शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पुन्हा अव्वल

By admin | Updated: June 13, 2017 23:32 IST

सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पुन्हा अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कोकण विभाग पुन्हा राज्यात अव्वल आला आहे. कोकणचा निकाल ९६.१८ टक्के इतका लागला आहे. कॉपीविरहित निकाल हे वैशिष्ट्य पुन्हा एकदा कोकण विभागाने कायम ठेवले असून, एकाही विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला नाही. शनिवार, दि. २४ जून रोजी विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजता शाळेमध्ये गुणपत्रके उपलब्ध होणार आहेत. जिल्हास्तरीय निकालात ९७.५५ टक्के निकाल लागलेला सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पुन्हा पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. दोन जिल्ह्यात मिळून २७ विद्यार्थ्यांना ‘बेस्ट फाईव्ह’मध्ये ५०० पैकी ५०० गुण मिळाले आहेत.मंडळाचे प्रभारी अध्यक्ष व विभागीय सचिव आर. बी. गिरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती दिली. राज्यातील एकूण ९ मंडळामध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. कोल्हापूर मंडळाचा ९३.५९ टक्के, तर पुणे मंडळाचा ९१.९५ टक्के इतका निकाल लागला आहे. कोल्हापूर व पुणे मंडळांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा क्रमांक मिळविला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सर्वाधिक कमी निकाल नागपूर मंडळाचा असून, तो ८३.६७ टक्के इतका लागला आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतून ३९ हजार ६३२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३९ हजार ६१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात २० हजार ६२७ विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यातील १९ हजार ७३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.६९ टक्के इतके आहे. दोन जिल्ह्यांतून १८ हजार ९९० विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यातील १८ हजार ३६६ उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.७१ टक्के आहे. संपूर्ण निकालात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १.०२ टक्क्यांनी अधिक आहे.कोकण बोर्डाने स्थापना झाल्यापासून दहावी आणि बारावी या दोन्ही निकालांमध्ये आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्याने ही यशाची परंपरा कायम राखली आहे. कोकण बोर्डाची स्थापना झाल्यापासून आणि त्याआधीचे एक वर्ष कोल्हापूर बोर्ड असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपला अव्वल दर्जा कायम ठेवला होता. याहीवेळी ही परंपरा कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ हजार ५९८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील १२ हजार २८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९७.५५ टक्के इतका लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून २७ हजार १९ परीक्षेला बसले होते. त्यातील २५ हजार ८१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ९५.५४ टक्के इतका लागला आहे. रत्नागिरीपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल २.०१ टक्क्यांनी अधिक आहे. कॉपीचे प्रमाण शून्य टक्केकोकण विभागातून एकूण ३९ हजार ६३२ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. पैकी ३९ हजार ६१७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. मात्र, परीक्षा कालावधीत कोणताही गैरप्रकार घडलेला नाही. त्यामुळे कोकणचा निकाल कॉपीविरहित तर आहेच, शिवाय एकाही विद्यार्थ्याचा राखीव निकाल नाही, असे गिरी यांनी आवर्जून सांगितले. यावर्षीपासून गायन, संगीत, चित्रकला यांचे सवलती गुण शासनाने एकत्रित केले आहेत.१०० टक्के निकालकोकण विभागात ६२३ माध्यमिक शाळा आहेत. त्यातील २४० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ३९८ शाळा असून, १३१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. २१६ शाळांचा निकाल ९० ते ९९ टक्के, ४० शाळांचा निकाल ८० ते ९०, १० शाळांचा निकाल ७० ते ८० टक्के, तर जिल्ह्यातील एकमेव शाळेचा निकाल ६० ते ७० टक्के इतका लागला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२५ शाळांपैकी १०९ शाळांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे. १०६ शाळांचा निकाल ९० ते ९९ टक्के इतका लागला. आठ शाळांचा निकाल ८० ते ९० टक्के, तर २ शाळांचा निकाल ७० ते ८० टक्के इतका राहिला आहे.१00 टक्के गुणरत्नागिरी जिल्ह्यातील १५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ अशा २७ विद्यार्थ्यांना १00 टक्के गुण मिळाले आहेत. यावर्षी कला क्षेत्रात काही ना काही केलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अधिक गुण मिळाले आहेत.विशेष गुणवत्ता मिळवलेले विद्यार्थीश्रेणीरत्नागिरीसिंधुदुर्गविशेष५,५१८३,९५८प्रथम९,८८९४,८0८द्वितीय८,४३३३,0४४तृतीय२,४२८६३0प्रमुख विषयांचा निकाल मराठी विषयाचा ९७.१३ टक्के, इंग्रजी विषयाचा ९६.९३, हिंदी विषयाचा ९७.६३, गणित विषयाचा ९६.१२, विज्ञान शाखेचा निकाल ९७.८४, इतिहास भूगोल विषयाचा निकाल ९८.६७ टक्के इतका लागला आहे.