शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

चाकरमान्यांसाठी सिंधुआत्मनिर्भर अभियान : अतुल काळसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 4:08 PM

कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आत्मनिर्भर अभियानासाठी समन्वय समिती गठीत केलेली आहे. अनेक अनुभवी आणि सेवाव्रती मार्गदर्शकांच्या मदतीने या अभियानाचे नियोजन केलेले आहे. पहिल्या टप्प्यात गावाकडे स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या चाकरमानी मंडळींची गुगल अर्जाच्या सहाय्याने माहिती संकलित करून त्याचे वर्गीकरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देचाकरमान्यांसाठी सिंधुआत्मनिर्भर अभियान : अतुल काळसेकरगुगल अर्जाच्या माध्यमातून माहिती संकलनास सुरुवात

कणकवली : कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आत्मनिर्भर अभियानासाठी समन्वय समिती गठीत केलेली आहे. अनेक अनुभवी आणि सेवाव्रती मार्गदर्शकांच्या मदतीने या अभियानाचे नियोजन केलेले आहे. पहिल्या टप्प्यात गावाकडे स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या चाकरमानी मंडळींची गुगल अर्जाच्या सहाय्याने माहिती संकलित करून त्याचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. या गुगल अर्जाची लिंक संबंधितांना पाठविण्यात आली असून इच्छुकांनी अर्ज भरून पाठवावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी केले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या कोरोना आपत्तीच्या अनुषंगाने आपल्याला महत्त्वाच्या दोन संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यातले एक आहे आरोग्य आणि दुसरे आहे ते आर्थिक संकट. या दोन्ही संकटांच्या अनुषंगाने आपली अनेक चाकरमानी मंडळी आपापल्या गावी परतलेली आहेत.

भविष्यात मुंबईतील परिस्थिती काय वळण घेईल ते आज सांगणे अवघड आहे. पण अशाही परिस्थितीत ज्यांना मुंबई किंवा शहर सोडणे शक्य होणार नाही अशी मंडळी ही परिस्थिती आटोक्यात आल्यावर माघारी फिरतील.अशा चाकरमानी बांधवांसमोर अनेक आव्हाने आहेत. मग ती कौटुंबीक, सामाजिक असतील किंवा नोकरी व्यवसायाबाबत. त्यामुळे समस्त समाजाने त्यांच्यासोबत राहिले पाहिजे. जिल्हाभर ही एक चळवळ झाली पाहिजे. हे एक अभियान झाले पाहिजे.

याचीच एक सुरुवात म्हणून सिंधु आत्मनिर्भर अभियानच्या माध्यमातून आम्ही अशा २० ते ४५ वयोगटातील व्यक्तींची गुगल अर्जाद्वारे माहिती गोळा करीत आहोत. या माहितीच्या आधाराने नोकरीसाठी इच्छुक आणि व्यवसायासाठी इच्छुक असे वर्गीकरण करता येईल. त्यात नोकरीसाठीचे कौशल्य आणि व्यवसायासाठीचे आवडीचे क्षेत्र लक्षात येईल.सध्याचा आर्थिक स्तर व अपेक्षा लक्षात येतील. त्या अनुषंगाने त्यांना योग्य मार्गदर्शन, आत्मविश्वास, प्रशिक्षण, विविध सरकारी योजना आणि बँकामार्फत आर्थिक साहाय्य अशा बाबी उपलब्ध करून देणे सोयीचे होईल. यासाठी भारतीय जनता पार्टी व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या सहयोगाने आम्ही प्रयत्नशील आहोत. जास्तीत जास्त मुंबईकर मंडळींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही काळसेकर यांनी केले.

टॅग्स :BJPभाजपाAtul Kalasekarअतुल काळसेकरsindhudurgसिंधुदुर्ग