शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : मिऱ्याप्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांनी पत्तनच्या अधिकाऱ्यांना खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 17:03 IST

शासनाकडूनच निधी आला नाही तर गोष्ट वेगळी. पण निधी मंजूर होऊनही तुम्ही दोन दोन वर्षे घालवता. मिऱ्या येथे केलेले काम १६ कोटींचे झाले म्हणता तर मग पंधरा वर्षे त्यात दुरूस्तीच करायला नको होती. पाच वर्षांच्या आतच काम पुन्हा करावे लागले तर कोण देणार निधी, अशा शब्दात जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी पत्तन विभागाच्या अधिकाºयांना आज खडसावले.

ठळक मुद्दे१६ कोटींच्या कामाची ५ वर्षातच वाट? मिऱ्याप्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांनी पत्तनच्या अधिकाऱ्यांना खडसावले

रत्नागिरी : शासनाकडूनच निधी आला नाही तर गोष्ट वेगळी. पण निधी मंजूर होऊनही तुम्ही दोन दोन वर्षे घालवता. मिऱ्या येथे केलेले काम १६ कोटींचे झाले म्हणता तर मग पंधरा वर्षे त्यात दुरूस्तीच करायला नको होती. पाच वर्षांच्या आतच काम पुन्हा करावे लागले तर कोण देणार निधी, अशा शब्दात जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले.आज मिऱ्यांवासीयांनी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. यावेळी त्यांना निवेदनही देण्यात आले. पत्तन विभाग निद्रिस्त असल्याचा आरोप करतानाच याठिकाणी केवळ दगड टाकण्याचेच काम केले असल्याचे आप्पा वांदरकर यांनी सांगितले.

मिरकरवाडा येथे ब्रेकवॉटरच्या दुसऱ्या टप्प्याच्या अर्धवट कामामुळे संपूर्ण मिऱ्या गाव पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. त्यामुळे पाहाणी करावी, अशी विनंतीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी याबाबत पत्तन अधिकाऱ्यांकडे विचारणा करता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. येथील काम का रेंगाळले, यावर या अधिकाऱ्यांनी यासाठी निधी मिळाला होता. मात्र, डिसेंबर २०१६पासून कंत्राटदार न मिळाल्याने काम रेंगाळल्याचे सांगितले.

शासनाने निधी देऊन दीड वर्ष झाले. पैसे देऊनही काम नाही, मग काय करत होतात? अशा शब्दात प्रदीप पी. यांनी या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. कामासाठी रस्ता मिळत नाही, ग्रामस्थ काम करू देत नाहीत, अशी कारणे या अधिकाऱ्यांनी सांगताच, याबाबत आपण लोकशाही दिनात किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार का केली नाहीत, असे विचारले.

पंधरामाड येथील बंधाºयासाठी १६ कोटीचा खर्च झाला. एवढा खर्च होऊन केवळ पाच वर्षातच ते काम परत करावे लागत असेल तर त्याचा उपयोग काय, असेही प्रदीप पी. म्हणाले.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय सालीम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हा धोका मिरकरवाडा येथील ब्रेकवॉटरमुळे झाल्याचे निदर्शनास आणून देऊन त्यावर उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावर प्रदीप पी. यांनी प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले यांना हे काम २००५च्या आराखड्यानुसार झालेले असले तरी त्याची रचना चुकीची झालेली आहे, की कामच झालेले नाही, याबाबत एखाद्या तंत्रज्ञाकडून माहिती घ्या तसेच मिरकरवाडा येथील या बंधाऱ्याचा अभ्यास होणे गरजेचे असल्याने तसे त्वरित सर्वेक्षण करण्यासाठी डब्ल्यूपीआरएस संस्थेला सांगा, अशा सूचना दिल्या.

टॅग्स :Mirkarwada Bandarमिरकरवाडा बंदरRatnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी