शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सिंधुदुर्ग जिल्हा ब्रेक द चेनच्या तिसऱ्या टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 11:10 IST

Corona virus uday Samant Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्या घटत असलेला कोरोनाबाधितांचा आकडा आणि पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला  असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनाच्या चौथ्या स्तरातून तिसऱ्या स्तरात आला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा ब्रेक द चेनच्या तिसऱ्या टप्प्यातकोरोनाबाधितांचा आकडा आणि पॉझिटिव्हिटी रेट झाला कमी

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्या घटत असलेला कोरोनाबाधितांचा आकडा आणि पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला  असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनाच्या चौथ्या स्तरातून तिसऱ्या स्तरात आला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

सोमवारपासून सर्व प्रकारची दुकाने सोमवार ते शुक्रवार या दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत खुली करण्यास मुभा देण्यात येणार आहे, तसेच जिल्ह्यात काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी सामाजिक अंतरसह शासकीय नियमांचे पालन केल्यास ८ ते १० दिवसांत जिल्हा दुसऱ्या टप्प्यात येईल, अशी आशाही व्यक्त केली.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. हा रेट २७ वरून ९ टक्क्यांच्या आत आला आहे. जिल्ह्यात सध्या एकूण उपलब्ध खाटांच्या ५५.२० टक्के खाटा (बेड) रिक्त आहेत.

जिल्हा ब्रेक द चेनच्या चौथ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांसह अन्य आस्थापना सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.सायंकाळी ४ वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बंदअत्यावश्यक सेवा मात्र सर्व दिवस सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंट आणि हॉटेलही सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के आसन क्षमतेने सुरू, तर सायंकाळी ४ वाजेनंतर केवळ पार्सल सुविधा उपलब्ध असणार आहे. सार्वजनिक वाहतूक सुरू केली जाणार असून, त्यात उभ्याने प्रवास करता येणार नाही.

सलून, ब्युटीपार्लरही सुरू होणार आहेत. सर्व दुकानांना ही शिथिलता दिली असली तरी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने सायंकाळी ४ वाजता पूर्णतः बंद करणे बंधनकारक असून, तसे न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.हा निर्णय शासनाच्या निर्देशानुसारजिल्ह्यात कोरोनामध्ये काहीशा प्रमाणात शिथिलता देत सर्व दुकाने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. हा निर्णय शासनाच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी कोणी दबाव आणला त्यामुळे घेतला असे नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गUday Samantउदय सामंत