शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

सिंधुदुर्ग : कृषि सहाय्यक पदाच्या भरतीत घोळ : परशुराम उपरकर यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 12:14 IST

कृषि सहाय्यक पदाच्या भरतीबाबत परिपूर्ण माहिती मागवीली असून अन्याय झालेल्या कोकणातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मनसे करणार असल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.

ठळक मुद्देकृषि सहाय्यक पदाच्या भरतीत घोळ : परशुराम उपरकर यांची माहिती  अन्यायग्रस्त तरुणांना न्याय मिळवून देण्याचा मनसेचा प्रयत्न 

कणकवली : नांदेड येथे पोलिस भरतीत घोळ झाल्याचे नुकतेच उघड झाले आहे. तसाच घोळ कृषि विभागाकडून घेण्यात आलेल्या कृषि सहाय्यक पदाच्या परिक्षेमध्ये झाल्याचा संशय कृषि पदविका तसेच पदवीधर विद्यार्थ्यानी माझ्याजवळ व्यक्त केला आहे. त्यामुळे या भरतीबाबत परिपूर्ण माहिती मागवीली असून अन्याय झालेल्या कोकणातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मनसे करणार असल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.

कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते. यावेळी  उपरकर म्हणाले, कृषि पदविका तसेच पदविधारक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेऊन त्यांच्यावर झालेल्या अन्याया बाबत निवेदन दिले आहे. कोकण विभागातील 210 कृषी सहाय्यकांची पदे भरण्यासाठी कृषि विभागाकडून ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेत चुकीचे प्रश्न होते.

निकालाच्यावेळी विद्यार्थ्यांना या चुकीच्या प्रश्नांचे वाढीव गुण देताना कोकणातील विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला आहे. कोकणातील विद्यार्थ्यांना या कृषिसहाय्यक पदाच्या भरतीत डावलण्यात आले असून सिंधुदूर्गातील फक्त 4 पदे भरली आहेत. एकूण पदांच्या फक्त 2 टक्के इतकी ही संख्या आहे.विद्यार्थ्यांना त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका पहाण्यासाठी ऑनलाईन अथवा कोणतीही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे अलीकडेच झालेल्या नांदेड येथील पोलिस भरतीतील घोळा प्रमाणेच या परीक्षेतही घोळ झाल्याचे संबधित विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

कृषि विभागातील बाहेरच्या जिल्ह्यातील अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगनमत करून या भरतीत गोलमाल केल्याची शक्यता आहे. त्यामुळे या भरतीची शासनाने सखोल चौकशी करावी आणि भ्रष्टाचार उघड करावा.अशी मागणी मनसेच्यावतीने आपण शासनाकडे केली आहे.तसेच वेळप्रसंगी न्यायालयीन लढाहि या समस्येच्या निराकरणासाठी देण्याची तयारी आपण केली असून अन्याय झालेल्या कृषि पदविका तसेच पदविधारक विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे रहाणार असल्याचे परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. पदविधारक विद्यार्थी नोकरीची वाट पहात असताना त्यांची अनेक माध्यमातून उपेक्षा होत आहे. अशावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यानी बोगस भरतीसारखी कामे करण्यापेक्षा येथील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.जिल्ह्यात डीएड, बीएड झालेले अनेक विद्यार्थी बेरोजगार आहेत. विविध क्षेत्रातील पदविधारकही बेरोजगार असून त्यांचे नोकरीसाठी आवश्यक असलेले वय निघुन जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला तोंड देण्यासाठी त्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. मनसे त्यांच्या लढ्याला सर्व शक्तीनिशी पाठिंबा देईल.असेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.शासकीय भरती विभागनिहाय करा !सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सद्यःस्थिती पहाता अनेक पदविधारक विद्यार्थ्यांची नोकरीसाठी आवश्यक वयोमर्यादा निघुन गेली आहे. अनेक प्रकल्पग्रस्ताना अजूनही नोकरी मिळालेली नाही. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यासारख्या विविध विभागात कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या तरुणांना अजूनही न्याय मिळू शकलेला नाही.

तिलारी धरण ग्रस्तांवर अन्याय झाला असून त्यांच्या तिसऱ्या पिढीला आता नुकसान भरपाई मिळत आहे. यापूर्वीच्या त्यांच्या दोन पिढ्यावर नोकरी तसेच मोबदल्या अभावी अन्यायच झाला आहे. नोकर भरतीच्यावेळी कोकणावर सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे येथील तरुण बेरोजगार आहेत. ही बेरोजगारी कमी करायची असेल तर शासकीय भरती विभागनिहाय करावी. म्हणजे इतर भागातील तरुण या भरतीत सहभागी होऊ शकणार नाहीत. त्यामुळे कोकणातील तरुणांनाच रोजगार मिळेल. असेही यावेळी परशुराम उपरकर म्हणाले. 

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर MNSमनसेsindhudurgसिंधुदुर्ग