शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी प्रकल्प गेल्यास शिवसेना नेत्यांना कदापी माफी नाही : जठार यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 20:10 IST

nanar refinery project Pramod Jathar Sindhudurg : शिवसेनेच्या विरोधामुळे नाणारमधून रिफायनरीने गाशा गुंडाळला आहे. तर आता याच तालुक्यातील बारसू - सोलगाव येथील जागेसाठी रिफायनरी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यातही अपयश आल्यास ही कंपनी महाराष्ट्राबाहेर जाणार आहे. तसे झाल्यास खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांची कोकणच्या राजकारणातून कायमची हकालपट्टी झालीच म्हणून समजा, त्यांना कदापि माफी नाही, असा इशारा भाजप नेते प्रमोद जठार यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.

ठळक मुद्देरिफायनरी प्रकल्प गेल्यास शिवसेना नेत्यांना कदापी माफी नाही : जठार यांचा इशारा प्रमोद जठार यांचा इशारा : विनायक राऊत, राजन साळवींनी केला कडवा विरोध

कणकवली : शिवसेनेच्या विरोधामुळे नाणारमधून रिफायनरीने गाशा गुंडाळला आहे. तर आता याच तालुक्यातील बारसू - सोलगाव येथील जागेसाठी रिफायनरी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यातही अपयश आल्यास ही कंपनी महाराष्ट्राबाहेर जाणार आहे. तसे झाल्यास खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांची कोकणच्या राजकारणातून कायमची हकालपट्टी झालीच म्हणून समजा, त्यांना कदापि माफी नाही, असा इशारा भाजप नेते प्रमोद जठार यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे अधिक माहिती देताना प्रमोद जठार म्हणाले, नाणारमधील प्रस्तावित असलेल्या १४ गावांतील तब्बल साडेआठ हजार एकरांचे जमीन मालक शेतकरी व भूधारकांनी त्या भागात रिफायनरी व्हावी, यासाठी जोरदार प्रयत्न करून शासनापर्यंत लेखी संमतीपत्रे पोहोचवली होती. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख असताना जाहीर केलेली नाणार विरोधाची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम ठेवल्याने अखेर रत्नागिरी रिफायनरी कंपनीने नाणारमधून काढता पाय घेतला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी नाणार येथे रिफायनरी प्रकल्पाला कडवा विरोध केला होता.अकरा हजार एकरात एकही गाव, वाडीचे विस्थापन नाहीआता नाणारनंतर राजापूर तालुक्यातील शहरानजीकच्या बारसू व सोलगाव या ठिकाणच्या जागेत रिफायनरी कंपनी चाचपणी करत आहे. याठिकाणी शिवसेनेच्याच उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसी अंतर्गत बारसू, सोलगाव वरचीवाडी याठिकाणी २३०० एकरासाठी अधिसूचना काढली आहे. तर त्या परिसरातील ११ हजार ५०० एकर जमीन उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या साडेअकरा हजार एकरात एकही गाव अथवा वाडीचे विस्थापन नसल्याने रिफायनरी कंपनीसाठी ही बाब लाभदायक ठरली आहे.जनताच हद्दपार करेलया भागातील बऱ्याच ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात असल्याने शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अजून तरी याठिकाणी विरोधाची भूमिका कोणी घेतली नाही, मात्र पुन्हा नाणारची री ओढली गेल्यास रिफायनरी रत्नागिरी जिल्ह्यातून गाशा गुंडाळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. तसे झाल्यास कोकणच्या राजकारणातून खासदार राऊत आणि आमदार साळवी यांना जनताच हद्दपार करेल, असा दावा प्रमोद जठार यांनी केला आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पPramod Jatharप्रमोद जठारBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग