शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सिंधुदुर्ग : कणकवलीत शेतकऱ्यांचे उपोषण, लेखी आश्वासनानंतर मागे : कृषी विभागाने अनुदान कमी दिल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 12:09 IST

कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांना पॉवर टिलरचे अनुदान १९ हजार प्रमाणे दिले. हे अनुदान खरेदीच्या ५० टक्केप्रमाणे ५५ ते ६० हजार रुपये मिळण्याची गरज होती. त्याविरोधात कृषी कार्यालयासमोर तालुक्यातील शेतकऱ्यांनी साखळी उपोषण छेडले.

ठळक मुद्देपॉवर टिलरचे १९ हजार प्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान ६० हजार रुपये मिळण्याची गरज कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे साखळी उपोषण अनुदान मिळण्याच्यादृष्टीने गटविकास अधिकारी मनोज भोसले यांचे आश्वासन

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांना पॉवर टिलरचे अनुदान १९ हजार प्रमाणे दिले. हे अनुदान खरेदीच्या ५० टक्केप्रमाणे ५५ ते ६० हजार रुपये मिळण्याची गरज होती. त्याविरोधात कृषी कार्यालयासमोर तालुक्यातील शेतकऱ्यांनी साखळी उपोषण छेडले.

सभापती भाग्यलक्ष्मी साटम, गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन अनुदान मिळण्याच्यादृष्टीने लेखी आश्वासन देण्याच्या सूचना केल्या.कणकवली तालुका कृषी कार्यालयांतर्गत उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत यंत्र खरेदीसाठी ५० टक्के अनुदानावर प्रस्तावांना मंजुरी दिली होती. त्यानुसार पूजा परब, कमलेश पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना कमी अनुदान मिळाले होते. त्यामुळे शेतकरी उपोषणाला बसले होते. त्यात पंचायत समिती सदस्य गणेश तांबे, मिलिंद मेस्त्री, हर्षदा वाळके, नांदगाव सरपंच अप्रोजा नावलेकर, माजी सरपंच संजय पाटील, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, गणेश खोत, पूजा परब, कमलेश पाटील, विनायक दळवी, प्रकाश पाटील, भाई मोरजकर, प्रकाश बागवे, विजय टक्के आदी सहभागी झाले होते.

सुमारे १० ते १५ उपोषणकर्त्यांनी सकाळी १० वाजल्यापासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकांनी यंत्र खरेदीसाठी ५० टक्के अनुदान असल्याचे सांगून प्रस्ताव केले. त्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

मंजुरी देताना १९ हजार कशासाठी? ही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आहे. अधिकाऱ्यांच्या अज्ञानपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्याला जबाबदार कोण? अशा शब्दात शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना जाब विचारला.अधिकाऱ्यांनी घातला घोळ, सर्व अनुदानाचा लावला बट्याबोळ, बंद करा...बंद करा... शेतकऱ्यांची फसवणूक बंद करा, उन्नत शेती समृद्ध शेतकरी...अज्ञान अधिकारी कंगाल शेतकरी, कृषी विभागाचा जाहीर निषेध, असे फलक लावून उपोषणकर्ते उपोषणस्थळी बसले होते.

कृषी अधिकारी राठोड, सहाय्यक कृषी अधिकारी पाचपुते, विभागीय कृषी अधिकारी कांबळे यांनी उपोषणकर्त्यांना आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ४५ दिवसांत उर्वरीत अनुदान देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी दुपारी उपोषण मागे घेतले.अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव सादरशेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक शेतकऱ्याला १९ हजारांचे अनुदान देण्यात आलेले आहे. समृद्ध शेतकरी मोहिमेतील सर्व शेतकऱ्यांना अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे.

निकषानुसार ज्या शेतकऱ्यांना लाभ द्यायचा होता तो दिलेला आहे. अधिकचे अनुदान पुढील ४५ दिवसांत देण्यात येणार आहे. त्याबाबत कृषी विभागामार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विठ्ठल राठोड यांनी दिली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी