शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

सिंधुदुर्ग : राज ठाकरे यांच्या हाती सत्ता द्या : परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 17:35 IST

कणकवली : मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करताना घेतलेली भूमिका अजूनही सोडलेली नाही. फक्त मतांसाठी ते कधीही ...

ठळक मुद्देराज ठाकरे यांच्या हाती सत्ता द्या : परशुराम उपरकर महाराष्ट्राची अस्मिता ते जपतील; उपरकर यांचे प्रतिपादन

कणकवली : मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करताना घेतलेली भूमिका अजूनही सोडलेली नाही. फक्त मतांसाठी ते कधीही काम करीत नाहीत. महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्याचे काम खऱ्या अर्थाने ते करीत असून उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर जावून त्याना त्यांनी ठणकावले आहे. त्यामुळे मराठी जनतेने राज ठाकरे यांच्या हाती एकदा सत्ता द्यावी त्यांचे सर्वार्थाने भले केल्याशिवाय ते रहाणार नाहीत. असे प्रतिपादन मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केले.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर उपस्थित होते.परशुराम उपरकर पुढे म्हणाले, उत्तर भारतीयांचे निमंत्रण स्विकारुन त्यांच्या व्यासपीठावर गेलेल्या राज ठाकरे यांनी मराठी माणसाची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार हिरावुन घेण्याचा प्रकार तसेच त्यांच्या अधिकारावर परप्रांतियानी गदा आणणे याविषयी कायद्याचा आधार घेऊन वक्तव्य केले. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा आधारहि त्यांनी यावेळी घेतला. तसेच महाराष्ट्राची बाजू समर्थपणे मांडली.उत्तर भारतीयांसमोर मनसेच्या 'खळखट्याक' बाबत असलेले गैरसमज स्पष्ट केले. इतर नेते उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर जावून त्यांची स्तुती करीत असतात.तसेच त्याना संरक्षण देत असतात. मात्र, राज ठाकरे यांनी परिणामांची तमा न बाळगता आपले विचार स्पष्टपणे मांडले. या राज्यात जो कामानिमित्त येईल त्यांनी येथील भाषा शिकलीच पाहिजे.तसेच महाराष्ट्रातील युवक बाहेरच्या राज्यात जातील तर त्यांनी तेथील भाषा शिकुन समरस व्हावे.असेही सांगितले.महाराष्ट्रात बाहेरील राज्यातून येणारा लोंढा आता थांबवा. माझी भूमिका ही कधीही बदलणार नाही. येथील आया -बहिणींची छेड काढाल तर सोडणार नाही असे ठणकावले आहे. उत्तर भारतीयाना समजावे तसेच आपले विचार त्यांच्या पर्यन्त पोहचावे यासाठी त्यांनी मागणी नुसार हिंदीतून भाषण केले. त्याला चांगला प्रतिसाद लाभला.रेल्वे भरती स्थानिक पातळीवर व्हावी यासाठी मनसेने तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांना पत्र लिहिले होते. मात्र त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. मात्र , ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्राची दखल घेऊन त्यांनी तसे आदेश काढल्याची आठवण राज ठाकरे यानी यावेळी करून दिली. त्याचप्रमाणे असे अनेक प्रश्न मनसेने मार्गी लावल्याने जनतेला त्याचा सार्थ अभिमान आहे. मनसेने पक्ष स्थापने पासून आपले मुद्दे सोडलेले नाही. त्या मुद्याशी एकनिष्ठ राहिली आहे. त्यामुळे मनसेनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आगामी निवडणुकीत जनतेने मनसेला संधी द्यावी. असे आवहनही परशुराम उपरकर यांनी यावेळी केले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्गRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे