शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांसाठी सिंधुआत्मनिर्भर अभियान : अतुल काळसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 16:12 IST

कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आत्मनिर्भर अभियानासाठी समन्वय समिती गठीत केलेली आहे. अनेक अनुभवी आणि सेवाव्रती मार्गदर्शकांच्या मदतीने या अभियानाचे नियोजन केलेले आहे. पहिल्या टप्प्यात गावाकडे स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या चाकरमानी मंडळींची गुगल अर्जाच्या सहाय्याने माहिती संकलित करून त्याचे वर्गीकरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देचाकरमान्यांसाठी सिंधुआत्मनिर्भर अभियान : अतुल काळसेकरगुगल अर्जाच्या माध्यमातून माहिती संकलनास सुरुवात

कणकवली : कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आत्मनिर्भर अभियानासाठी समन्वय समिती गठीत केलेली आहे. अनेक अनुभवी आणि सेवाव्रती मार्गदर्शकांच्या मदतीने या अभियानाचे नियोजन केलेले आहे. पहिल्या टप्प्यात गावाकडे स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या चाकरमानी मंडळींची गुगल अर्जाच्या सहाय्याने माहिती संकलित करून त्याचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. या गुगल अर्जाची लिंक संबंधितांना पाठविण्यात आली असून इच्छुकांनी अर्ज भरून पाठवावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी केले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या कोरोना आपत्तीच्या अनुषंगाने आपल्याला महत्त्वाच्या दोन संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यातले एक आहे आरोग्य आणि दुसरे आहे ते आर्थिक संकट. या दोन्ही संकटांच्या अनुषंगाने आपली अनेक चाकरमानी मंडळी आपापल्या गावी परतलेली आहेत.

भविष्यात मुंबईतील परिस्थिती काय वळण घेईल ते आज सांगणे अवघड आहे. पण अशाही परिस्थितीत ज्यांना मुंबई किंवा शहर सोडणे शक्य होणार नाही अशी मंडळी ही परिस्थिती आटोक्यात आल्यावर माघारी फिरतील.अशा चाकरमानी बांधवांसमोर अनेक आव्हाने आहेत. मग ती कौटुंबीक, सामाजिक असतील किंवा नोकरी व्यवसायाबाबत. त्यामुळे समस्त समाजाने त्यांच्यासोबत राहिले पाहिजे. जिल्हाभर ही एक चळवळ झाली पाहिजे. हे एक अभियान झाले पाहिजे.

याचीच एक सुरुवात म्हणून सिंधु आत्मनिर्भर अभियानच्या माध्यमातून आम्ही अशा २० ते ४५ वयोगटातील व्यक्तींची गुगल अर्जाद्वारे माहिती गोळा करीत आहोत. या माहितीच्या आधाराने नोकरीसाठी इच्छुक आणि व्यवसायासाठी इच्छुक असे वर्गीकरण करता येईल. त्यात नोकरीसाठीचे कौशल्य आणि व्यवसायासाठीचे आवडीचे क्षेत्र लक्षात येईल.सध्याचा आर्थिक स्तर व अपेक्षा लक्षात येतील. त्या अनुषंगाने त्यांना योग्य मार्गदर्शन, आत्मविश्वास, प्रशिक्षण, विविध सरकारी योजना आणि बँकामार्फत आर्थिक साहाय्य अशा बाबी उपलब्ध करून देणे सोयीचे होईल. यासाठी भारतीय जनता पार्टी व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या सहयोगाने आम्ही प्रयत्नशील आहोत. जास्तीत जास्त मुंबईकर मंडळींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही काळसेकर यांनी केले.

टॅग्स :BJPभाजपाAtul Kalasekarअतुल काळसेकरsindhudurgसिंधुदुर्ग