शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Maharashtra Assembly Election 2019 : शेतकऱ्यांच्या नेतृत्वासाठी विधानसभेत पाठवा : सतीश सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:08 IST

शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी मला विधानसभेत पाठवा. शेतकरी समृद्ध करणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन कणकवली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या नेतृत्वासाठी विधानसभेत पाठवा : सतीश सावंत देवगड तालुक्यात गावभेट दौरा, फणसगांव येथे ग्रामस्थांशी संवाद

देवगड : मी सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांसह गोरगरिबांची मला जाण आहे. मीही गरिबी अनुभवली आहे. मी स्वत: शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या घामाचे मोल मला माहीत आहे. शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी मला विधानसभेत पाठवा. शेतकरी समृद्ध करणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन कणकवली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी केले.

देवगड तालुक्यातील फणसगांव येथे प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रसाद करंदीकर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर आदी उपस्थित होते.मी ३५ वर्षे राजकीय क्षेत्रात आहे. मी उपभोगलेल्या पदांना नेहमी न्याय दिला आहे. शेतकºयांसह गोरगरिबांसाठी या पदांचा उपयोग केला. पदे घेऊन माझे उत्पन्न वाढविले नाही. जनतेच्या हितासाठी कामे केली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा अध्यक्ष झाल्यापासून शेतकरी व सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविल्या आहेत.

या केलेल्या कामाची जनतेकडे पोचपावती मागत आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांनीही आमच्यावर विनाकारण टीका न करता आपण केलेल्या कामाची पोचपावती मागावी. जनता त्याचे उत्तर देईल. असे सावंत यांनी पोंभुर्ले येथे बोलताना सांगितले.यावेळी उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर, माजी तालुकाप्रमुख प्रसाद करंदीकर, विठ्ठलवाडी सरपंच दिनेश नारकर, उंडील सरपंच जयेश नर, पोंभुर्ले सरपंच सादीक डोंगरकर, माजी सरपंच गणपत धुरी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अशोक पाडावे, गोविंद घाडी उपस्थित होते.विद्यमान आमदार जनतेची कामे करण्यात अपयशी ठरले आहेत. पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले हे विचारण्याची गरज आहे. केवळ राडेबाजी व दहशत माजवून साºयांना त्रास दिला.

अधिकाऱ्यांवरील चिखलफेक प्रकरणामुळे राज्यात जिल्ह्याची मान शरमेने खाली गेली आहे. ही संस्कृती साऱ्यासाठी घातक आहे, असे त्यांनी कोर्ले येथे सांगितले. यावेळी माजी तालुकाप्रमुख प्रसाद करंदीकर, विठ्ठलवाडी सरपंच दिनेश नारकर, उंडील सरपंच जयेश नर आदी उपस्थित होते.नीतेश राणेंनी नाणारबाबत भूमिका स्पष्ट करावीनाणारमुळे शेतकऱ्यांसह मच्छिमार उद्ध्वस्त होणार आहेत. कोकणाला हानिकारक ठरणारा प्रदूषणकारी प्रकल्प आम्हांला नको आहे. आमचा या प्रकल्पाला विरोध आहे. आमची विरोधाची भूमिका आम्ही कायम ठेवली आहे.आम्ही रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही. सहा महिन्यांपूर्वी विरोधाची भाषा करणाऱ्या नीतेश राणे यांनी आपली याबाबतची भूमिका आता जाहीर करावी, असे सतीश सावंत यांनी धालवली येथे सांगितले.

टॅग्स :kankavli-acकणकवलीsindhudurgसिंधुदुर्गSatish Sawantसतीश सावंत