणी

कनेडी : नाटळ-हुमलेटेंबवाडी येथील शेतकरी प्रभाकर भोगले यांच्या तीन एकर बागेला अचानक आग लागल्याने त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबतचा पंचनामा तलाठ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.भोगले यांनी हुमलेटेंबवाडी येथे तीन एकर जमिनीत काजू कलमे, हापूस आंबा कलमे तसेच इतर जंगली झाडे लावली होती. त्यांच्या बागेला अचानक आग लागल्याने आंबा, काजू व जंगली झाडे जळून खाक झाली आहेत. काही आंबा कलमे ही गेल्यावर्षी लावलेली होती तर काही कलमे ही अनेक वर्षांपूर्वीची होती.

त्या बागेच्या मध्यावरून वीज वितरणच्या वीजवाहिन्या गेल्या आहेत. त्या वाहिन्या काही ठिकाणी एकमेकांच्या जवळ आल्याने वादळात चिकटत असलेल्या दिसत आहेत. प्रथमदर्शनी या वाहिन्या चिकटल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे दिसत आहे.वीज कंपनीने तारांची दुरूस्ती करण्याची मागणीया आगीला सुरुवात विद्युत तारा चिकटलेल्या ठिकाणीच झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पावसाळ््यातही याठिकाणच्या विद्युत तारा एकमेकांना चिकटतात आणि याचा परिणाम म्हणून गावाचा वीजपुरवठा खंडित होतो. वीज वितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार सांगूनही याबाबतची दखल घेतली जात नाही.

दखल वेळीच घेतली असती तर हा प्रसंग घडलाच नसता. याठिकाणी विद्युत तारा या ग्रामस्थांच्या डोक्याला टेकतील एवढ्या खाली आल्या आहेत. त्या पूर्वस्थितीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी वीज वितरणकडे केली आहे. तसे न झाल्यास वीज वितरणविरूद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग