शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न : वैभव नाईक यांची टीका, नीतेश राणेना प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 16:18 IST

सिंधुदुर्गात पहिल्यांदाच राजकीय लाभासाठी आमदार नीतेश राणे यांनी शिवजयंती साजरी केली आहे. शिवसेनेकडून गेली अनेक वर्षे अक्षय्यतृतीया व तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. या शिवजयंतीच्या निमित्ताने टीका करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हा तर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देराजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न : वैभव नाईक यांची टीकानीतेश राणे यांना प्रत्युत्तर शिवसेना अनेक वर्षे साजरी करतेय शिवजयंती

कणकवली : सिंधुदुर्गात पहिल्यांदाच राजकीय लाभासाठी आमदार नीतेश राणे यांनी शिवजयंती साजरी केली आहे. शिवसेनेकडून गेली अनेक वर्षे अक्षय्यतृतीया व तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. या शिवजयंतीच्या निमित्ताने टीका करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हा तर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.वैभव नाईक पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांना ३२ टक्के मराठा समाजापुरते मर्यादित करून एकप्रकारे नीतेश राणे यांनी अनेक शिवप्रेमींचा अपमानच केला आहे. त्यामुळे नीतेश राणे यांनी पहिल्यांदा शिवप्रेमींची माफी मागावी. तसेच त्यांनी माझ्यावर दहशतवादाचे आरोप करणे हे हास्यास्पद आहे. नीतेश राणे यांच्या सततच्या राजकीय चमकेगिरीमुळे मराठा क्रांती मूक मोर्चा समन्वय समितीतून त्यांना बाजूला ठेवण्यात आले.

आपल्या फायद्यासाठी भाजपाकडे पायघड्या घालणाऱ्या नीतेश राणे यांनी ज्यावेळी भाजप उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढले त्यावेळी त्यांचा साधा निषेधही केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे होते. जाती-धर्मापलीकडे जाऊन त्यांनी काम केले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना विशिष्ट समाजापुरते मर्यादित करून अनेक शिवप्रेमींचा अपमान खºया अर्थाने नीतेश राणे यांनीच केला आहे.वेंगुर्लेचा राडा, गोव्यातील तोडफोडीचे प्रकरण, चिंटू शेख गोळीबार प्रकरण, मुंबईतील हॉटेल मालकाकडे खंडणी मागण्याचे प्रकरण, कणकवली शहरातील गाड्या जाळण्याचे प्रकरण या सगळ्या प्रकरणांची पाळेमुळे नीतेश राणेंपर्यंत जात आहेत, असा आरोप वैभव नाईक यांनी करतानाच मुंबईतील केसवाणी प्रकरणाचा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे आलेला आहे, असेही सांगितले.आमदार नाईक पुढे म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाबाबत बोलण्यास परवानगी दिल्यास खरी माहिती मी जनतेसमोर आणणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने खंडणीखोर कोण आहेत हे जनतेसमोर येईल. ५० लाखांच्या रोख रकमेबाबत यापूर्वी सभागृहात नीतेश राणे यांनी आवाज उठविला होता. मात्र त्यावेळी त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे अखेर त्यांना सभागृहाची माफी मागावी लागली होती, याचा विचार आधी त्यांनी करावा. ज्या आॅडिओ क्लिपबाबत आमदार नीतेश राणे बोलत आहेत त्याबाबत त्यांनी सभागृहात आवाज उठविण्यापूर्वी आधी वडिलांचा सल्ला घ्यावा व त्यानंतरच कृती करावी, असा टोलाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी नीतेश राणे यांना लगावला.

बदनामी करणाऱ्यांना यश मिळणार नाहीमाझ्या विरोधी कुठलाही पुरावा नसताना माझी बदनामी करण्याच्या दृष्टीने कणकवली शासकीय विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांला मारहाण केल्याचे निराधार वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या संबंधितांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच विनाकारण चुकीच्या गोष्टीचे भांडवल करून माझी नाहक बदनामी करण्यात येत आहे. मात्र यात त्यांना यश येणार नाही. कारण येथील जनता सुज्ञ आहे, असे आमदार नाईक यावेळी म्हणाले.

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग