शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
4
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
5
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
6
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
7
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
8
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
9
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
10
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
11
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
12
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
13
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
14
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
15
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
16
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
17
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
18
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
19
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
20
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर

रुपेश नार्वेकर यांनी आंधळ्याचे सोंग सोडावे :  शिशिर परुळेकर यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 15:59 IST

Kankvali, politics, sindhdurugnews संदेश पारकर हे पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले त्या विजयामध्ये समीर नलावडे यांचे मोठे योगदान आहे. त्यानंतर पारकर आतापर्यंत केव्हाच नगराध्यक्ष होऊ शकले नाहीत. तर कणकवलीची सत्ता पण मिळवू शकलेले नाहीत. ही वस्तुस्थिती रुपेश नार्वेकर यांना माहीत असूनही ते आंधळ्याचे सोंग घेत आहेत . ते त्यांनी आधी बंद करावे आणि मगच टीका करावी. असा टोला नगरसेवक शिशीर परुळेकर यांनी लगावला आहे. ​​​​​​​

ठळक मुद्दे रुपेश नार्वेकर यांनी आंधळ्याचे सोंग सोडावे शिशिर परुळेकर यांचा टोला

कणकवली : संदेश पारकर हे पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले त्या विजयामध्ये समीर नलावडे यांचे मोठे योगदान आहे. त्यानंतर पारकर आतापर्यंत केव्हाच नगराध्यक्ष होऊ शकले नाहीत. तर कणकवलीची सत्ता पण मिळवू शकलेले नाहीत. ही वस्तुस्थिती रुपेश नार्वेकर यांना माहीत असूनही ते आंधळ्याचे सोंग घेत आहेत . ते त्यांनी आधी बंद करावे आणि मगच टीका करावी. असा टोला नगरसेवक शिशीर परुळेकर यांनी लगावला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कणकवली शहराच्या राजकारणात संदेश पारकर यांच्या पाठीशी समीर नलावडे होते म्हणूनच त्यांचे नाव जिल्ह्याभरात त्यावेळी मोठे झाले. पण जेव्हा नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पारकर यांची साथ सोडली त्यानंतर पारकर यांनी आपली राजकीय कारकीर्द मागे वळून पाहिली तर त्यांना भ्रमाचा भोपळा फुटल्याचे दिसेल. पारकर यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्या मदतीला धावून आलेले नगरसेवक रुपेश नार्वेकर हे पारकरांच्या उजाड झालेल्या शेतातले शेवटचे बुजगावणे आहेत.नार्वेकर यांनी आपला वापर करून घेणाऱ्या पारकरांबद्दल कितीवेळा गळा काढला असेल याचा आधी विचार करावा. समीर नलावडे यांच्या रत्नागिरी , पाली दौऱ्याशी जोडला जात असलेला संबंध हा पारकर यांचा दिशाभूल करण्याच्या राजकारणाचा एक भाग आहे.

खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्याशी निष्ठेने राहिल्यामुळेच समीर नलावडे यांना कणकवली नगरीचे नगराध्यक्ष पद मिळाले. मात्र राजकारणाच्या अधोगतीकडे चाललेल्या नार्वेकर यांच्या नेत्याकडून आतापर्यंत कणकवलीत अशीच दिशाभूल राजकारण करण्याची परंपरा सुरू आहे. ती नार्वेकर यांच्या रूपाने पुढे चालवली जात आहे. पारकर यांच्यामुळे नलावडेना आतापर्यंत पदे मिळाली हे नार्वेकर यांचे म्हणणे कितपत सत्य आहे ? ती मागच्या १५ वर्षाच्या निवडणूक आठवून पाहिल्या तर लक्षात येईल.नार्वेकर यांच्या नेत्याची कणकवलीत एवढीच ताकद होती तर ते स्वतः उभे राहूनही निवडणुकीला पराभूत झाले कसे ? आमदार नितेश राणे यांनी कणकवलीच्या विकासाचे व्हिजन घेत निवडणुकीत मते मागितली. मात्र , पारकरांची निवडणूक लढवणे ही भूमिका कशासाठी असते ते कणकवलीकरांसोबत आता सर्वच राजकीय पक्षांनाही माहिती झाले आहे. संदेश पारकर यांनी नारायण राणेंवर टीका करताना आपली क्षमता नाही हे ओळखले नाही. त्यामुळेच त्यांना ती आठवण करून देण्यासाठी नलावडे यांना उत्तर द्यावे लागले.ब्लॅकमेलिंग करणे हा रुपेश नार्वेकर यांच्या नेत्यांचा पूर्वांपार चालत आलेला धंदा आहे. नलावडे यांना दुसऱ्या पक्षात जाण्याची वेळच आलेली नाही किंवा येणार नाही. मात्र नार्वेकर यांच्या नेत्यांना मात्र दुसऱ्या पक्षातून विधान परिषदेची उमेदवारी मिळवण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. असेही या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग