शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

सिंधुदुर्ग : परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान, शेतकरी पुरते संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 15:15 IST

सिंधुदुर्ग जिल्हयात पावसा अभावी व परतीच्या पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याअनुषंगाने कृषी विभागाने नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामा करावा अशा सूचना उपाध्यक्ष तथा कृषी सभापती रणजित देसाई यांनी अधिका-यांना दिल्या.

ठळक मुद्दे परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान, शेतकरी पुरते संकटात नुकसानभरपाई मिळण्यासाठी कृषी समिती सभेत ठराव

सिंधुदुर्गनगरी : जिल्हयात पावसा अभावी व परतीच्या पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पुरते संकटात सापडले असून त्यांना भातशेतीची नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे.त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या कृषी विभागाने नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामा करावा अशा सूचना उपाध्यक्ष तथा कृषी सभापती रणजित देसाई यांनी अधिका-यांना दिल्या.शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी असा ठरावही सभागृहात घेण्यात आला.जिल्हा परिषद कृषी समितीची मासिक सभा उपाध्यक्ष तथा समिती सभापती रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ नाथ पै सभागृहात पार पडली.यावेळी समिती सचिव तथा कृषी विकास अधिकारी सुधीर चव्हाण, सदस्य महेंद्र चव्हाण, संजना सावंत, समिधा नाईक, वर्षा पवार, गणेश राणे, संजय देसाई, सुधीर नकाशे अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्ह्यात सप्टेंबर महिना कोरडा गेल्याने भरड शेतीला पाण्याअभावी फटका बसला आहे. तर गेले आठ दिवस परतीच्या पावसाने शेतीची दाणादाण उडवली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एकतर यावर्षी भातपिकाचे उत्पन्न अतिषय नगण्य मिळणार असतानाच परतीच्या पावसामुळे त्यात आणखीन घट होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. यापार्श्वभुमीवर या शेतक-यांना प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे.अशी सविस्तर चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली.राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या कामकाजावर नाराजराज्य शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सत्यवान परब यांनी अर्ज केला होता. मात्र त्यांचा अर्ज कार्यालयातून गहाळ झाला. याला कृषी अधीक्षक विभाग जबाबदार असून परब नामक लाभार्थ्यांना तत्काळ योजनेचा लाभ द्यावा अशी मागील सभेत सुचना करून सुद्धा एक महिना झाला तरी या विभागाने त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही .यावरून समिती सदस्य संजय देसाई व सुधीर नकाशे यांनी कृषी अधीक्षक विभागावर आरोप करीत अधिका-यांना धारेवर धरले.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग