शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शॉर्टसर्किटने काजू कलमे जळाली लाखो रुपयांचे नुकसान : निरवडे-माळकरवाडी माळावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 17:36 IST

निरवडे-माळकरवाडी येथे विद्युत खांबावर शार्टसर्किट झाल्याने आगीची  ठिणगी उडून  माळावरील  सुमारे सहाशे काजू कलमे जळून ग्रामस्थांचे लाखो

सावंतवाडी : निरवडे-माळकरवाडी येथे विद्युत खांबावर शार्टसर्किट झाल्याने आगीची  ठिणगी उडून  माळावरील सुमारे सहाशे काजू कलमे जळून ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी दुपारी  साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

निरवडे येथे साई होली फेथ स्कूलनजीक असलेल्या माळरानावर तेथील ग्रामस्थांची काजू बागायत आहे. सुमारे तीन वर्षांची असलेली काजू कलमे गुरुवारी दुपारी लागलेल्या या आगीत जळून खाक झाली. बागायतीमधून गेलेल्या विद्युत वाहिनीत शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली. दरम्यान, रस्त्याने जाणाºया वाहन चालकाने हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या नजरेस आणून दिला. त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, भर दुपार असल्याने व वारा असल्याने आग भडकली. यात ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे ठरले.

आगीत रंजन गावडे, रुक्मिणी गावडे, दत्ताराम गावडे, यशोदा गावडे, कालिंदी माळकर, दीपक जोशी आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जळालेल्या ६०० काजू कलमांसोबत सात आंबा कलमेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यात झाडावरील आंबे व काजू कलमांवरील काजू अक्षरश: होरपळून गेली. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांच्या डोळ््यात अश्रू दाटून आले होते. 

नुकसानीचा नेमका आकडा समजला नसला तरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच निरवडे सरपंच प्रमोद गावडे, पोलीस पाटील अजित वैज यांच्यासह वीज वितरण अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. निवडणुकीची  रणधुमाळी असल्याने महसूल यंत्रणा घटनास्थळी पोहोचू शकली नाही. मात्र, कृषी विभागाकडून सायंकाळी उशिरा आगीचा पंचनामा करण्यात आल्याचे निरवडे सरपंच प्रमोद गावडे यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग