शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

कामगारांची सुरक्षितता ऐरणीवर, महामार्ग ठेकेदार कंपनीचा गलथान कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 11:44 IST

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना कर्मचारी जीव धोक्यात घालून लोखंडी शिडीच्या सहाय्याने तीस ते चाळीस फूट उंचावर चढून बॉक्सवेल भिंतीच्या काही भागांना तडे गेले असताना डागडुजीचे काम करीत असल्याने महामार्ग कामगारांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.

ठळक मुद्देमहामार्ग ठेकेदार कंपनीचा गलथान कारभारअधिकाऱ्यांनी लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना तळगाव ते कलमठ टप्प्यात अनेक ठिकाणी उड्डाणपूल व बॉक्सवेलची कामे सुरू आहेत. कर्मचारी जीव धोक्यात घालून लोखंडी शिडीच्या सहाय्याने तीस ते चाळीस फूट उंचावर चढून बॉक्सवेल भिंतीच्या काही भागांना तडे गेले असताना डागडुजीचे काम करीत असल्याने महामार्गकामगारांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. यामुळे यावर ठेकेदार कंपनीसह महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.मुंबई-गोवा महामार्गावर अंतर्गत चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून डागडुजी करण्याचे काम आजही सुरू आहे. त्यात सतत पडणारा पाऊस ठेकेदार कंपनीला चिंतेत पाडणारा असून अति पावसामुळे अनेक ठिकाणी कामाचा पोलखोल झालेला दिसून आला आहे.यातच ठेकेदार कंपनी डागडुजी करून आपले काम करून घेत आहे. कणकवली शहराप्रमाणे इतर भागातही बॉक्सवेल व उड्डाणपुलाचे काम सुरू असताना काही भाग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात सत्ताधारी व विरोधी नेते मंडळी फक्त आश्वासन देऊन ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरण यांना पुन्हा काम करायला भाग पाडू असे सांगतात. मात्र, डागडुजीशिवाय यापुढे काहीच झालेले दिसत नाही.प्रारंभी सध्या संरक्षक भिंतीना गेलेल्या तड्यांना सिमेंट व वाळू यांचे मिश्रण करून मुलामा देताना दिसून येत आहे. यामध्ये ठेकेदार कंपनीचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून तीस ते चाळीस फूट उंचावर शिडीवर चढून हातात सिंमेटचे भरलेले घमेले घेऊन बॉक्सवेल भिंतीचे तडे बुजवित आहेत.सद्यस्थितीत याठिकाणी ठेकेदार कंपनी अशा कर्मचाऱ्यांना डोक्यावर व अंगावर घालण्यास कोणतेही संरक्षक कीट न देता उंचावरील काम करून घेतात. खाली फक्त एखादा कर्मचारी अथवा सुपरवायझर उपस्थित असतात. अशाप्रकारे काम केल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. ठेकेदार कंपनी अशा बॉक्सवेलच्या कामाच्या दर्जाची हमी देत असल्याने वाहनचालक व नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. ठेकेदार मात्र, लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याच्या मागे लागला आहे.कर्मचाऱ्यांना संरक्षक कीट देण्याची गरजसध्या नांदगाव, कासार्डे, तळेरे येथे अशाप्रकारे पुलाच्या भिंतीना मुलामा देण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत कणकवलीसारखी घटना सुदैवाने तळगाव ते कलमठ टप्प्यात घडली नसल्याने या पुलाच्या कामांचा दर्जा आजपर्यंत तरी चांगला आहे.मात्र, ठेकेदार कंपनी सध्या कर्मचाऱ्यांना संरक्षण न देता करीत असलेली कामे धोका निर्माण करणारी असल्याने सर्वच कामे सुरू असताना कर्मचाऱ्यांना संरक्षक किटची गरज आहे. तसेच यावर महामार्ग प्राधिकरण कंपनीने लक्ष घालून सूचना देण्याची गरज आहे. अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षाLabourकामगारsindhudurgसिंधुदुर्ग