शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग काजूप्रधान करा, उदय चौधरी यांचे आवाहन : कुडाळ येथील सिंधु महोत्सवात काजू परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 15:39 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ६० हजार एकर पडीक जमीन आहे. या जमिनीवर मोठ्या प्रमाणात काजू लागवड करून जिल्ह्याची कृषी अर्थव्यवस्था काजूप्रधान बनवा, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कुडाळ येथील सिंधु कृषी व पर्यटन महोत्सवात केले. काजू पीक हे भविष्यकाळ उज्ज्वल करणारे पीक असून, हे पीक जिल्ह्यात प्रथम स्थानावर येण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

ठळक मुद्दे कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व कृषी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आयोजित काजू परिषदसिंधु कृषी औद्योगिक पशुपक्षी, मत्स्य व्यवसाय व पर्यटन महोत्सवकाजू भविष्यकाळ उज्ज्वल करणारे पीक पीक जिल्ह्यात प्रथम स्थानावर येण्यासाठी प्रयत्न करा

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ६० हजार एकर पडीक जमीन आहे. या जमिनीवर मोठ्या प्रमाणात काजू लागवड करून जिल्ह्याची कृषी अर्थव्यवस्था काजूप्रधान बनवा, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कुडाळ येथील सिंधु कृषी व पर्यटन महोत्सवात केले. काजू पीक हे भविष्यकाळ उज्ज्वल करणारे पीक असून, हे पीक जिल्ह्यात प्रथम स्थानावर येण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व कृषी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या सिंधु कृषी औद्योगिक पशुपक्षी, मत्स्य व्यवसाय व पर्यटन महोत्सवामध्ये जिल्हा परिषद व जिल्हा बँक यांच्यावतीने आयोजित काजू परिषदेत ते बोलत होते. या परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते झाले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, कुडाळ नगरपंचायत सभापती संध्या तेरसे, डॉ. प्रसाद देवधर, मार्गदर्शक योगेश परूळेकर, चंद्रशेखर देसाई, सुरेश बोवलेकर, विजय सावंत, राजाराम माळवणकर, बाळकृष्ण गाडगीळ, जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी अनिरूध्द देसाई आदी उपस्थित होते.चौधरी म्हणाले, संपूर्ण भारतात सर्वात जास्त काजू लागवड व काजू पीक घेणारा सिंधुदुर्ग जिल्हा असून या जिल्ह्याची कृषी व्यवस्था काजूप्रधान झाली पाहिजे. काजू पीक वाढल्यास भविष्यात दहा वर्षांत जिल्हा प्रगतीपथावर जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कमीत कमी खर्चात जास्त फायदा देणाऱ्या काजू पिकाकडे शेतकऱ्यांनी वळणे अत्यंत आवश्यक आहे. भारतात सर्वात जास्त काजूचे उत्पादन सिंधुदुर्गात होऊनही येथील कारखान्यांना केवळ ७० टक्केच काजू उपलब्ध होतो. त्यामुळे काजूची बाहेरच्या देशातून आयात करावी लागते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.जिल्ह्यात गेल्यावर्षी ६० हजार एकर पडीक जमीन होती. आता ती ५२ टक्क्यांपर्यंत राहिली आहे. आता या जिल्ह्यात पडीक जमीन हा शब्दच राहू नये, यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. गेली चार वर्षे सिंधु कृषी पशुपक्षी महोत्सवाचे नियोजनबद्धरित्या आयोजन करून शेती, बागायतदारांसाठी विविध योजना राबविणाऱ्या जिल्हा बँकेचे चौधरी यांनी अभिनंदन केले.

कमी व्याजदरात कर्ज देणार : सावंतकाजू पीक हे ऊस व इतर पिकांपेक्षा जास्त उत्पन्न देणारे आणि कोणत्याही प्रकारचा धोका नसलेले पीक आहे. जिल्ह्यात काजू लावगड करणाऱ्या बागायतदार व शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्यावतीने अल्प व्याज दराने कर्जपुरवठा करण्यात येईल, असे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले.काजू पीकच श्रेष्ठ : चौधरीसध्या शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पीक, फळे बाजारातील ग्राहकांपर्यंत घेऊन जावी लागत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात तोटाही सहन करावा लागत आहे. काजू असे पीक आहे की त्याची सहज आणि चांगल्या दराने विक्री होते. त्यामुळे काजू पीक श्रेष्ठ असल्याचे मत चौधरी यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गagricultureशेती