शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कोकणात शेळ्या-मेंढ्यांची कारवणी पद्धत आजही टिकून, मेंढपाळ गावोगावी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 10:54 IST

रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपिकता कमी होऊ लागल्याने सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परिणामी कोकणात पूर्वीपासून चालत आलेली शेतात शेळ्या-मेंढ्या बसविण्याची कारवणी पद्धत आजही टिकून आहे. जिल्ह्याच्या खलाट पट्ट्यातील मेंढपाळ आपल्या फौजफाट्यासह कारवाणीसाठी गावोगाव दाखल होऊ लागले आहेत.

ठळक मुद्देशेळ्या-मेंढ्यांची कारवणी पद्धत आजही टिकूनमेंढपाळ गावोगावी दाखल कोकणातील पूर्वपरंपरागत प्रथा

मिलिंद डोंगरे 

सिंधुदुर्ग : रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपिकता कमी होऊ लागल्याने सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परिणामी कोकणात पूर्वीपासून चालत आलेली शेतात शेळ्या-मेंढ्या बसविण्याची कारवणी पद्धत आजही टिकून आहे. जिल्ह्याच्या खलाट पट्ट्यातील मेंढपाळ आपल्या फौजफाट्यासह कारवाणीसाठी गावोगाव दाखल होऊ लागले आहेत.

पूर्वमशागतीसाठी पूर्वीच्या काळी रासायनिक खते नसल्याने लोक सेंद्रिय पद्धतीने शेती करीत असत. शेण व पालापाचोळ्यापासून बनविलेले खत शेतीसाठी वापरत असत. परंतु जसजशी शेती तंत्रज्ञानात प्रगती होत गेली तसतशी रासायनिक खते उपलब्ध होत गेली. रासायनिक खतांमुळे शेतीच्या उत्पन्नात वाढ होत गेली.

हे खरे असले तरी या खतांचा बेसुमार वापर होऊ लागल्याने त्याचा विपरीत परिणाम जमिनीच्या सुपिकतेवर होऊ लागला. त्यामुळे अलीकडे सेंद्रिय शेतीवर भर दिला जात आहे. जमिनीची सुपिकता वाढविणारी कारवणी पद्धत पूर्वीपासूनच कोकणात आहे.कारवणी म्हणजे नेमके काय?साधारणपणे हिवाळा सुरू झाला की, मेंढपाळ आपल्या शेळ्या-मेंढ्यांचा फौजफाटा घेऊन गावोगावी भटकंती करीत असतात. शेतकरी आपल्या शेतात मेंढ्या बसवून घेतात. या शेळ्या-मेंढ्यांचे मलमूत्र शेतात पडते. त्यालाच कारवणी म्हणतात. त्याने शेतीची सुपिकता वाढत असल्याचे शेतकरी सांगतात.

शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्यांचा प्रश्न सुटतोलेंडीखताला फार मोठी मागणी असते. शेतीबरोबरच फळबागांना हे खत वापरले जाते. या खतामुळे जमिनीचा पोत सुधारत असल्याने कारवणीसाठी शेतकरी आग्रही असतात. एका रात्री शेळ्या-मेंढ्या शेतात बसविण्यासाठी तांदूळ किंवा पैसे अशी त्यांची बिदागी असते. पाऊस पडेपर्यंत हे मेंढपाळ गावोगावी भटकंती करीत असतात. त्यातून त्यांच्या उदरनिर्वाहाबरोबरच शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्यांचा प्रश्न सुटतो. यात हजारो रुपयांची उलाढालही होत असते.शेळ्या-मेंढ्यांसोबत शेतातच संसारअर्थात यात मेंढपाळांना प्रचंड मेहनत करावी लागते. थंडी, वारा, कडाक्याचे ऊन सहन करीत ते गावोगावी भटकंती करीत असतात. शेळ्या-मेंढ्यांबरोबरच त्यांना शेतात संसार थाटावा लागतो. पावसाळा सुरू होण्याअगोदर ते आपल्या घरी परततात. एकेक मेंढपाळांकडे २०० ते २५० मेंढ्या असतात. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी