शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलची निवडणूक लढविणार : नार्वेकर, जिल्ह्यातील असोसिएशनचा आपल्याला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 18:00 IST

महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या पंचवार्षिक निवडणुकीत मार्च २०१८ मध्ये होऊ घातली आहे. ही निवडणूक सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन लढविणार असून कोकणसह जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी अ‍ॅड. संग्राम देसाई यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले असून तसा ठरावही बैठकीत घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील असोसिएशनचा आपल्याला पाठिंबा महाराष्ट्र आणि गोवा राज्यात बार कौन्सिलचे एकूण १ लाख २३ हजार मतदार निवडणुकीतून २५ उमेदवार निवडले जाणार संग्राम देसाई सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उमेदवार

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या पंचवार्षिक निवडणुकीत मार्च २०१८ मध्ये होऊ घातली आहे. ही निवडणूक सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन लढविणार असून कोकणसह जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी अ‍ॅड. संग्राम देसाई यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले असून तसा ठरावही बैठकीत घेण्यात आला आहे.कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असोसिएशनचा आपल्याला पाठिंबा असल्याची माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.महाराष्ट्र आणि गोवा राज्यात बार कौन्सिलचे एकूण १ लाख २३ हजार एवढे मतदार आहेत. या निवडणुकीतून २५ उमेदवार निवडले जाणार आहेत. ही निवडणूक आतापर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही उमेदवाराने लढविलेली नाही.

सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येथील उमेदवार देण्याचा व निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सर्वानुमते अ‍ॅड. संग्राम देसाई यांना उमेदवारी निश्चित करून भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनी दिली.यावेळी असोसिएशनचे अ‍ॅड. राजेंद्र रावराणे, अ‍ॅड. वीरेश नाईक, अ‍ॅड. संग्राम देसाई, अ‍ॅड. अनीश केसरकर, अ‍ॅड. अमोल सामंत, अ‍ॅड. यतीश खानोलकर, अ‍ॅड. वीरेश राऊळ, अ‍ॅड. गोविंद बांदेकर, अ‍ॅड. सुहास साटम आदि उपस्थित होते.संग्राम देसाई सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उमेदवारबार कौन्सिल आॅफ गोवा, महाराष्ट्रची निवडणूक मार्च २0१८ मध्ये होऊ घातली आहे. २५ सदस्य पदांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आतापर्यत सिंधुदुर्गातून कोणीही रिंगणात उतरला नाही. मात्र, यावेळी जिल्ह्यासह कोकणचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी सिंधुदुर्गातून उमेदवार देण्याचा निर्णय बार असोसिएशनने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातून अ‍ॅड. संग्राम देसाई यांना पाठिंबा देत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.र्रल्लँि४स्रँङ्म३ङ्म-02

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गadvocateवकिल