शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

सिंधुदुर्ग : राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न : वैभव नाईक यांची टीका, नीतेश राणेना प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 16:18 IST

सिंधुदुर्गात पहिल्यांदाच राजकीय लाभासाठी आमदार नीतेश राणे यांनी शिवजयंती साजरी केली आहे. शिवसेनेकडून गेली अनेक वर्षे अक्षय्यतृतीया व तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. या शिवजयंतीच्या निमित्ताने टीका करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हा तर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देराजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न : वैभव नाईक यांची टीकानीतेश राणे यांना प्रत्युत्तर शिवसेना अनेक वर्षे साजरी करतेय शिवजयंती

कणकवली : सिंधुदुर्गात पहिल्यांदाच राजकीय लाभासाठी आमदार नीतेश राणे यांनी शिवजयंती साजरी केली आहे. शिवसेनेकडून गेली अनेक वर्षे अक्षय्यतृतीया व तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. या शिवजयंतीच्या निमित्ताने टीका करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हा तर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.वैभव नाईक पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांना ३२ टक्के मराठा समाजापुरते मर्यादित करून एकप्रकारे नीतेश राणे यांनी अनेक शिवप्रेमींचा अपमानच केला आहे. त्यामुळे नीतेश राणे यांनी पहिल्यांदा शिवप्रेमींची माफी मागावी. तसेच त्यांनी माझ्यावर दहशतवादाचे आरोप करणे हे हास्यास्पद आहे. नीतेश राणे यांच्या सततच्या राजकीय चमकेगिरीमुळे मराठा क्रांती मूक मोर्चा समन्वय समितीतून त्यांना बाजूला ठेवण्यात आले.

आपल्या फायद्यासाठी भाजपाकडे पायघड्या घालणाऱ्या नीतेश राणे यांनी ज्यावेळी भाजप उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढले त्यावेळी त्यांचा साधा निषेधही केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे होते. जाती-धर्मापलीकडे जाऊन त्यांनी काम केले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना विशिष्ट समाजापुरते मर्यादित करून अनेक शिवप्रेमींचा अपमान खºया अर्थाने नीतेश राणे यांनीच केला आहे.वेंगुर्लेचा राडा, गोव्यातील तोडफोडीचे प्रकरण, चिंटू शेख गोळीबार प्रकरण, मुंबईतील हॉटेल मालकाकडे खंडणी मागण्याचे प्रकरण, कणकवली शहरातील गाड्या जाळण्याचे प्रकरण या सगळ्या प्रकरणांची पाळेमुळे नीतेश राणेंपर्यंत जात आहेत, असा आरोप वैभव नाईक यांनी करतानाच मुंबईतील केसवाणी प्रकरणाचा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे आलेला आहे, असेही सांगितले.आमदार नाईक पुढे म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाबाबत बोलण्यास परवानगी दिल्यास खरी माहिती मी जनतेसमोर आणणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने खंडणीखोर कोण आहेत हे जनतेसमोर येईल. ५० लाखांच्या रोख रकमेबाबत यापूर्वी सभागृहात नीतेश राणे यांनी आवाज उठविला होता. मात्र त्यावेळी त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे अखेर त्यांना सभागृहाची माफी मागावी लागली होती, याचा विचार आधी त्यांनी करावा. ज्या आॅडिओ क्लिपबाबत आमदार नीतेश राणे बोलत आहेत त्याबाबत त्यांनी सभागृहात आवाज उठविण्यापूर्वी आधी वडिलांचा सल्ला घ्यावा व त्यानंतरच कृती करावी, असा टोलाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी नीतेश राणे यांना लगावला.

बदनामी करणाऱ्यांना यश मिळणार नाहीमाझ्या विरोधी कुठलाही पुरावा नसताना माझी बदनामी करण्याच्या दृष्टीने कणकवली शासकीय विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांला मारहाण केल्याचे निराधार वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या संबंधितांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच विनाकारण चुकीच्या गोष्टीचे भांडवल करून माझी नाहक बदनामी करण्यात येत आहे. मात्र यात त्यांना यश येणार नाही. कारण येथील जनता सुज्ञ आहे, असे आमदार नाईक यावेळी म्हणाले.

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग