शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
3
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
4
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
5
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
6
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
7
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
8
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
9
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
10
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
11
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
12
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
13
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
14
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
15
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
16
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
17
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
18
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
19
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
20
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रुपेश नार्वेकर यांनी आंधळ्याचे सोंग सोडावे :  शिशिर परुळेकर यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 15:59 IST

Kankvali, politics, sindhdurugnews संदेश पारकर हे पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले त्या विजयामध्ये समीर नलावडे यांचे मोठे योगदान आहे. त्यानंतर पारकर आतापर्यंत केव्हाच नगराध्यक्ष होऊ शकले नाहीत. तर कणकवलीची सत्ता पण मिळवू शकलेले नाहीत. ही वस्तुस्थिती रुपेश नार्वेकर यांना माहीत असूनही ते आंधळ्याचे सोंग घेत आहेत . ते त्यांनी आधी बंद करावे आणि मगच टीका करावी. असा टोला नगरसेवक शिशीर परुळेकर यांनी लगावला आहे. ​​​​​​​

ठळक मुद्दे रुपेश नार्वेकर यांनी आंधळ्याचे सोंग सोडावे शिशिर परुळेकर यांचा टोला

कणकवली : संदेश पारकर हे पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले त्या विजयामध्ये समीर नलावडे यांचे मोठे योगदान आहे. त्यानंतर पारकर आतापर्यंत केव्हाच नगराध्यक्ष होऊ शकले नाहीत. तर कणकवलीची सत्ता पण मिळवू शकलेले नाहीत. ही वस्तुस्थिती रुपेश नार्वेकर यांना माहीत असूनही ते आंधळ्याचे सोंग घेत आहेत . ते त्यांनी आधी बंद करावे आणि मगच टीका करावी. असा टोला नगरसेवक शिशीर परुळेकर यांनी लगावला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कणकवली शहराच्या राजकारणात संदेश पारकर यांच्या पाठीशी समीर नलावडे होते म्हणूनच त्यांचे नाव जिल्ह्याभरात त्यावेळी मोठे झाले. पण जेव्हा नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पारकर यांची साथ सोडली त्यानंतर पारकर यांनी आपली राजकीय कारकीर्द मागे वळून पाहिली तर त्यांना भ्रमाचा भोपळा फुटल्याचे दिसेल. पारकर यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्या मदतीला धावून आलेले नगरसेवक रुपेश नार्वेकर हे पारकरांच्या उजाड झालेल्या शेतातले शेवटचे बुजगावणे आहेत.नार्वेकर यांनी आपला वापर करून घेणाऱ्या पारकरांबद्दल कितीवेळा गळा काढला असेल याचा आधी विचार करावा. समीर नलावडे यांच्या रत्नागिरी , पाली दौऱ्याशी जोडला जात असलेला संबंध हा पारकर यांचा दिशाभूल करण्याच्या राजकारणाचा एक भाग आहे.

खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्याशी निष्ठेने राहिल्यामुळेच समीर नलावडे यांना कणकवली नगरीचे नगराध्यक्ष पद मिळाले. मात्र राजकारणाच्या अधोगतीकडे चाललेल्या नार्वेकर यांच्या नेत्याकडून आतापर्यंत कणकवलीत अशीच दिशाभूल राजकारण करण्याची परंपरा सुरू आहे. ती नार्वेकर यांच्या रूपाने पुढे चालवली जात आहे. पारकर यांच्यामुळे नलावडेना आतापर्यंत पदे मिळाली हे नार्वेकर यांचे म्हणणे कितपत सत्य आहे ? ती मागच्या १५ वर्षाच्या निवडणूक आठवून पाहिल्या तर लक्षात येईल.नार्वेकर यांच्या नेत्याची कणकवलीत एवढीच ताकद होती तर ते स्वतः उभे राहूनही निवडणुकीला पराभूत झाले कसे ? आमदार नितेश राणे यांनी कणकवलीच्या विकासाचे व्हिजन घेत निवडणुकीत मते मागितली. मात्र , पारकरांची निवडणूक लढवणे ही भूमिका कशासाठी असते ते कणकवलीकरांसोबत आता सर्वच राजकीय पक्षांनाही माहिती झाले आहे. संदेश पारकर यांनी नारायण राणेंवर टीका करताना आपली क्षमता नाही हे ओळखले नाही. त्यामुळेच त्यांना ती आठवण करून देण्यासाठी नलावडे यांना उत्तर द्यावे लागले.ब्लॅकमेलिंग करणे हा रुपेश नार्वेकर यांच्या नेत्यांचा पूर्वांपार चालत आलेला धंदा आहे. नलावडे यांना दुसऱ्या पक्षात जाण्याची वेळच आलेली नाही किंवा येणार नाही. मात्र नार्वेकर यांच्या नेत्यांना मात्र दुसऱ्या पक्षातून विधान परिषदेची उमेदवारी मिळवण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. असेही या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग