शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : इन्सुलीत काजूबागेला आग, ६०० हून अधिक कलमे जळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 17:53 IST

मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या झाराप-पत्रादेवी बायपास महामार्गावरील इन्सुली-डोबवाडी येथे सोमवारी दुपारी भीषण आग लागून सुमारे १५ एकर क्षेत्रातील ६०० हून अधिक काजू कलमे खाक झाली. यामध्ये १० हून अधिक शेतकऱ्यांचे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देइन्सुलीत काजूबागेला आग, ६०० हून अधिक कलमे जळालीवीज कंपनीच्या भोंगळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका

सिंधुदुर्ग : मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या झाराप-पत्रादेवी बायपास महामार्गावरील इन्सुली-डोबवाडी येथे सोमवारी दुपारी भीषण आग लागून सुमारे १५ एकर क्षेत्रातील ६०० हून अधिक काजू कलमे खाक झाली. यामध्ये १० हून अधिक शेतकऱ्यांचे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सतत तीन वर्षे याठिकाणी वीज वितरण कंपनीच्या रोहित्रातून स्पार्किंग होऊन आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या भोंगळ काराभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शेतकऱ्यांनी याठिकाणी मेहनतीने काजू बागायती फुलविल्या आहेत. सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी असलेल्या रोहित्रामध्ये स्पार्किंग झाल्याने आग लागण्याची घटना घडली.

दुपारची वेळ असल्याने तसेच बागायतीमध्ये असलेल्या गवत व पालापाचोळयामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. आगीने झालेल्या धुरामुुळे महामार्गावरील वाहतुकही काही काळ खोळंबली होती.यामध्ये शेतकरी उल्हास नारायण सावंत, अशोक नारायण सावंत, रामचंद्र अंकुश सावंत, विजय पेंढुरकर, अशोक पेंढुरकर, आप्पा पेंढुरकर, अर्जुन पेंढुरकर, लाडशेट पेंढुरकर, आनंद पेंढुरकर, लक्ष्मण पेंढुरकर, अमित सावंत यांची सुमारे ६०० हूून अधिक काजू कलमे खाक झाली आहेत. यावेळी स्वागत नाटेकर, अमित सावंत, बाप्पल धुरी, भाऊ कुडव, गोट्या सावंत यांनी मदतकार्य केले.

शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकटआग लागल्याच्या ठिकाणी वस्ती नसल्याने आग लागल्याची माहिती उशिराने शेतकऱ्यांना समजली. मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्याने शेतकऱ्यांना आग आटोक्यात आणणे कठीण झाले. शेतकरी तसेच वाहनधारकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र १५ एकर क्षेत्रातील काजू बागायती पूर्णपणे खाक झाली. ऐन काजू हंगामात काजू बागायती जळाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग