शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

सिंधुदुर्ग :  मालवणातील समस्या न सोडविल्यास तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 17:42 IST

मालवण तालुक्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असून सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने तहसीलदार समीर घारे यांचे लक्ष वेधण्यात आले. येत्या १५ समस्या सोडविल्या न गेल्यास तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल, असा इशारा स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी दिला.

ठळक मुद्दे मालवणातील समस्या न सोडविल्यास तहसीलवर मोर्चास्वाभिमान पक्षाचा इशारा : १५ दिवसात कार्यवाही करण्याची केली मागणी

सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असून सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने तहसीलदार समीर घारे यांचे लक्ष वेधण्यात आले. येत्या १५ समस्या सोडविल्या न गेल्यास तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल, असा इशारा स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी दिला.तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत स्वाभिमानने तहसीलदारांना निवेदन देत लक्ष वेधले. यावेळी तालुकाध्यक्ष मंदार केणी, सभापती सोनाली कोदे-तळाशीलकर, कृष्णनाथ तांडेल, नगरसेवक जगदीश गावकर, ममता वराडकर, चारुशीला आचरेकर, सरपंच संघटनेच्या अध्यक्षा स्नेहा केरकर, प्रतिमा भोजने, आबा हडकर, डॉ. जितेंद्र केरकर, अशोक चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.मालवण कसाल आणि मालवण कुडाळ या दोन प्रमुख रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दोन्ही मागार्ची तात्काळ दुरुस्ती केली जावी, अशी मागणी करण्यात आली. तर, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परप्रांतीय बोटींचा धुमाकूळ सुरूच आहे. परप्रांतीयांच्या पर्ससीन नौकांच्या घुसखोरीमुळे पारंपरिक मच्छीमार हवालदिल बनला आहे.

याबाबत मच्छीमारांच्या तक्रारीनंतरही कोणतीही कारवाई नाही. त्यामुळे स्वाभिमानच्या या प्रमुख दोन मागण्या पूर्ण करण्याची १५ दिवसात कार्यवाही झाली नाही, तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. 

टॅग्स :Morchaमोर्चाsindhudurgसिंधुदुर्ग