शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

राणेंचा प्रवेश स्वार्थासाठी! - संदेश पारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 7:21 PM

भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध लोकांचा पक्ष आहे़ देवगड नगरपंचायत निवडणुकीत आमदार नीतेश राणे यांच्या समर्थकांनी माजी आमदार अप्पासाहेब गोगटे यांच्या कार्यालयावर व माजी आमदार अजित गोगटे यांच्या घरावर अंडी फेकली होती. अशी अनेक कृत्ये त्यांनी केली आहेत. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपात प्रवेश देणार नाहीत.

ठळक मुद्देत्यांच्या प्रवेशाने भाजपचा फायदा नाही

कणकवली : माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे स्वत:च्या आणि आपल्या मुलांच्या स्वार्थासाठीच  भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपचा कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा कडाडून विरोध आहे. यासर्व बाबींचा विचार करून पक्षनेतृत्व त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांनी येथे केले. 

कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल, सरचिटणीस परशुराम झगडे, महेश सावंत आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.संदेश पारकर पुढे म्हणाले,  भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध लोकांचा पक्ष आहे़ देवगड नगरपंचायत निवडणुकीत आमदार नीतेश राणे यांच्या समर्थकांनी माजी आमदार अप्पासाहेब गोगटे यांच्या कार्यालयावर व माजी आमदार अजित गोगटे यांच्या घरावर अंडी फेकली होती. अशी अनेक कृत्ये त्यांनी केली आहेत. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपात प्रवेश देणार नाहीत.  यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये चारवेळा पराभव झाल्याने राणेंचा जनाधार संपलेला आहे.  त्यामुळे कोणाचा तरी टेकू  मिळविण्यासाठी व मुलांच्या पुर्नवसनासाठी राणेंची धडपड सुरू आहे. २०१९ मध्ये कणकवलीत राहीलेले राणेंचे अस्तित्व विधानसभा निवडणुकीत संपेल. त्यांना पुन्हा आपला जनाधार पहायचा असेल तर  स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून स्वबळावर ही निवडणूक लढवावी.

नारायण राणे यांनी स्वत:च कणकवली मतदार संघातून  भाजपाचा उमेदवार म्हणून नीतेश राणे यांचे नाव जाहीर केले आहे. मात्र,  राणेंना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला? विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जिल्हा व राज्य भाजपा कोअर कमिटीत चर्चा करून  मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा जाहीर करतील. राणेंचा २०१४ मध्ये कुडाळ आणि मुंबईत असे दोन वेळा पराभव झाला.  राणेंच्या मुलाचा २०१४ आणि २०१९ मध्ये पराभव झाला. राणेंचे चार पराभव झाले आहेत. त्यामुळे त्यांचा जनाधार संपलेला आहे. यामुळेच राणेंना भाजपात घेऊन फायदा होणार नाही.  उलट राणेंना फायदा होईल.  राणे स्वत:च मी भाजपात प्रवेश करणार अशा बातम्या पसरवून निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोप संदेश पारकर यांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा एकसंघ आहे. जिल्ह्यातील भाजपा वाढविण्यासाठी संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण,  विनोद तावडे, आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार तसेच अन्य पदाधिकाºयांनी  फार मेहनत घेतली आहे. जिल्ह्यात भाजपा संघटना मजबूत आहे.

राणे १९९० मध्ये जिल्ह्यात आल्यानंतर मुंबईतील गुंड आणून दहशत पसरवायचे. कालांतराने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनाच गुंड बनविल्याने अनेक जणांना कारावास झाला आहे. त्याला जबाबदार कोण? त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे हे सर्व पाहाता  भाजपात त्यांना प्रवेश मिळणार नाही. त्यांचा प्रवेश होणार असता तर यापूर्वीच झाला असता, असाटोलाही संदेश पारकर यांनी यावेळी लगावला.राणेंची सर्वच पक्षांवर टीका

नारायण राणे आतापर्यंत ज्या पक्षात गेले तेथील पक्ष नेतृत्वावर त्यांनी  टीका केली आहे. शिवसेना, काँग्रेस या पक्षात असताना त्यांनी टीका केली. तर भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार झाल्यावरही त्यांनी विश्वास यात्रा काढत भाजपवर टीका केली, असेही पारकर म्हणाले.

 

टॅग्स :konkanकोकणNarayan Raneनारायण राणे