शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतमालासाठी प्रत्येक तालुक्यात विक्री केंद्र : सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 17:09 IST

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आता आरोग्यदायी सेंद्रीय पद्धतीने पिकवित आहेत. मात्र, त्यांच्या या शेतमालाला शासनाच्या धोरणानुसार थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावे यादृष्टीने प्रत्येक तालुक्यात विक्री केंद्र सुरू करणार असल्याची माहिती भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस बाळासाहेब सावंत यांनी कुडाळ आणि कणकवली येथे झालेल्या बैठकीत दिली.

ठळक मुद्देशेतमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध होणार भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस बाळासाहेब सावंत यांची माहितीसिंधुदुर्ग जिल्ह्यात सेंद्रीय पद्धतीने पिकवलेली पिके आरोग्यदायी सिंधुदुर्ग भाजप किसान मोर्चा बैठक कणकवलीत

कणकवली ,दि. ०२ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आता पूर्वीप्रमाणे भातशेती व्यतिरिक्त अन्य नगदी पिकांकडे वळत आहे. ही पिके आरोग्यदायी सेंद्रीय पद्धतीने पिकवित आहेत. मात्र, त्याची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्यांच्या या शेतमालाला शासनाच्या धोरणानुसार थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावे यादृष्टीने प्रत्येक तालुक्यात विक्री केंद्र सुरू करणार असल्याची माहिती भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस बाळासाहेब सावंत यांनी कुडाळ आणि कणकवली येथे झालेल्या बैठकीत दिली.

भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्गच्या कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकारी, यांची बैठक कुडाळ एमआयडीसी विश्रांतीगृह तर कणकवली, वैभववाडी, देवगड तालुक्यातील पदाधिकारी आदींची बैठक कणकवली शासकीय विश्रामगृहात झाली. त्यावेळी सावंत बोलत होेते.

कुडाळच्या बैठकीस सूर्यकांत दळवी, सदानंद राऊळ, दोडामार्ग तालुकाध्यक्ष डॉ. बाबासाहेब राणे, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष कृषी उद्योजक डॉ. सचिन दळवी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष तुकाराम आमोणकर, कुडाळचे गुरूनाथ पाटील, कुडाळ पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमळकर, महिला बचतगट प्रमुख दीपा काळे, हर्षदा कानिवडेकर, मालवण तालुकाध्यक्ष नंदकिशोर नरे, प्रा. संदीप शिऊलकर, डॉ. सुधीर राणे, प्रगतशील शेतकरी माधव शेगले, रमाकांत ठाकूर, कणकवलीच्या बैठकीस तालुकाध्यक्ष गणपत चव्हाण, वैभववाडी तालुकाध्यक्ष समाधान काडगे, देवगड समीर आचरेकर, तुकाराम गावकर, विजय शेट्ये आदी उपस्थित होते. या सर्वांनी चर्चेत भाग घेतला.

सावंत यांनी तालुकास्तरावर विक्री केंद्रासाठी दुकानगाळे उपलब्ध व्हावेत यासाठी तालुकास्तरीय नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देण्यात आली आहेत. अशी माहिती देऊन ते म्हणाले, ही कामे मार्गी लावण्याच्यादृष्टीने लवकरच भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाºयांची भेट घेणार आहोत. किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमृत चौघुले हे राज्यस्तरीय किसान मोर्चाच्या बैठकीसाठी मुंबईत गेल्याने त्या बैठकीना उपलब्ध राहू शकले नाहीत.

शेतीविषयक योजनाशेतकºयांच्या हिताच्यादृष्टीने जिल्हास्तरीय कृषी आणि पशुपालन समिती निर्माण करावी, अल्प भूधारक शेतकºयांना पशुपालन समिती निर्माण करावी, अल्पभूधारक शेतकºयांना पशुपालन योजनेचा लाभ मिळावा. सर्प, प्राणी आणि पर्यावरण मित्र यांना वनविभागाने स्वयंसेवक म्हणून ओळखपत्रे द्यावीत, शासनाच्या शेतीविषयक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी किसान मोर्चा काम करणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती