शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सिंधुदुर्ग : इन्सुलीत काजूबागेला आग, ६०० हून अधिक कलमे जळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 17:53 IST

मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या झाराप-पत्रादेवी बायपास महामार्गावरील इन्सुली-डोबवाडी येथे सोमवारी दुपारी भीषण आग लागून सुमारे १५ एकर क्षेत्रातील ६०० हून अधिक काजू कलमे खाक झाली. यामध्ये १० हून अधिक शेतकऱ्यांचे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देइन्सुलीत काजूबागेला आग, ६०० हून अधिक कलमे जळालीवीज कंपनीच्या भोंगळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका

सिंधुदुर्ग : मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या झाराप-पत्रादेवी बायपास महामार्गावरील इन्सुली-डोबवाडी येथे सोमवारी दुपारी भीषण आग लागून सुमारे १५ एकर क्षेत्रातील ६०० हून अधिक काजू कलमे खाक झाली. यामध्ये १० हून अधिक शेतकऱ्यांचे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सतत तीन वर्षे याठिकाणी वीज वितरण कंपनीच्या रोहित्रातून स्पार्किंग होऊन आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या भोंगळ काराभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शेतकऱ्यांनी याठिकाणी मेहनतीने काजू बागायती फुलविल्या आहेत. सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी असलेल्या रोहित्रामध्ये स्पार्किंग झाल्याने आग लागण्याची घटना घडली.

दुपारची वेळ असल्याने तसेच बागायतीमध्ये असलेल्या गवत व पालापाचोळयामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. आगीने झालेल्या धुरामुुळे महामार्गावरील वाहतुकही काही काळ खोळंबली होती.यामध्ये शेतकरी उल्हास नारायण सावंत, अशोक नारायण सावंत, रामचंद्र अंकुश सावंत, विजय पेंढुरकर, अशोक पेंढुरकर, आप्पा पेंढुरकर, अर्जुन पेंढुरकर, लाडशेट पेंढुरकर, आनंद पेंढुरकर, लक्ष्मण पेंढुरकर, अमित सावंत यांची सुमारे ६०० हूून अधिक काजू कलमे खाक झाली आहेत. यावेळी स्वागत नाटेकर, अमित सावंत, बाप्पल धुरी, भाऊ कुडव, गोट्या सावंत यांनी मदतकार्य केले.

शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकटआग लागल्याच्या ठिकाणी वस्ती नसल्याने आग लागल्याची माहिती उशिराने शेतकऱ्यांना समजली. मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्याने शेतकऱ्यांना आग आटोक्यात आणणे कठीण झाले. शेतकरी तसेच वाहनधारकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र १५ एकर क्षेत्रातील काजू बागायती पूर्णपणे खाक झाली. ऐन काजू हंगामात काजू बागायती जळाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग