शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतमालासाठी प्रत्येक तालुक्यात विक्री केंद्र : सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 17:09 IST

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आता आरोग्यदायी सेंद्रीय पद्धतीने पिकवित आहेत. मात्र, त्यांच्या या शेतमालाला शासनाच्या धोरणानुसार थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावे यादृष्टीने प्रत्येक तालुक्यात विक्री केंद्र सुरू करणार असल्याची माहिती भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस बाळासाहेब सावंत यांनी कुडाळ आणि कणकवली येथे झालेल्या बैठकीत दिली.

ठळक मुद्देशेतमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध होणार भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस बाळासाहेब सावंत यांची माहितीसिंधुदुर्ग जिल्ह्यात सेंद्रीय पद्धतीने पिकवलेली पिके आरोग्यदायी सिंधुदुर्ग भाजप किसान मोर्चा बैठक कणकवलीत

कणकवली ,दि. ०२ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आता पूर्वीप्रमाणे भातशेती व्यतिरिक्त अन्य नगदी पिकांकडे वळत आहे. ही पिके आरोग्यदायी सेंद्रीय पद्धतीने पिकवित आहेत. मात्र, त्याची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्यांच्या या शेतमालाला शासनाच्या धोरणानुसार थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावे यादृष्टीने प्रत्येक तालुक्यात विक्री केंद्र सुरू करणार असल्याची माहिती भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस बाळासाहेब सावंत यांनी कुडाळ आणि कणकवली येथे झालेल्या बैठकीत दिली.

भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्गच्या कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकारी, यांची बैठक कुडाळ एमआयडीसी विश्रांतीगृह तर कणकवली, वैभववाडी, देवगड तालुक्यातील पदाधिकारी आदींची बैठक कणकवली शासकीय विश्रामगृहात झाली. त्यावेळी सावंत बोलत होेते.

कुडाळच्या बैठकीस सूर्यकांत दळवी, सदानंद राऊळ, दोडामार्ग तालुकाध्यक्ष डॉ. बाबासाहेब राणे, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष कृषी उद्योजक डॉ. सचिन दळवी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष तुकाराम आमोणकर, कुडाळचे गुरूनाथ पाटील, कुडाळ पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमळकर, महिला बचतगट प्रमुख दीपा काळे, हर्षदा कानिवडेकर, मालवण तालुकाध्यक्ष नंदकिशोर नरे, प्रा. संदीप शिऊलकर, डॉ. सुधीर राणे, प्रगतशील शेतकरी माधव शेगले, रमाकांत ठाकूर, कणकवलीच्या बैठकीस तालुकाध्यक्ष गणपत चव्हाण, वैभववाडी तालुकाध्यक्ष समाधान काडगे, देवगड समीर आचरेकर, तुकाराम गावकर, विजय शेट्ये आदी उपस्थित होते. या सर्वांनी चर्चेत भाग घेतला.

सावंत यांनी तालुकास्तरावर विक्री केंद्रासाठी दुकानगाळे उपलब्ध व्हावेत यासाठी तालुकास्तरीय नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देण्यात आली आहेत. अशी माहिती देऊन ते म्हणाले, ही कामे मार्गी लावण्याच्यादृष्टीने लवकरच भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाºयांची भेट घेणार आहोत. किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमृत चौघुले हे राज्यस्तरीय किसान मोर्चाच्या बैठकीसाठी मुंबईत गेल्याने त्या बैठकीना उपलब्ध राहू शकले नाहीत.

शेतीविषयक योजनाशेतकºयांच्या हिताच्यादृष्टीने जिल्हास्तरीय कृषी आणि पशुपालन समिती निर्माण करावी, अल्प भूधारक शेतकºयांना पशुपालन समिती निर्माण करावी, अल्पभूधारक शेतकºयांना पशुपालन योजनेचा लाभ मिळावा. सर्प, प्राणी आणि पर्यावरण मित्र यांना वनविभागाने स्वयंसेवक म्हणून ओळखपत्रे द्यावीत, शासनाच्या शेतीविषयक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी किसान मोर्चा काम करणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती