शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सिंधुदुर्ग : इन्सुलीत काजूबागेला आग, ६०० हून अधिक कलमे जळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 17:53 IST

मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या झाराप-पत्रादेवी बायपास महामार्गावरील इन्सुली-डोबवाडी येथे सोमवारी दुपारी भीषण आग लागून सुमारे १५ एकर क्षेत्रातील ६०० हून अधिक काजू कलमे खाक झाली. यामध्ये १० हून अधिक शेतकऱ्यांचे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देइन्सुलीत काजूबागेला आग, ६०० हून अधिक कलमे जळालीवीज कंपनीच्या भोंगळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका

सिंधुदुर्ग : मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या झाराप-पत्रादेवी बायपास महामार्गावरील इन्सुली-डोबवाडी येथे सोमवारी दुपारी भीषण आग लागून सुमारे १५ एकर क्षेत्रातील ६०० हून अधिक काजू कलमे खाक झाली. यामध्ये १० हून अधिक शेतकऱ्यांचे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सतत तीन वर्षे याठिकाणी वीज वितरण कंपनीच्या रोहित्रातून स्पार्किंग होऊन आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या भोंगळ काराभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शेतकऱ्यांनी याठिकाणी मेहनतीने काजू बागायती फुलविल्या आहेत. सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी असलेल्या रोहित्रामध्ये स्पार्किंग झाल्याने आग लागण्याची घटना घडली.

दुपारची वेळ असल्याने तसेच बागायतीमध्ये असलेल्या गवत व पालापाचोळयामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. आगीने झालेल्या धुरामुुळे महामार्गावरील वाहतुकही काही काळ खोळंबली होती.यामध्ये शेतकरी उल्हास नारायण सावंत, अशोक नारायण सावंत, रामचंद्र अंकुश सावंत, विजय पेंढुरकर, अशोक पेंढुरकर, आप्पा पेंढुरकर, अर्जुन पेंढुरकर, लाडशेट पेंढुरकर, आनंद पेंढुरकर, लक्ष्मण पेंढुरकर, अमित सावंत यांची सुमारे ६०० हूून अधिक काजू कलमे खाक झाली आहेत. यावेळी स्वागत नाटेकर, अमित सावंत, बाप्पल धुरी, भाऊ कुडव, गोट्या सावंत यांनी मदतकार्य केले.

शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकटआग लागल्याच्या ठिकाणी वस्ती नसल्याने आग लागल्याची माहिती उशिराने शेतकऱ्यांना समजली. मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्याने शेतकऱ्यांना आग आटोक्यात आणणे कठीण झाले. शेतकरी तसेच वाहनधारकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र १५ एकर क्षेत्रातील काजू बागायती पूर्णपणे खाक झाली. ऐन काजू हंगामात काजू बागायती जळाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग