शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

सिंधुदुर्ग : सरकार शेतकऱ्यांना आत्महत्येस उद्युक्त करते : रघुनाथ दादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 16:20 IST

शेतकरी नांगरणीपासून मशागतीपर्यंत अनेक कामांसाठी सरकारला टॅक्स भरत असतो पण सरकार शेतकऱ्यांला हमीभावही देत नाही व निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना अधोगतीला आणले आहे. पयार्याने शेतकऱ्यांला हे सरकार आत्महत्या करण्यास उद्युक्तच करत आहे असा घणाघाती आरोप शेतकरी सुकाणू समितीचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सिंधुदुर्गात केला.

ठळक मुद्देसरकार शेतकऱ्यांना आत्महत्येस उद्युक्त करते : रघुनाथ दादा पाटील

सिंधुदुर्गनगरी : शेतकरी नांगरणीपासून मशागतीपर्यंत अनेक कामांसाठी सरकारला टॅक्स भरत असतो पण सरकार शेतकऱ्यांला हमीभावही देत नाही व निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना अधोगतीला आणले आहे. पयार्याने शेतकऱ्यांला हे सरकार आत्महत्या करण्यास उद्युक्तच करत आहे असा घणाघाती आरोप शेतकरी सुकाणू समितीचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सिंधुदुर्गात केला.शेतकरी सुकाणू समितीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रभर हुतात्मा अभिवादन व शेतकरी जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रातीसिंह मासाहेब पाटील यांच्या गावातून सुरू केलेली ही जागर यात्रा सिंधुदुर्गात दाखल झाली.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची जागर सभा झाली. यानंतर पत्रकांशी ते बोलत होते. यावेळी सत्यशोधक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दीपक जगताप, राज्य संघटक किशोर ढमाले, आम आदमी पक्षाचे विवेक राणे, आनंद डिचोलकर , नैना कुºहाडे, दीपक सावंत आदी उपस्थित होते.रघूनाथदादा पाटील यांनी या जागर यात्रेची माहिती देताना सांगितले की १९ मार्चपासून ही यात्रा सुरू झाली आहे. या सरकारकडुन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी मिळावी व शेतमालाला हमीभाव मिळावा अशा शेतकरी हिताच्या मागण्या होत्या. मात्र अगोदरच्या सरकारने काय किंवा या सरकारने काय शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या हा आहे.भारताचे धोरण आज शेतमाल निर्यात बंदीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन घेऊनही आपल्या मालाला दर घेता येत नाही. भारतात आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतमाल निर्माण होतो मात्र त्याला योग्य हमीभाव मिळत नाही. उलट शेतकरी मात्र डिझेल म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा सर्वाधिक थेट कर सरकारला भरत असतो.३० एप्रिल रोजी जेलभरोरघुनाथदादा म्हणाले, कर्जमाफी जाहीर केली गेली मात्र त्यातही एवढा घोळ घातला गेला की शेतकऱ्यांच्या हाती निराशाच आली. त्याचेच पर्यावसान अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये होत आहे.

यासाठी सरसकट कर्जमाफी ही आमची आग्रही मागणी आहे. या जगात यात्रेच्या शेवटी ३० एप्रिलला शासनाच्या शेतकरी धोरण विरोधात सविनय कायदेभंग म्हणून जेलभरो आंदोलन केले जाणार आहे.या सत्याग्रहामुळे महाराष्ट्रातील तुरूंग अपुरे पडतील.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी