शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Assembly Election 2019 : शेतकऱ्यांच्या नेतृत्वासाठी विधानसभेत पाठवा : सतीश सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:08 IST

शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी मला विधानसभेत पाठवा. शेतकरी समृद्ध करणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन कणकवली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या नेतृत्वासाठी विधानसभेत पाठवा : सतीश सावंत देवगड तालुक्यात गावभेट दौरा, फणसगांव येथे ग्रामस्थांशी संवाद

देवगड : मी सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांसह गोरगरिबांची मला जाण आहे. मीही गरिबी अनुभवली आहे. मी स्वत: शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या घामाचे मोल मला माहीत आहे. शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी मला विधानसभेत पाठवा. शेतकरी समृद्ध करणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन कणकवली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी केले.

देवगड तालुक्यातील फणसगांव येथे प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रसाद करंदीकर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर आदी उपस्थित होते.मी ३५ वर्षे राजकीय क्षेत्रात आहे. मी उपभोगलेल्या पदांना नेहमी न्याय दिला आहे. शेतकºयांसह गोरगरिबांसाठी या पदांचा उपयोग केला. पदे घेऊन माझे उत्पन्न वाढविले नाही. जनतेच्या हितासाठी कामे केली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा अध्यक्ष झाल्यापासून शेतकरी व सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविल्या आहेत.

या केलेल्या कामाची जनतेकडे पोचपावती मागत आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांनीही आमच्यावर विनाकारण टीका न करता आपण केलेल्या कामाची पोचपावती मागावी. जनता त्याचे उत्तर देईल. असे सावंत यांनी पोंभुर्ले येथे बोलताना सांगितले.यावेळी उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर, माजी तालुकाप्रमुख प्रसाद करंदीकर, विठ्ठलवाडी सरपंच दिनेश नारकर, उंडील सरपंच जयेश नर, पोंभुर्ले सरपंच सादीक डोंगरकर, माजी सरपंच गणपत धुरी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अशोक पाडावे, गोविंद घाडी उपस्थित होते.विद्यमान आमदार जनतेची कामे करण्यात अपयशी ठरले आहेत. पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले हे विचारण्याची गरज आहे. केवळ राडेबाजी व दहशत माजवून साºयांना त्रास दिला.

अधिकाऱ्यांवरील चिखलफेक प्रकरणामुळे राज्यात जिल्ह्याची मान शरमेने खाली गेली आहे. ही संस्कृती साऱ्यासाठी घातक आहे, असे त्यांनी कोर्ले येथे सांगितले. यावेळी माजी तालुकाप्रमुख प्रसाद करंदीकर, विठ्ठलवाडी सरपंच दिनेश नारकर, उंडील सरपंच जयेश नर आदी उपस्थित होते.नीतेश राणेंनी नाणारबाबत भूमिका स्पष्ट करावीनाणारमुळे शेतकऱ्यांसह मच्छिमार उद्ध्वस्त होणार आहेत. कोकणाला हानिकारक ठरणारा प्रदूषणकारी प्रकल्प आम्हांला नको आहे. आमचा या प्रकल्पाला विरोध आहे. आमची विरोधाची भूमिका आम्ही कायम ठेवली आहे.आम्ही रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही. सहा महिन्यांपूर्वी विरोधाची भाषा करणाऱ्या नीतेश राणे यांनी आपली याबाबतची भूमिका आता जाहीर करावी, असे सतीश सावंत यांनी धालवली येथे सांगितले.

टॅग्स :kankavli-acकणकवलीsindhudurgसिंधुदुर्गSatish Sawantसतीश सावंत