शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

सिंधुदुर्ग : वीज तारांच्या घर्षणामुळे आग लागून नुकसान; बागायतींची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 16:30 IST

विजेच्या तारांच्या घर्षणामुळे आग लागून बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या घटना जिल्ह्यात वारंवार घडत आहेत. मात्र याची गंभीर दखल विद्युत महावितरणकडून घेतली जात नसल्याची बाब बुधवारी कृषी समिती सभेत उघड झाली.

ठळक मुद्देवीज तारांच्या घर्षणामुळे आग लागून नुकसान; बागायतींची हानीमहावितरणकडून दखल नाही कृषी समिती सभेत सदस्यांची नाराजी

सिंधुदुर्गनगरी : विजेच्या तारांच्या घर्षणामुळे आग लागून बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या घटना जिल्ह्यात वारंवार घडत आहेत. मात्र याची गंभीर दखल विद्युत महावितरणकडून घेतली जात नसल्याची बाब बुधवारी कृषी समिती सभेत उघड झाली. तसेच या सभेलाही महावितरणचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने सदस्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.जिल्हा परिषद कृषी समितीची सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती तथा उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर चव्हाण, सदस्य संजना सावंत, अमरसेन सावंत, वर्षा पवार, गणेश राणे, महेंद्र चव्हाण, संजय देसाई, समिधा नाईक, तालुका कृषी अधिकारी आदी अधिकारी व खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्याच्या बागायतींमधून वीजवाहिन्या जात आहेत. या वीजवाहिन्यांना गार्डींग किंवा कोटींग केले नसल्याने या वीज वाहिन्यांमध्ये घर्षण होऊन पडणाऱ्य ठिणग्यांमुळे बागायतींना आग लागत आहे. या आगीत शेतकऱ्यांच्या बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

बागायतींना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र नुकसानग्रस्त शेतकरी किंवा बागायतदाराला नुकसान भरपाई देण्याबात महावितरण कंपनीने कोणतीही दखल घेतलेली नसल्याची बाब कृषी समितीत उघड झाली. तसेच या मुद्याबाबत पत्रव्यवहार करूनही या कंपनीने अद्याप कार्यवाही केलेली नाही.आंबा व काजू पीक विम्याबाबत चर्चा झाली असता जिल्हा बँकेमार्फत विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जात नाही. मात्र राष्ट्रीयकृत बँकांमार्फत विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जाते. याबाबत रणजित देसाई यांनी माहिती मागितली असता केवळ चार तालुक्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे.

मात्र उर्वरित तालुक्यांच्या प्रस्तावात त्रुटी असल्याने त्यांना मिळाली नाही, असे कृषी अधिकारी शिवाजी शेळके यांनी सांगितले. मात्र, सर्व तालुक्यांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांमार्फत रक्कम दिली जात नसल्याचे स्पष्ट करीत या योजनेची सविस्तर माहिती पुढील सभेत सादर करण्याचे आदेश दिले.निधीच उपलब्ध नाहीशासनाच्या चांदा ते बांदा योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला विविध योजनांसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबत सभेत विचारणा झाली असता या योजनेचा एकही रुपया या विभागाला प्राप्त झाला नसल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआगmahavitaranमहावितरण