शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शॉर्टसर्किटने काजू कलमे जळाली लाखो रुपयांचे नुकसान : निरवडे-माळकरवाडी माळावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 17:36 IST

निरवडे-माळकरवाडी येथे विद्युत खांबावर शार्टसर्किट झाल्याने आगीची  ठिणगी उडून  माळावरील  सुमारे सहाशे काजू कलमे जळून ग्रामस्थांचे लाखो

सावंतवाडी : निरवडे-माळकरवाडी येथे विद्युत खांबावर शार्टसर्किट झाल्याने आगीची  ठिणगी उडून  माळावरील सुमारे सहाशे काजू कलमे जळून ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी दुपारी  साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

निरवडे येथे साई होली फेथ स्कूलनजीक असलेल्या माळरानावर तेथील ग्रामस्थांची काजू बागायत आहे. सुमारे तीन वर्षांची असलेली काजू कलमे गुरुवारी दुपारी लागलेल्या या आगीत जळून खाक झाली. बागायतीमधून गेलेल्या विद्युत वाहिनीत शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली. दरम्यान, रस्त्याने जाणाºया वाहन चालकाने हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या नजरेस आणून दिला. त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, भर दुपार असल्याने व वारा असल्याने आग भडकली. यात ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे ठरले.

आगीत रंजन गावडे, रुक्मिणी गावडे, दत्ताराम गावडे, यशोदा गावडे, कालिंदी माळकर, दीपक जोशी आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जळालेल्या ६०० काजू कलमांसोबत सात आंबा कलमेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यात झाडावरील आंबे व काजू कलमांवरील काजू अक्षरश: होरपळून गेली. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांच्या डोळ््यात अश्रू दाटून आले होते. 

नुकसानीचा नेमका आकडा समजला नसला तरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच निरवडे सरपंच प्रमोद गावडे, पोलीस पाटील अजित वैज यांच्यासह वीज वितरण अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. निवडणुकीची  रणधुमाळी असल्याने महसूल यंत्रणा घटनास्थळी पोहोचू शकली नाही. मात्र, कृषी विभागाकडून सायंकाळी उशिरा आगीचा पंचनामा करण्यात आल्याचे निरवडे सरपंच प्रमोद गावडे यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग