शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

परिसंवेदनशील क्षेत्राला विरोध

By admin | Updated: February 18, 2015 23:46 IST

पश्चिम घाट परिसर : चिपळूण तालुक्यातील निम्म्या ग्रामपंचायतींचा ठराव

सुभाष कदम - चिपळूण -डोंगराळ प्रदेशाच्या विकासाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय विकास मंडळाच्या शिफारसीनुसार राज्यात पश्चिम घाट विकासाचा कार्यक्रम सुरु झाला. या घाटातील जैवविविधता अबाधित राहवी, येथील दुर्मिळ औषधी वनस्पतीचे रक्षण व्हावे व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबावा यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असली, तरी याला चिपळूण तालुक्यातील ४३ पैकी २० पेक्षा जास्त गावांनी विरोध केला आहे. तसे ग्रामसभेचे ठरावही झाले आहेत.पश्चिम घाट विकासासाठी राज्यात केंद्रपुरस्कृत कार्यक्रम राबवण्यात येत आहे. ज्या तालुक्यातील किमान २० टक्के क्षेत्र ६०० मीटर उंचीवर किंवा त्यापेक्षा जास्त उंचीवर आहे. अशा क्षेत्राचा पश्चिम घाट क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. राज्याच्या १२ जिल्ह्यातील ६३ तालुक्यामध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या क्षेत्रात लोक सहभागावर आधारित पर्यावरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा विचार आहे.शासनाने तालुकास्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून, परिक्षेत्र वन अधिकारी या योजनेचे सचिव आहेत. चिपळूण तालुक्यातील ४३ गावांचा परिसंवेदनशील क्षेत्रात सहभाग आहे. या गावातील सीमा व वर्णनानुसार क्षेत्र पडताळणी करण्याबाबत गाव समिती गठीत करून अहवाल पाठवायचा होता. या गावात जनसुनावणी घेऊन लोकांचे म्हणणे ऐकून घ्यायचे होते. अद्याप सर्वच गावात जनसुनावणी झालेली नाही. तहसीलदार यांनी सर्व ग्रामसेवकांना पत्र देऊन प्रक्रियेची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते. ग्रामसेवकांतर्फे ग्रामसमितीने परिशिष्ट ५ पूर्ण करण्यासाठी ७ जानेवारी, जनसुनावणी २२ जानेवारी, ग्रामसमितीने तालुका समितीस अहवाल सादर करण्यासाठी २५ जानेवारी ही अंतिम तारीख होती. या कालावधीत ही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. हे काम नक्की कोणी करायचे, याबाबत अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम आहे. सचिव परिक्षेत्र वन अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची असताना त्यांनाही अंमलबजावणीबाबत आजची स्थिती माहित नाही. यामध्ये आपल्या गावाचा समावेश करू नये, यासाठी तुरंबव, ढाकमोली, खरवते, कोंडमळा, अनारी, कादवड, तिवरे, तिवडी, रिक्टोली, नांदिवसे, स्वयंदेव आदी गावांनी ग्रामसभेत ठराव केले आहेत. सर्व गावांचे परिशिष्ट ५ तहसीलदारांकडे प्राप्त झाले आहेत, पण पुढील अहवाल मात्र अद्याप प्राप्त झालेले नाहीत.योजनेबाबत उदासीनताचिपळूण तालुक्यातील ४३ गावांमध्ये भविष्यात प्रदूषणकारी कारखाने, प्रकल्प येऊ नयेत, येथील पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, याची काळजी शासनस्तरावर घेतली जाणार असल्याने या गावांचा फायदाच आहे. हे ग्रामस्थांना शासनाने पटवून देणे आवश्यक आहे. खरवते गावाने याला विरोध दर्शवला आहे, पण कार्यशाळेत माहिती ऐकल्यावर ही चांगली योजना आहे, असे ग्रामस्थांचे मत झाले. आता ते आपला निर्णय बदलणार का, हा खरा प्रश्न आहे. अद्याप या योजनेबाबत उदासीनता आहे व ग्रामस्थांमध्ये संभ्रमही आहे. तो लवकरात लवकर दूर होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.