शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कणकवलीत शेतकऱ्यांचे उपोषण, लेखी आश्वासनानंतर मागे : कृषी विभागाने अनुदान कमी दिल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 12:09 IST

कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांना पॉवर टिलरचे अनुदान १९ हजार प्रमाणे दिले. हे अनुदान खरेदीच्या ५० टक्केप्रमाणे ५५ ते ६० हजार रुपये मिळण्याची गरज होती. त्याविरोधात कृषी कार्यालयासमोर तालुक्यातील शेतकऱ्यांनी साखळी उपोषण छेडले.

ठळक मुद्देपॉवर टिलरचे १९ हजार प्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान ६० हजार रुपये मिळण्याची गरज कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे साखळी उपोषण अनुदान मिळण्याच्यादृष्टीने गटविकास अधिकारी मनोज भोसले यांचे आश्वासन

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांना पॉवर टिलरचे अनुदान १९ हजार प्रमाणे दिले. हे अनुदान खरेदीच्या ५० टक्केप्रमाणे ५५ ते ६० हजार रुपये मिळण्याची गरज होती. त्याविरोधात कृषी कार्यालयासमोर तालुक्यातील शेतकऱ्यांनी साखळी उपोषण छेडले.

सभापती भाग्यलक्ष्मी साटम, गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन अनुदान मिळण्याच्यादृष्टीने लेखी आश्वासन देण्याच्या सूचना केल्या.कणकवली तालुका कृषी कार्यालयांतर्गत उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत यंत्र खरेदीसाठी ५० टक्के अनुदानावर प्रस्तावांना मंजुरी दिली होती. त्यानुसार पूजा परब, कमलेश पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना कमी अनुदान मिळाले होते. त्यामुळे शेतकरी उपोषणाला बसले होते. त्यात पंचायत समिती सदस्य गणेश तांबे, मिलिंद मेस्त्री, हर्षदा वाळके, नांदगाव सरपंच अप्रोजा नावलेकर, माजी सरपंच संजय पाटील, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, गणेश खोत, पूजा परब, कमलेश पाटील, विनायक दळवी, प्रकाश पाटील, भाई मोरजकर, प्रकाश बागवे, विजय टक्के आदी सहभागी झाले होते.

सुमारे १० ते १५ उपोषणकर्त्यांनी सकाळी १० वाजल्यापासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकांनी यंत्र खरेदीसाठी ५० टक्के अनुदान असल्याचे सांगून प्रस्ताव केले. त्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

मंजुरी देताना १९ हजार कशासाठी? ही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आहे. अधिकाऱ्यांच्या अज्ञानपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्याला जबाबदार कोण? अशा शब्दात शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना जाब विचारला.अधिकाऱ्यांनी घातला घोळ, सर्व अनुदानाचा लावला बट्याबोळ, बंद करा...बंद करा... शेतकऱ्यांची फसवणूक बंद करा, उन्नत शेती समृद्ध शेतकरी...अज्ञान अधिकारी कंगाल शेतकरी, कृषी विभागाचा जाहीर निषेध, असे फलक लावून उपोषणकर्ते उपोषणस्थळी बसले होते.

कृषी अधिकारी राठोड, सहाय्यक कृषी अधिकारी पाचपुते, विभागीय कृषी अधिकारी कांबळे यांनी उपोषणकर्त्यांना आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ४५ दिवसांत उर्वरीत अनुदान देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी दुपारी उपोषण मागे घेतले.अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव सादरशेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक शेतकऱ्याला १९ हजारांचे अनुदान देण्यात आलेले आहे. समृद्ध शेतकरी मोहिमेतील सर्व शेतकऱ्यांना अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे.

निकषानुसार ज्या शेतकऱ्यांना लाभ द्यायचा होता तो दिलेला आहे. अधिकचे अनुदान पुढील ४५ दिवसांत देण्यात येणार आहे. त्याबाबत कृषी विभागामार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विठ्ठल राठोड यांनी दिली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी