शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पुन्हा अव्वल

By admin | Updated: June 13, 2017 23:32 IST

सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पुन्हा अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कोकण विभाग पुन्हा राज्यात अव्वल आला आहे. कोकणचा निकाल ९६.१८ टक्के इतका लागला आहे. कॉपीविरहित निकाल हे वैशिष्ट्य पुन्हा एकदा कोकण विभागाने कायम ठेवले असून, एकाही विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला नाही. शनिवार, दि. २४ जून रोजी विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजता शाळेमध्ये गुणपत्रके उपलब्ध होणार आहेत. जिल्हास्तरीय निकालात ९७.५५ टक्के निकाल लागलेला सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पुन्हा पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. दोन जिल्ह्यात मिळून २७ विद्यार्थ्यांना ‘बेस्ट फाईव्ह’मध्ये ५०० पैकी ५०० गुण मिळाले आहेत.मंडळाचे प्रभारी अध्यक्ष व विभागीय सचिव आर. बी. गिरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती दिली. राज्यातील एकूण ९ मंडळामध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. कोल्हापूर मंडळाचा ९३.५९ टक्के, तर पुणे मंडळाचा ९१.९५ टक्के इतका निकाल लागला आहे. कोल्हापूर व पुणे मंडळांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा क्रमांक मिळविला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सर्वाधिक कमी निकाल नागपूर मंडळाचा असून, तो ८३.६७ टक्के इतका लागला आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतून ३९ हजार ६३२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३९ हजार ६१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात २० हजार ६२७ विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यातील १९ हजार ७३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.६९ टक्के इतके आहे. दोन जिल्ह्यांतून १८ हजार ९९० विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यातील १८ हजार ३६६ उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.७१ टक्के आहे. संपूर्ण निकालात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १.०२ टक्क्यांनी अधिक आहे.कोकण बोर्डाने स्थापना झाल्यापासून दहावी आणि बारावी या दोन्ही निकालांमध्ये आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्याने ही यशाची परंपरा कायम राखली आहे. कोकण बोर्डाची स्थापना झाल्यापासून आणि त्याआधीचे एक वर्ष कोल्हापूर बोर्ड असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपला अव्वल दर्जा कायम ठेवला होता. याहीवेळी ही परंपरा कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ हजार ५९८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील १२ हजार २८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९७.५५ टक्के इतका लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून २७ हजार १९ परीक्षेला बसले होते. त्यातील २५ हजार ८१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ९५.५४ टक्के इतका लागला आहे. रत्नागिरीपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल २.०१ टक्क्यांनी अधिक आहे. कॉपीचे प्रमाण शून्य टक्केकोकण विभागातून एकूण ३९ हजार ६३२ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. पैकी ३९ हजार ६१७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. मात्र, परीक्षा कालावधीत कोणताही गैरप्रकार घडलेला नाही. त्यामुळे कोकणचा निकाल कॉपीविरहित तर आहेच, शिवाय एकाही विद्यार्थ्याचा राखीव निकाल नाही, असे गिरी यांनी आवर्जून सांगितले. यावर्षीपासून गायन, संगीत, चित्रकला यांचे सवलती गुण शासनाने एकत्रित केले आहेत.१०० टक्के निकालकोकण विभागात ६२३ माध्यमिक शाळा आहेत. त्यातील २४० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ३९८ शाळा असून, १३१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. २१६ शाळांचा निकाल ९० ते ९९ टक्के, ४० शाळांचा निकाल ८० ते ९०, १० शाळांचा निकाल ७० ते ८० टक्के, तर जिल्ह्यातील एकमेव शाळेचा निकाल ६० ते ७० टक्के इतका लागला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२५ शाळांपैकी १०९ शाळांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे. १०६ शाळांचा निकाल ९० ते ९९ टक्के इतका लागला. आठ शाळांचा निकाल ८० ते ९० टक्के, तर २ शाळांचा निकाल ७० ते ८० टक्के इतका राहिला आहे.१00 टक्के गुणरत्नागिरी जिल्ह्यातील १५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ अशा २७ विद्यार्थ्यांना १00 टक्के गुण मिळाले आहेत. यावर्षी कला क्षेत्रात काही ना काही केलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अधिक गुण मिळाले आहेत.विशेष गुणवत्ता मिळवलेले विद्यार्थीश्रेणीरत्नागिरीसिंधुदुर्गविशेष५,५१८३,९५८प्रथम९,८८९४,८0८द्वितीय८,४३३३,0४४तृतीय२,४२८६३0प्रमुख विषयांचा निकाल मराठी विषयाचा ९७.१३ टक्के, इंग्रजी विषयाचा ९६.९३, हिंदी विषयाचा ९७.६३, गणित विषयाचा ९६.१२, विज्ञान शाखेचा निकाल ९७.८४, इतिहास भूगोल विषयाचा निकाल ९८.६७ टक्के इतका लागला आहे.