शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

शिवसेनेकडे विकासाची दूरदृष्टी नाही -: नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 23:51 IST

काहीही झाले तरी आमदार वैभव नाईक निवडून येता कामा नये, जिल्ह्यात भाजप किती मजबूत आहे हे दाखवून देण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागा, गाफील राहू नका, असे आवाहन ही राणे यांनी कार्यकर्त्यांना केले.

ठळक मुद्देभाजप-स्वाभिमानचा कार्यकर्ता मेळावा, भाजप मजबुतीसाठी काम करा

कुडाळ : गेल्या पाच वर्षात या जिल्ह्यातील शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी जिल्ह्यात विकासात्मक काहीच काम केले नाही. त्यांच्याकडे दूरदृष्टी नाही. नाईक यांना बोलता येत नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांच्या प्रचारार्थ कुडाळ येथील संयुक्त कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केली. काहीही झाले तरी आमदार वैभव नाईक निवडून येता कामा नये, जिल्ह्यात भाजप किती मजबूत आहे हे दाखवून देण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागा, गाफील राहू नका, असे आवाहन ही राणे यांनी कार्यकर्त्यांना केले.

भाजप व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांच्या प्रचारार्थ कुडाळ येथे संयुक्त कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उमेदवार रणजित देसाई, जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर, संग्राम देसाई, राजू राऊळ, अंकुश जाधव, प्रभाकर सावंत, भाई सावंत, निलेश तेंडुलकर, संध्या तेरसे, विवेक मांडकुलकर, दादा साहिल, राकेश कांदे, विनायक राणे, विकास कुडाळकर, बंड्या सावंत, राजा प्रभू, प्रशांत राणे, चारुदत्त देसाई, दादा बेळणेकर, आनंद शिरवलकर, योगेश बेळणेकर, प्रशांत राणे, दीपक नारकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली गेली पाहिजे. मात्र शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी गेल्या पाच वर्षात या जिल्ह्यात एकही प्रकल्प, विकास काम आणले नाही. विमानतळ सुरू नाही, रेडी बंदर पूर्ण नाही, अनेक प्रकल्प बंदावस्थेत आहेत. त्यांनी विकास केलाच नाही. त्यामुळे विकासाच्याबाबत बोलूच शकत नाहीत, असा टोला राणे यांनी केसरकर, राऊत व नाईक यांना लगावला. मी जनतेचा सेवक आहे. पदासाठी काम करीत नाही तर पदे आपल्यापर्यंत येतात, असे त्यांनी सांगितले. पदाधिकारी, कार्यकर्ता हा दत्ता सामंत यांच्यासारखा असला पाहिजे. त्यांच्याकडे प्रामाणिकता आहे. त्यामुळे त्यांच्यासमवेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक आले. स्वत:च्या खिशात हात घालून खर्च करण्याची त्यांची दानत आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक उमेदवारी अर्ज दाखल करायला येतात, हे त्यांनी गेल्या २५ ते ३0 वर्षात केलेल्या कामाची पोचपावती आहे. त्यामुळे भविष्यात त्यांचा योग्य मानसन्मान केला जाईल. मात्र आम्हाला सोडून गेलेल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य निघून गेले आहे. त्यांची भविष्यात अवस्था बिकट आहे, असा टोला त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना लगावला.

मी एका दिवसात आमदार झालो : सामंतयावेळी बोलताना दत्ता सामंत यांनी सांगितले की, मी उमेदवार म्हणून इच्छुक नव्हतो. सतीश सावंत इच्छुक होते. त्यांनाच उमेदवारी मिळणार होती. मात्र कोणालाच काही न सांगता निघून गेले. लढ म्हणणारा शिवसेनेचा वाघ कोल्हा झाला. रणांगणात न लढता आमदार नाईक पळकुटे निघाले. व मी एका दिवसात आमदार झाल्यासारखे वाटले. सत्तेसाठी शिवसेनेच्या कुबड्याची गरज लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अतुल काळसेकर यांनीही आपले विचार मांडले. 

भाजप हाऊसफुलयावेळी बोलताना प्रमोद जठार यांनी सांगितले की, नारायण राणे यांच्यामुळे भाजपात मेघा भरती होऊन पक्ष हायजॅक नाही तर हाऊस फुल्ल झाला आहे. सिंधुदुर्गातील भाजपचा आता वनवास संपला आहे. नारायण राणे यांनीच शिवसेना वाढवली, व तेच खरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व शिवसेनेचे खरे वारसदार आहेत, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणेBJPभाजपा