शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

सिंधुुदुर्ग : पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर, बांदा येथील आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 14:33 IST

माकडतापाने सलग दुसऱ्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा परिसरात थैमान घातले आहे. माकडतापबाधित रुग्ण व मृत माकडे सापडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर, बांदा येथील आढावा बैठक माकडतापाच्या साथीबाबत प्रत्येकाने चोख भूमिका बजावण्याच्या सूचन

सिंधुुदुर्ग : माकडतापाने सलग दुसऱ्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा परिसरात थैमान घातले आहे. माकडतापबाधित रुग्ण व मृत माकडे सापडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत.

माकडतापाच्या साथीमुळे प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दुसऱ्यावर न ढकलता चोखपणे पार पाडावी. निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे संकेत सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. यावेळी वनविभाग व पशुसंवर्धन विभागाच्या कामाबाबत पालकमंत्री केसरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.माकडताप बाधित क्षेत्रातील गावांमध्ये २४ तास वनखात्याने पथके कार्यरत ठेवावीत. आरोग्य विभागानेही प्रत्येक रुग्णाला तातडीने उपचार करुन योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना पालकमंत्री केसरकर यांनी दिल्या.

यावेळी केसरकर यांनी माकडतापाने बळी गेलेल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले. बांदा आरोग्यकेंद्राचे उद्घाटन लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. माकडतापाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री केसरकर यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

यावेळी सावंतवाडी तहसीलदार सतीश कदम, दोडामार्ग तहसीलदार रोहिणी राजपूत, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. संदेश कांबळे, सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे, दोडामार्ग शिवसेना तालुुकाप्रमुख बाबुराव धुरी, माजी सरपंच श्रीकृष्ण काणेकर, माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, सुशांत पांगम, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील आदींसह वनविभाग, आरोग्य विभाग, पशुधन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बदली करणार : दीपक केसरकरबांदा परिसरात माकडतापासारखी गंभीर परिस्थिती असताना जिल्ह्यातील आरोग्य, वनविभाग आणि संबंधित कोणत्याच विभागाचा मुख्य अधिकारी त्या गावापर्यंत पोहोचला नसल्याने पालकमंत्री केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. आपण ज्या जिल्ह्यात काम करतो त्याबाबत आत्मीयता असली पाहिजे.

सर्वांगीण विकास होण्यासाठी जिल्ह्यातील मुख्य अधिकारी चांगले असणे गरजेचे आहे. मात्र या अधिकाºयांना त्याची फिकीर नसल्याने लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करून त्याजागी चांगले अधिकारी बसविणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHealthआरोग्य