शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

मुसळधार पाऊस: सावंतवाडीसह बांदा बाजारपेठेत पाणीच पाणी, अनेक दुकानात शिरले पाणी

By अनंत खं.जाधव | Updated: July 7, 2024 17:37 IST

Sindhudurg Rain Update: रविवारी सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्याला  पावसाने झोडपून काढले असून सावंतवाडी तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे.तर तेरेखोल नदीनेही धोक्याची पातळी ओलडली असून ठिकठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

सावंतवाडी - रविवारी सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्याला  पावसाने झोडपून काढले असून सावंतवाडी तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे.तर तेरेखोल नदीनेही धोक्याची पातळी ओलडली असून ठिकठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.सावंतवाडी व बांदा शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी शिरल्याने अनेक दुकाने खाली करावी लागली आहेत.यात बऱ्याच जणांचे नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवार पासून जोरदार पाऊस कोसळत आहे.रविवारी तर पावसाने आणखी जोर धरला असून तालुक्यात तर चांगलाच हाहाकार उडाला आहे.तेरेखोल नदीने आपली धोक्याची पातळी ओलडली असल्याने वाफोली बांदा दाणोली मार्गावर पाणी आले आहे.यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.रविवारी पहाटेपासूनच न थांबता जोरदार पाऊस सुरु आहे. यातून जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेकांनी घरातून बाहेर निघणे टाळले आहे.  अनेक रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत,वाहतुकही ठप्प झाली आहे. काहि गावात तर सकाळपासूनच वीजही गायब झालेली आहे. 

सकाळच्या सुमारास दाणोली बांदा मार्गावर तेरेखोल नदीचे पाणी आल्याने दोन्ही बाजू ने वाहतूक थांबवून ठेवण्यात आली पोलिसांकडून दोन्ही बाजूंनी बॅरेकटिग केले असून दोन्ही बाजूला पोलिस ठेवण्यात आले आहेत तेरेखोल नदी ची धोक्याची पातळी वाढत जाणार तसतशी इन्सुली सह काहि गावात पाण्याची पातळी वाढत जाणार आहे.मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली येथे तर दोन्ही बाजूला पाणी आले आहे.तसेच बांदा बाजारपेठेत ही पाणी वाढत चालले असून अनेकानी सावधगिरीचा इशारा म्हणून दुकाने खाली करण्यास सुरूवात केली आहे.शेर्ले परिसरात ही पाण्याची पातळी वाढू लागली आहे.तसेच माडखोल येथे ही तेरेखोल नदीचे पाणी केव्हाही पातळी ओलडू शकते त्यामुळे तेथील ग्रामस्थांना सर्तक राहाण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, महसूल विभाग व पोलिस यांच्याकडून सतत परस्थीतीवर लक्ष ठेवण्यात येत असून कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नका असे आवाहन करण्यात येत आहे. सावंतवाडी पोलिसांनी दाणोली परिसरात जाऊन वाहतूक थांबवली आहे.

सावंतवाडी बाजारपेठेत पाणीच पाणीकधीही नाही ते यावेळी सावंतवाडी बाजारपेठेत पाणी घुसले असून अनेक दुकानात पाणी गेले आहे.काहि दुकानदारांनी खबरदारीचा उपाय म्हणून दुकानातील सामान इतरत्र हलविले आहे.रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून गांधी चौकात तर अनेक गाड्या या पाण्यात आहेत पाणी जाण्यास वाट नसल्याने पाणी तेथेच तुडुंब राहिले आहे.काहि दुकानात पाणी गेल्याने दुकानातील सामानाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक दुकानात पाणी जाणार आहे.नगरपरिषद कर्मचारी पाण्याला वाट करून देण्याचा प्रयत्न करत आहेत असे असले तर पाण्याची पातळी कमी होतना दिसत नाही त्यातच मोती तलावातील पाणी ही वाढत चालले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसSawantwadiसावंतवाडी