शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

कणकवलीतील रिंगरोड ठरणार पथदर्शी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 17:44 IST

Pwd Kankavli Sindhudurg- कणकवली शहराच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या रिंगरोडचा आचरा रोड ते गांगोमंदिर हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तर गांगोमंदिर ते चौंडेश्‍वरी मंदिर आणि तेथून रवळनाथ मंदिर या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे काम नगरपंचायतीने सुरू केले आहे. पाच टप्प्यात प्रस्तावित असलेला हा रिंगरोड नियोजनाप्रमाणे लवकर पूर्ण झाल्यास कणकवली शहर विकासाच्या दृष्टीने पथदर्शी ठरणार आहे.

ठळक मुद्देशहर विकासासाठी ठरणार महत्वपूर्ण ग्रामीण भागालाही होणार फायदा

सुधीर राणे

कणकवली : कणकवली शहराच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या रिंगरोडचा आचरा रोड ते गांगोमंदिर हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तर गांगोमंदिर ते चौंडेश्‍वरी मंदिर आणि तेथून रवळनाथ मंदिर या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे काम नगरपंचायतीने सुरू केले आहे. पाच टप्प्यात प्रस्तावित असलेला हा रिंगरोड नियोजनाप्रमाणे लवकर पूर्ण झाल्यास कणकवली शहर विकासाच्या दृष्टीने पथदर्शी ठरणार आहे.कणकवलीतील सर्व वाड्यांना जोडणारा हा रिंगरोड शहर विकास आराखड्यात सन १९९९ मध्ये समाविष्ट करण्यात आला होता. मात्र, निधीची कमतरता तसेच भूसंपादन प्रक्रियेतील अडथळे, काही जागा मालकांचा विरोध यामुळे हे काम मार्गी लागले नव्हते. एप्रिल २०१८ मध्ये नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली बंडू हर्णे आणि सहकाऱ्यांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून शहराची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर या रिंगरोडला प्राधान्य दिले. त्यानुसार रिंगरोडचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

त्याचे लोकार्पण गुरुवारी केले जाणार आहे. तर पुढील वर्षभरात दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण होणार आहे. निधीची उपलब्धता झाली तर चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील रिंगरोडचेही काम पुढील दोन वर्षात मार्गी लावण्याचा निर्धार नगराध्यक्ष व नगरसेवकांनी केला आहे.दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी सुमारे दोन कोटींचा खर्च येणार आहे. त्यासाठीची तरतूदही नगरपंचायतीने केली आहे. या रिंग रोडचा पहिला टप्पा आचरा रोड ते गांगो मंदिर, दुसरा टप्पा गांगोमंदिर ते चौंडेश्‍वरी मंदिर,तिसरा टप्पा चौडेंश्‍वरी मंदिर ते रवळनाथ मंदिर, चौथा टप्पा रवळनाथ मंदिर ते दत्तमंदिर बांधकरवाडी तिठा व पाचवा टप्पा नरडवे तिठा, बिजलीनगर, नेहरू नगर ते आशिये रोड असा आहे.अविकसित भाग होणार विकसितशहरातील बाजारपेठ आणि रेल्वेस्थानक रोड परिसरातच मोठ्या प्रमाणात निवासी, व्यापारी बांधकामे झाली. मात्र ,शहराचा उत्तर आणि पूर्व दिशेचा ६० टक्‍के भाग अंतर्गत रस्त्यांचे जाळे नसल्याने अविकसित राहिला आहे. हा भाग या रिंग रोडमुळे विकसित होणार आहे. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग