शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चाकरमान्यांसाठी सिंधुआत्मनिर्भर अभियान : अतुल काळसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 16:12 IST

कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आत्मनिर्भर अभियानासाठी समन्वय समिती गठीत केलेली आहे. अनेक अनुभवी आणि सेवाव्रती मार्गदर्शकांच्या मदतीने या अभियानाचे नियोजन केलेले आहे. पहिल्या टप्प्यात गावाकडे स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या चाकरमानी मंडळींची गुगल अर्जाच्या सहाय्याने माहिती संकलित करून त्याचे वर्गीकरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देचाकरमान्यांसाठी सिंधुआत्मनिर्भर अभियान : अतुल काळसेकरगुगल अर्जाच्या माध्यमातून माहिती संकलनास सुरुवात

कणकवली : कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आत्मनिर्भर अभियानासाठी समन्वय समिती गठीत केलेली आहे. अनेक अनुभवी आणि सेवाव्रती मार्गदर्शकांच्या मदतीने या अभियानाचे नियोजन केलेले आहे. पहिल्या टप्प्यात गावाकडे स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या चाकरमानी मंडळींची गुगल अर्जाच्या सहाय्याने माहिती संकलित करून त्याचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. या गुगल अर्जाची लिंक संबंधितांना पाठविण्यात आली असून इच्छुकांनी अर्ज भरून पाठवावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी केले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या कोरोना आपत्तीच्या अनुषंगाने आपल्याला महत्त्वाच्या दोन संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यातले एक आहे आरोग्य आणि दुसरे आहे ते आर्थिक संकट. या दोन्ही संकटांच्या अनुषंगाने आपली अनेक चाकरमानी मंडळी आपापल्या गावी परतलेली आहेत.

भविष्यात मुंबईतील परिस्थिती काय वळण घेईल ते आज सांगणे अवघड आहे. पण अशाही परिस्थितीत ज्यांना मुंबई किंवा शहर सोडणे शक्य होणार नाही अशी मंडळी ही परिस्थिती आटोक्यात आल्यावर माघारी फिरतील.अशा चाकरमानी बांधवांसमोर अनेक आव्हाने आहेत. मग ती कौटुंबीक, सामाजिक असतील किंवा नोकरी व्यवसायाबाबत. त्यामुळे समस्त समाजाने त्यांच्यासोबत राहिले पाहिजे. जिल्हाभर ही एक चळवळ झाली पाहिजे. हे एक अभियान झाले पाहिजे.

याचीच एक सुरुवात म्हणून सिंधु आत्मनिर्भर अभियानच्या माध्यमातून आम्ही अशा २० ते ४५ वयोगटातील व्यक्तींची गुगल अर्जाद्वारे माहिती गोळा करीत आहोत. या माहितीच्या आधाराने नोकरीसाठी इच्छुक आणि व्यवसायासाठी इच्छुक असे वर्गीकरण करता येईल. त्यात नोकरीसाठीचे कौशल्य आणि व्यवसायासाठीचे आवडीचे क्षेत्र लक्षात येईल.सध्याचा आर्थिक स्तर व अपेक्षा लक्षात येतील. त्या अनुषंगाने त्यांना योग्य मार्गदर्शन, आत्मविश्वास, प्रशिक्षण, विविध सरकारी योजना आणि बँकामार्फत आर्थिक साहाय्य अशा बाबी उपलब्ध करून देणे सोयीचे होईल. यासाठी भारतीय जनता पार्टी व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या सहयोगाने आम्ही प्रयत्नशील आहोत. जास्तीत जास्त मुंबईकर मंडळींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही काळसेकर यांनी केले.

टॅग्स :BJPभाजपाAtul Kalasekarअतुल काळसेकरsindhudurgसिंधुदुर्ग