शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यासाठी गर्दी, लांबच रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 19:01 IST

Coroanavirusunlock, teacher, sindhudurgnews ,educationsector, गेले आठ महिने बंद असलेल्या माध्यमिक शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी मोहीम १८ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. कणकवली तालुक्यातील ही चाचणी कणकवली शासकीय विश्रामगृहात होत आहे. १८ ते २२ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत तालुक्यातील एकूण ३६६ कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यासाठी गर्दी, लांबच रांग २३ नोव्हेंबरला शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना तपासणी मोहीम सुरू

तळेरे : गेले आठ महिने बंद असलेल्या माध्यमिक शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी मोहीम १८ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. कणकवली तालुक्यातील ही चाचणी कणकवली शासकीय विश्रामगृहात होत आहे. १८ ते २२ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत तालुक्यातील एकूण ३६६ कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येणार आहे.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड १९ची चाचणी मोहीम जिल्हाभर सुरू आहे. कणकवली तालुक्यातील माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचणीचा प्रारंभ १८ नोव्हेंबरपासून झाला आहे. तालुक्यातील ३१ शाळांमधील ३०० शिक्षक व ६६ शिक्षकेतर कर्मचारी मिळून ३६६ कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात येणार आहे.

गुरुवारपर्यंत करंजे, घोणसरी, नांदगाव, करुळ, हडपीड, एस. एम. हुंबरठ, आदर्श विद्यामंदिर सावडाव, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तळेरे हायस्कूल, एन. व्ही. मालंडकर कॉलेज, विद्यामंदिर हायस्कूल आदी शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. उर्वरित २० शाळांच्या चाचण्या पुढील तीन दिवसांत घेतल्या जाणार आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी लेखी दिली आहे.शाळेत विविध ठिकाणचे विद्यार्थी येणार आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची चाचणी महत्त्वाची नसून त्यांना निव्वळ काही नियम व अटींचे बंधन घालण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थी सुरक्षित कसे राहू शकतील? केवळ कर्मचाऱ्यांची चाचणी करून विद्यार्थी सुरक्षित कसे राहू शकतात? असा प्रश्न अनेक कर्मचाऱ्यांना पडला आहे.चाचणी बंधनकारककणकवली शासकीय विश्राम गृहाबाहेर सकाळपासून कर्मचाऱ्यांच्या रांगा लागलेल्या असतात. लॉकडाऊन काळात सर्व यंत्रणा बंद होती. त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यानुसार २३ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ही चाचणी करणे बंधनकारक आहे. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकTeacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग