शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

सिंधुदुर्ग : कोकणात शेळ्या-मेंढ्यांची कारवणी पद्धत आजही टिकून, मेंढपाळ गावोगावी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 10:54 IST

रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपिकता कमी होऊ लागल्याने सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परिणामी कोकणात पूर्वीपासून चालत आलेली शेतात शेळ्या-मेंढ्या बसविण्याची कारवणी पद्धत आजही टिकून आहे. जिल्ह्याच्या खलाट पट्ट्यातील मेंढपाळ आपल्या फौजफाट्यासह कारवाणीसाठी गावोगाव दाखल होऊ लागले आहेत.

ठळक मुद्देशेळ्या-मेंढ्यांची कारवणी पद्धत आजही टिकूनमेंढपाळ गावोगावी दाखल कोकणातील पूर्वपरंपरागत प्रथा

मिलिंद डोंगरे 

सिंधुदुर्ग : रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपिकता कमी होऊ लागल्याने सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परिणामी कोकणात पूर्वीपासून चालत आलेली शेतात शेळ्या-मेंढ्या बसविण्याची कारवणी पद्धत आजही टिकून आहे. जिल्ह्याच्या खलाट पट्ट्यातील मेंढपाळ आपल्या फौजफाट्यासह कारवाणीसाठी गावोगाव दाखल होऊ लागले आहेत.

पूर्वमशागतीसाठी पूर्वीच्या काळी रासायनिक खते नसल्याने लोक सेंद्रिय पद्धतीने शेती करीत असत. शेण व पालापाचोळ्यापासून बनविलेले खत शेतीसाठी वापरत असत. परंतु जसजशी शेती तंत्रज्ञानात प्रगती होत गेली तसतशी रासायनिक खते उपलब्ध होत गेली. रासायनिक खतांमुळे शेतीच्या उत्पन्नात वाढ होत गेली.

हे खरे असले तरी या खतांचा बेसुमार वापर होऊ लागल्याने त्याचा विपरीत परिणाम जमिनीच्या सुपिकतेवर होऊ लागला. त्यामुळे अलीकडे सेंद्रिय शेतीवर भर दिला जात आहे. जमिनीची सुपिकता वाढविणारी कारवणी पद्धत पूर्वीपासूनच कोकणात आहे.कारवणी म्हणजे नेमके काय?साधारणपणे हिवाळा सुरू झाला की, मेंढपाळ आपल्या शेळ्या-मेंढ्यांचा फौजफाटा घेऊन गावोगावी भटकंती करीत असतात. शेतकरी आपल्या शेतात मेंढ्या बसवून घेतात. या शेळ्या-मेंढ्यांचे मलमूत्र शेतात पडते. त्यालाच कारवणी म्हणतात. त्याने शेतीची सुपिकता वाढत असल्याचे शेतकरी सांगतात.

शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्यांचा प्रश्न सुटतोलेंडीखताला फार मोठी मागणी असते. शेतीबरोबरच फळबागांना हे खत वापरले जाते. या खतामुळे जमिनीचा पोत सुधारत असल्याने कारवणीसाठी शेतकरी आग्रही असतात. एका रात्री शेळ्या-मेंढ्या शेतात बसविण्यासाठी तांदूळ किंवा पैसे अशी त्यांची बिदागी असते. पाऊस पडेपर्यंत हे मेंढपाळ गावोगावी भटकंती करीत असतात. त्यातून त्यांच्या उदरनिर्वाहाबरोबरच शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्यांचा प्रश्न सुटतो. यात हजारो रुपयांची उलाढालही होत असते.शेळ्या-मेंढ्यांसोबत शेतातच संसारअर्थात यात मेंढपाळांना प्रचंड मेहनत करावी लागते. थंडी, वारा, कडाक्याचे ऊन सहन करीत ते गावोगावी भटकंती करीत असतात. शेळ्या-मेंढ्यांबरोबरच त्यांना शेतात संसार थाटावा लागतो. पावसाळा सुरू होण्याअगोदर ते आपल्या घरी परततात. एकेक मेंढपाळांकडे २०० ते २५० मेंढ्या असतात. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी