शहरं
Join us  
Trending Stories
1
"कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तिनं सांगितलं होतं...!"; सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचं मोठं विधान
2
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
3
₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
4
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
5
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
6
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
7
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
8
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
9
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
10
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
11
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
13
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
14
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
15
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
16
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
17
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
18
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
19
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!

Maharashtra Assembly Election 2019 : शेतकऱ्यांच्या नेतृत्वासाठी विधानसभेत पाठवा : सतीश सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:08 IST

शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी मला विधानसभेत पाठवा. शेतकरी समृद्ध करणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन कणकवली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या नेतृत्वासाठी विधानसभेत पाठवा : सतीश सावंत देवगड तालुक्यात गावभेट दौरा, फणसगांव येथे ग्रामस्थांशी संवाद

देवगड : मी सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांसह गोरगरिबांची मला जाण आहे. मीही गरिबी अनुभवली आहे. मी स्वत: शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या घामाचे मोल मला माहीत आहे. शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी मला विधानसभेत पाठवा. शेतकरी समृद्ध करणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन कणकवली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी केले.

देवगड तालुक्यातील फणसगांव येथे प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रसाद करंदीकर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर आदी उपस्थित होते.मी ३५ वर्षे राजकीय क्षेत्रात आहे. मी उपभोगलेल्या पदांना नेहमी न्याय दिला आहे. शेतकºयांसह गोरगरिबांसाठी या पदांचा उपयोग केला. पदे घेऊन माझे उत्पन्न वाढविले नाही. जनतेच्या हितासाठी कामे केली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा अध्यक्ष झाल्यापासून शेतकरी व सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविल्या आहेत.

या केलेल्या कामाची जनतेकडे पोचपावती मागत आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांनीही आमच्यावर विनाकारण टीका न करता आपण केलेल्या कामाची पोचपावती मागावी. जनता त्याचे उत्तर देईल. असे सावंत यांनी पोंभुर्ले येथे बोलताना सांगितले.यावेळी उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर, माजी तालुकाप्रमुख प्रसाद करंदीकर, विठ्ठलवाडी सरपंच दिनेश नारकर, उंडील सरपंच जयेश नर, पोंभुर्ले सरपंच सादीक डोंगरकर, माजी सरपंच गणपत धुरी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अशोक पाडावे, गोविंद घाडी उपस्थित होते.विद्यमान आमदार जनतेची कामे करण्यात अपयशी ठरले आहेत. पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले हे विचारण्याची गरज आहे. केवळ राडेबाजी व दहशत माजवून साºयांना त्रास दिला.

अधिकाऱ्यांवरील चिखलफेक प्रकरणामुळे राज्यात जिल्ह्याची मान शरमेने खाली गेली आहे. ही संस्कृती साऱ्यासाठी घातक आहे, असे त्यांनी कोर्ले येथे सांगितले. यावेळी माजी तालुकाप्रमुख प्रसाद करंदीकर, विठ्ठलवाडी सरपंच दिनेश नारकर, उंडील सरपंच जयेश नर आदी उपस्थित होते.नीतेश राणेंनी नाणारबाबत भूमिका स्पष्ट करावीनाणारमुळे शेतकऱ्यांसह मच्छिमार उद्ध्वस्त होणार आहेत. कोकणाला हानिकारक ठरणारा प्रदूषणकारी प्रकल्प आम्हांला नको आहे. आमचा या प्रकल्पाला विरोध आहे. आमची विरोधाची भूमिका आम्ही कायम ठेवली आहे.आम्ही रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही. सहा महिन्यांपूर्वी विरोधाची भाषा करणाऱ्या नीतेश राणे यांनी आपली याबाबतची भूमिका आता जाहीर करावी, असे सतीश सावंत यांनी धालवली येथे सांगितले.

टॅग्स :kankavli-acकणकवलीsindhudurgसिंधुदुर्गSatish Sawantसतीश सावंत