शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

मुसळधार पाऊस: सावंतवाडीसह बांदा बाजारपेठेत पाणीच पाणी, अनेक दुकानात शिरले पाणी

By अनंत खं.जाधव | Updated: July 7, 2024 17:37 IST

Sindhudurg Rain Update: रविवारी सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्याला  पावसाने झोडपून काढले असून सावंतवाडी तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे.तर तेरेखोल नदीनेही धोक्याची पातळी ओलडली असून ठिकठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

सावंतवाडी - रविवारी सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्याला  पावसाने झोडपून काढले असून सावंतवाडी तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे.तर तेरेखोल नदीनेही धोक्याची पातळी ओलडली असून ठिकठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.सावंतवाडी व बांदा शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी शिरल्याने अनेक दुकाने खाली करावी लागली आहेत.यात बऱ्याच जणांचे नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवार पासून जोरदार पाऊस कोसळत आहे.रविवारी तर पावसाने आणखी जोर धरला असून तालुक्यात तर चांगलाच हाहाकार उडाला आहे.तेरेखोल नदीने आपली धोक्याची पातळी ओलडली असल्याने वाफोली बांदा दाणोली मार्गावर पाणी आले आहे.यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.रविवारी पहाटेपासूनच न थांबता जोरदार पाऊस सुरु आहे. यातून जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेकांनी घरातून बाहेर निघणे टाळले आहे.  अनेक रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत,वाहतुकही ठप्प झाली आहे. काहि गावात तर सकाळपासूनच वीजही गायब झालेली आहे. 

सकाळच्या सुमारास दाणोली बांदा मार्गावर तेरेखोल नदीचे पाणी आल्याने दोन्ही बाजू ने वाहतूक थांबवून ठेवण्यात आली पोलिसांकडून दोन्ही बाजूंनी बॅरेकटिग केले असून दोन्ही बाजूला पोलिस ठेवण्यात आले आहेत तेरेखोल नदी ची धोक्याची पातळी वाढत जाणार तसतशी इन्सुली सह काहि गावात पाण्याची पातळी वाढत जाणार आहे.मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली येथे तर दोन्ही बाजूला पाणी आले आहे.तसेच बांदा बाजारपेठेत ही पाणी वाढत चालले असून अनेकानी सावधगिरीचा इशारा म्हणून दुकाने खाली करण्यास सुरूवात केली आहे.शेर्ले परिसरात ही पाण्याची पातळी वाढू लागली आहे.तसेच माडखोल येथे ही तेरेखोल नदीचे पाणी केव्हाही पातळी ओलडू शकते त्यामुळे तेथील ग्रामस्थांना सर्तक राहाण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, महसूल विभाग व पोलिस यांच्याकडून सतत परस्थीतीवर लक्ष ठेवण्यात येत असून कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नका असे आवाहन करण्यात येत आहे. सावंतवाडी पोलिसांनी दाणोली परिसरात जाऊन वाहतूक थांबवली आहे.

सावंतवाडी बाजारपेठेत पाणीच पाणीकधीही नाही ते यावेळी सावंतवाडी बाजारपेठेत पाणी घुसले असून अनेक दुकानात पाणी गेले आहे.काहि दुकानदारांनी खबरदारीचा उपाय म्हणून दुकानातील सामान इतरत्र हलविले आहे.रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून गांधी चौकात तर अनेक गाड्या या पाण्यात आहेत पाणी जाण्यास वाट नसल्याने पाणी तेथेच तुडुंब राहिले आहे.काहि दुकानात पाणी गेल्याने दुकानातील सामानाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक दुकानात पाणी जाणार आहे.नगरपरिषद कर्मचारी पाण्याला वाट करून देण्याचा प्रयत्न करत आहेत असे असले तर पाण्याची पातळी कमी होतना दिसत नाही त्यातच मोती तलावातील पाणी ही वाढत चालले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसSawantwadiसावंतवाडी