शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : राज ठाकरे यांच्या हाती सत्ता द्या : परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 17:35 IST

कणकवली : मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करताना घेतलेली भूमिका अजूनही सोडलेली नाही. फक्त मतांसाठी ते कधीही ...

ठळक मुद्देराज ठाकरे यांच्या हाती सत्ता द्या : परशुराम उपरकर महाराष्ट्राची अस्मिता ते जपतील; उपरकर यांचे प्रतिपादन

कणकवली : मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करताना घेतलेली भूमिका अजूनही सोडलेली नाही. फक्त मतांसाठी ते कधीही काम करीत नाहीत. महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्याचे काम खऱ्या अर्थाने ते करीत असून उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर जावून त्याना त्यांनी ठणकावले आहे. त्यामुळे मराठी जनतेने राज ठाकरे यांच्या हाती एकदा सत्ता द्यावी त्यांचे सर्वार्थाने भले केल्याशिवाय ते रहाणार नाहीत. असे प्रतिपादन मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केले.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर उपस्थित होते.परशुराम उपरकर पुढे म्हणाले, उत्तर भारतीयांचे निमंत्रण स्विकारुन त्यांच्या व्यासपीठावर गेलेल्या राज ठाकरे यांनी मराठी माणसाची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार हिरावुन घेण्याचा प्रकार तसेच त्यांच्या अधिकारावर परप्रांतियानी गदा आणणे याविषयी कायद्याचा आधार घेऊन वक्तव्य केले. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा आधारहि त्यांनी यावेळी घेतला. तसेच महाराष्ट्राची बाजू समर्थपणे मांडली.उत्तर भारतीयांसमोर मनसेच्या 'खळखट्याक' बाबत असलेले गैरसमज स्पष्ट केले. इतर नेते उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर जावून त्यांची स्तुती करीत असतात.तसेच त्याना संरक्षण देत असतात. मात्र, राज ठाकरे यांनी परिणामांची तमा न बाळगता आपले विचार स्पष्टपणे मांडले. या राज्यात जो कामानिमित्त येईल त्यांनी येथील भाषा शिकलीच पाहिजे.तसेच महाराष्ट्रातील युवक बाहेरच्या राज्यात जातील तर त्यांनी तेथील भाषा शिकुन समरस व्हावे.असेही सांगितले.महाराष्ट्रात बाहेरील राज्यातून येणारा लोंढा आता थांबवा. माझी भूमिका ही कधीही बदलणार नाही. येथील आया -बहिणींची छेड काढाल तर सोडणार नाही असे ठणकावले आहे. उत्तर भारतीयाना समजावे तसेच आपले विचार त्यांच्या पर्यन्त पोहचावे यासाठी त्यांनी मागणी नुसार हिंदीतून भाषण केले. त्याला चांगला प्रतिसाद लाभला.रेल्वे भरती स्थानिक पातळीवर व्हावी यासाठी मनसेने तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांना पत्र लिहिले होते. मात्र त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. मात्र , ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्राची दखल घेऊन त्यांनी तसे आदेश काढल्याची आठवण राज ठाकरे यानी यावेळी करून दिली. त्याचप्रमाणे असे अनेक प्रश्न मनसेने मार्गी लावल्याने जनतेला त्याचा सार्थ अभिमान आहे. मनसेने पक्ष स्थापने पासून आपले मुद्दे सोडलेले नाही. त्या मुद्याशी एकनिष्ठ राहिली आहे. त्यामुळे मनसेनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आगामी निवडणुकीत जनतेने मनसेला संधी द्यावी. असे आवहनही परशुराम उपरकर यांनी यावेळी केले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्गRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे