शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
9
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
12
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
13
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
14
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
15
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
16
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
17
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
18
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
19
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
20
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

रिफायनरी प्रकल्प गेल्यास शिवसेना नेत्यांना कदापी माफी नाही : जठार यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 20:10 IST

nanar refinery project Pramod Jathar Sindhudurg : शिवसेनेच्या विरोधामुळे नाणारमधून रिफायनरीने गाशा गुंडाळला आहे. तर आता याच तालुक्यातील बारसू - सोलगाव येथील जागेसाठी रिफायनरी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यातही अपयश आल्यास ही कंपनी महाराष्ट्राबाहेर जाणार आहे. तसे झाल्यास खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांची कोकणच्या राजकारणातून कायमची हकालपट्टी झालीच म्हणून समजा, त्यांना कदापि माफी नाही, असा इशारा भाजप नेते प्रमोद जठार यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.

ठळक मुद्देरिफायनरी प्रकल्प गेल्यास शिवसेना नेत्यांना कदापी माफी नाही : जठार यांचा इशारा प्रमोद जठार यांचा इशारा : विनायक राऊत, राजन साळवींनी केला कडवा विरोध

कणकवली : शिवसेनेच्या विरोधामुळे नाणारमधून रिफायनरीने गाशा गुंडाळला आहे. तर आता याच तालुक्यातील बारसू - सोलगाव येथील जागेसाठी रिफायनरी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यातही अपयश आल्यास ही कंपनी महाराष्ट्राबाहेर जाणार आहे. तसे झाल्यास खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांची कोकणच्या राजकारणातून कायमची हकालपट्टी झालीच म्हणून समजा, त्यांना कदापि माफी नाही, असा इशारा भाजप नेते प्रमोद जठार यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे अधिक माहिती देताना प्रमोद जठार म्हणाले, नाणारमधील प्रस्तावित असलेल्या १४ गावांतील तब्बल साडेआठ हजार एकरांचे जमीन मालक शेतकरी व भूधारकांनी त्या भागात रिफायनरी व्हावी, यासाठी जोरदार प्रयत्न करून शासनापर्यंत लेखी संमतीपत्रे पोहोचवली होती. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख असताना जाहीर केलेली नाणार विरोधाची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम ठेवल्याने अखेर रत्नागिरी रिफायनरी कंपनीने नाणारमधून काढता पाय घेतला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी नाणार येथे रिफायनरी प्रकल्पाला कडवा विरोध केला होता.अकरा हजार एकरात एकही गाव, वाडीचे विस्थापन नाहीआता नाणारनंतर राजापूर तालुक्यातील शहरानजीकच्या बारसू व सोलगाव या ठिकाणच्या जागेत रिफायनरी कंपनी चाचपणी करत आहे. याठिकाणी शिवसेनेच्याच उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसी अंतर्गत बारसू, सोलगाव वरचीवाडी याठिकाणी २३०० एकरासाठी अधिसूचना काढली आहे. तर त्या परिसरातील ११ हजार ५०० एकर जमीन उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या साडेअकरा हजार एकरात एकही गाव अथवा वाडीचे विस्थापन नसल्याने रिफायनरी कंपनीसाठी ही बाब लाभदायक ठरली आहे.जनताच हद्दपार करेलया भागातील बऱ्याच ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात असल्याने शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अजून तरी याठिकाणी विरोधाची भूमिका कोणी घेतली नाही, मात्र पुन्हा नाणारची री ओढली गेल्यास रिफायनरी रत्नागिरी जिल्ह्यातून गाशा गुंडाळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. तसे झाल्यास कोकणच्या राजकारणातून खासदार राऊत आणि आमदार साळवी यांना जनताच हद्दपार करेल, असा दावा प्रमोद जठार यांनी केला आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पPramod Jatharप्रमोद जठारBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग