शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ गावे, ३९४ वाड्यांचा समावेश, पावणेपाच कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 12:07 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सज्ज झाला आहे. यावर्षीचा ४ कोटी ७७ लाख रुपयांचा पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला असून यात ३ गावे व ३९४ वाड्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ गावे, ३९४ वाड्यांचा समावेशपावणेपाच कोटींचा आराखडा, संभाव्य पाणीटंचाई

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सज्ज झाला आहे. यावर्षीचा ४ कोटी ७७ लाख रुपयांचा पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला असून यात ३ गावे व ३९४ वाड्यांचा समावेश आहे.कामांची अंदाजपत्रके तातडीने तयार करा व अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले. जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची सभा अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली.

यावेळी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, समिती सचिव तथा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रल्हाद पाताडे, सदस्य सरोज परब, सावी लोके, संजय आंग्रे, विकास कुडाळकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता यावर्षीचा पाणीटंचाई आराखडा हा ४ कोटी ७७ लाख एवढा मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३ गाव व ३९४ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासू शकते, असे अनुमान ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने काढले आहे.त्या अनुषंगाने नळपाणी, विंधन विहिरी, विहिरीतील गाळ काढणे आदी कामांची अंदाजपत्रके तत्काळ मागवा व जिल्ह्यातील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही याची काळजी घ्या, अशी सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी करत प्राप्त होणारी अंदाजपत्रके अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवा, असे आदेश दिले.१ कोटी १२ लाखांच्या कामांना मंजुरीपाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने जिल्ह्यासाठी नव्याने दहा कामांना मंजुरी दिली आहे. नळयोजनेच्या कामासाठी १६ लाख ८९ हजार व नवीन विंधन विहिरीसाठी ९५ लाख ७५ हजार असे एकूण सुमारे १ कोटी १२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रल्हाद पाताडे यांनी दिली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणीcollectorतहसीलदार