शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सिंधुदुर्ग जिल्हा ब्रेक द चेनच्या तिसऱ्या टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 11:10 IST

Corona virus uday Samant Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्या घटत असलेला कोरोनाबाधितांचा आकडा आणि पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला  असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनाच्या चौथ्या स्तरातून तिसऱ्या स्तरात आला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा ब्रेक द चेनच्या तिसऱ्या टप्प्यातकोरोनाबाधितांचा आकडा आणि पॉझिटिव्हिटी रेट झाला कमी

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्या घटत असलेला कोरोनाबाधितांचा आकडा आणि पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला  असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनाच्या चौथ्या स्तरातून तिसऱ्या स्तरात आला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

सोमवारपासून सर्व प्रकारची दुकाने सोमवार ते शुक्रवार या दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत खुली करण्यास मुभा देण्यात येणार आहे, तसेच जिल्ह्यात काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी सामाजिक अंतरसह शासकीय नियमांचे पालन केल्यास ८ ते १० दिवसांत जिल्हा दुसऱ्या टप्प्यात येईल, अशी आशाही व्यक्त केली.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. हा रेट २७ वरून ९ टक्क्यांच्या आत आला आहे. जिल्ह्यात सध्या एकूण उपलब्ध खाटांच्या ५५.२० टक्के खाटा (बेड) रिक्त आहेत.

जिल्हा ब्रेक द चेनच्या चौथ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांसह अन्य आस्थापना सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.सायंकाळी ४ वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बंदअत्यावश्यक सेवा मात्र सर्व दिवस सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंट आणि हॉटेलही सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के आसन क्षमतेने सुरू, तर सायंकाळी ४ वाजेनंतर केवळ पार्सल सुविधा उपलब्ध असणार आहे. सार्वजनिक वाहतूक सुरू केली जाणार असून, त्यात उभ्याने प्रवास करता येणार नाही.

सलून, ब्युटीपार्लरही सुरू होणार आहेत. सर्व दुकानांना ही शिथिलता दिली असली तरी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने सायंकाळी ४ वाजता पूर्णतः बंद करणे बंधनकारक असून, तसे न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.हा निर्णय शासनाच्या निर्देशानुसारजिल्ह्यात कोरोनामध्ये काहीशा प्रमाणात शिथिलता देत सर्व दुकाने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. हा निर्णय शासनाच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी कोणी दबाव आणला त्यामुळे घेतला असे नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गUday Samantउदय सामंत