शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परिसंवेदनशील क्षेत्राला विरोध

By admin | Updated: February 18, 2015 23:46 IST

पश्चिम घाट परिसर : चिपळूण तालुक्यातील निम्म्या ग्रामपंचायतींचा ठराव

सुभाष कदम - चिपळूण -डोंगराळ प्रदेशाच्या विकासाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय विकास मंडळाच्या शिफारसीनुसार राज्यात पश्चिम घाट विकासाचा कार्यक्रम सुरु झाला. या घाटातील जैवविविधता अबाधित राहवी, येथील दुर्मिळ औषधी वनस्पतीचे रक्षण व्हावे व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबावा यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असली, तरी याला चिपळूण तालुक्यातील ४३ पैकी २० पेक्षा जास्त गावांनी विरोध केला आहे. तसे ग्रामसभेचे ठरावही झाले आहेत.पश्चिम घाट विकासासाठी राज्यात केंद्रपुरस्कृत कार्यक्रम राबवण्यात येत आहे. ज्या तालुक्यातील किमान २० टक्के क्षेत्र ६०० मीटर उंचीवर किंवा त्यापेक्षा जास्त उंचीवर आहे. अशा क्षेत्राचा पश्चिम घाट क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. राज्याच्या १२ जिल्ह्यातील ६३ तालुक्यामध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या क्षेत्रात लोक सहभागावर आधारित पर्यावरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा विचार आहे.शासनाने तालुकास्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून, परिक्षेत्र वन अधिकारी या योजनेचे सचिव आहेत. चिपळूण तालुक्यातील ४३ गावांचा परिसंवेदनशील क्षेत्रात सहभाग आहे. या गावातील सीमा व वर्णनानुसार क्षेत्र पडताळणी करण्याबाबत गाव समिती गठीत करून अहवाल पाठवायचा होता. या गावात जनसुनावणी घेऊन लोकांचे म्हणणे ऐकून घ्यायचे होते. अद्याप सर्वच गावात जनसुनावणी झालेली नाही. तहसीलदार यांनी सर्व ग्रामसेवकांना पत्र देऊन प्रक्रियेची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते. ग्रामसेवकांतर्फे ग्रामसमितीने परिशिष्ट ५ पूर्ण करण्यासाठी ७ जानेवारी, जनसुनावणी २२ जानेवारी, ग्रामसमितीने तालुका समितीस अहवाल सादर करण्यासाठी २५ जानेवारी ही अंतिम तारीख होती. या कालावधीत ही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. हे काम नक्की कोणी करायचे, याबाबत अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम आहे. सचिव परिक्षेत्र वन अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची असताना त्यांनाही अंमलबजावणीबाबत आजची स्थिती माहित नाही. यामध्ये आपल्या गावाचा समावेश करू नये, यासाठी तुरंबव, ढाकमोली, खरवते, कोंडमळा, अनारी, कादवड, तिवरे, तिवडी, रिक्टोली, नांदिवसे, स्वयंदेव आदी गावांनी ग्रामसभेत ठराव केले आहेत. सर्व गावांचे परिशिष्ट ५ तहसीलदारांकडे प्राप्त झाले आहेत, पण पुढील अहवाल मात्र अद्याप प्राप्त झालेले नाहीत.योजनेबाबत उदासीनताचिपळूण तालुक्यातील ४३ गावांमध्ये भविष्यात प्रदूषणकारी कारखाने, प्रकल्प येऊ नयेत, येथील पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, याची काळजी शासनस्तरावर घेतली जाणार असल्याने या गावांचा फायदाच आहे. हे ग्रामस्थांना शासनाने पटवून देणे आवश्यक आहे. खरवते गावाने याला विरोध दर्शवला आहे, पण कार्यशाळेत माहिती ऐकल्यावर ही चांगली योजना आहे, असे ग्रामस्थांचे मत झाले. आता ते आपला निर्णय बदलणार का, हा खरा प्रश्न आहे. अद्याप या योजनेबाबत उदासीनता आहे व ग्रामस्थांमध्ये संभ्रमही आहे. तो लवकरात लवकर दूर होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.