शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

सिंधुदुर्ग : कणकवलीत कचरा निर्मूलन प्रकल्प, जिल्ह्यातील कचरा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 16:12 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कचऱ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. कणकवली येथे मध्यवर्ती ठिकाणी पाच एकर डंपिंग ग्राऊंडवर कचरा निर्मूलन प्रकल्प साकारणार आहे. या कचऱ्यांपासून वीज, इंधन, पाणी तयार करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकणकवलीत कचरा निर्मूलन प्रकल्प, जिल्ह्यातील कचरा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार जिल्हा प्रशासनाकडे सादरीकरण, नीतेश राणेंची माहिती

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कचऱ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. कणकवली येथे मध्यवर्ती ठिकाणी पाच एकर डंपिंग ग्राऊंडवर कचरा निर्मूलन प्रकल्प साकारणार आहे. या कचऱ्यांपासून वीज, इंधन, पाणी तयार करण्यात येणार आहे.

ए. जी. डॉटर्स या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या सहकार्यातून जिल्ह्यात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित केला असून याबाबतचे सादरीकरण आज जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आले असल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यामुळे जिल्ह्यातील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कचऱ्यांची फार मोठी समस्या असून कचऱ्यांचा प्रश्न म्हणजे स्थानिक नगरपालिका, नगरपंचायतींची डोकेदुखी बनला आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आमदार नीतेश राणे यांनी अभिनव संकल्पना सिंधुदुर्गात आणली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या ए. जी. डॉटर्स या कंपनीच्या सहाय्याने सिंधुदुर्ग हा कचरामुक्त जिल्हा बनविण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी येथील जिल्हा नियोजन सभागृहात मंगळवारी या प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, आठही नगरपंचायतींचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. यानंतर आमदार नीतेश राणे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, मनिष दळवी उपस्थित होते.राणे म्हणाले, सिंधुदुर्गातून प्रतिदिन १८० मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचऱ्यातून पिण्याचे शुद्ध पाणी, गॅस, इंधन उपलब्ध करता येणार आहे. महाराष्ट्राच्या एकूण विजेच्या वापराच्या १० टक्के वीज येथील कचऱ्यापासून सिंधुदुर्गात उपलब्ध होईल, अशी माहिती त्यांनी दिली. युनिटचे काम सुरू झाल्यानंतर ९ ते १० महिन्यात येथील प्लांट प्रत्यक्षात साकारेल. सिंधुदुर्गातून डिझेलदेखील तयार होणार आहे.येथील इंधन, गॅस अत्यंत कमी दरात मिळणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये हा प्रकल्प राबवून तेथील सर्व कचरा कंपनीच्या खर्चात उचलला जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नसून उलट कंपनी आपल्या वार्षिक नफ्याच्या १ टक्का रक्कम संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना देणार आहे.

येथे जवळपास ५ हजार कोटींची गुंतवणूक कंपनी करणार असून संपूर्ण जिल्ह्याचा कचरा गोळा करून प्रक्रिया करण्यासाठी जवळपास ५ एकर जागा आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये आज कचऱ्यावर प्रक्रिया करून इंधन, पाणी उपलब्ध केले जात असल्याचे ते म्हणाले.

...तर देशातील पहिला कचरामुक्त जिल्हाकचरा म्हणजे खरे तर फार मोठी समस्या मानली जाते. मात्र, याच कचऱ्यांचे योग्य नियोजन झाल्यास हा कचरा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वरदान ठरू शकतो. यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींनी आणि ग्रामपंचायतींनी पुढे येऊन यामध्ये सहभाग दिल्यास सिंधुदुर्ग हा देशातील पहिला कचरामुक्त जिल्हा होईल, असेही राणे यांनी सांगितले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग