शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

राजापूर तालुक्यात नाणार येथे होणारा ग्रीन रिफायनरी पर्यावरणाला बाधक नाही : प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 18:25 IST

गिर्ये-रामेश्वर येथे जागतिक दर्जाचे बंदर होणार असून त्यासाठी त्याठिकाणी जमीन हस्तांतरित करण्यासाठी शासनाने नोटीस काढलेली आहे. ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा राजापूर तालुक्यात नाणार येथे होणार असून हा प्रकल्प पर्यावरणाला बाधक ठरणारा नसल्याची माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. देवगड पंचायत समितीमधील सभापतींच्या दालनामध्ये पंचायत समितीच्या विकासकामांच्या पाठपुरावा बैठकीच्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देदेवगड पंचायत समिती येथील बैठकीत आढावाप्राथमिक प्रक्रियेला शेतकऱ्यांना नोटीस देऊन सुरुवात हजारो बेरोजगारांना प्रकल्प रोजगार देणार

देवगड : गिर्ये-रामेश्वर येथे जागतिक दर्जाचे बंदर होणार असून त्यासाठी त्याठिकाणी जमीन हस्तांतरित करण्यासाठी शासनाने नोटीस काढलेली आहे. ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा राजापूर तालुक्यात नाणार येथे होणार असून हा प्रकल्प पर्यावरणाला बाधक ठरणारा नसल्याची माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. देवगड पंचायत समितीमधील सभापतींच्या दालनामध्ये पंचायत समितीच्या विकासकामांच्या पाठपुरावा बैठकीच्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.देवगड पंचायत समितीमधील सभापती जयश्री आडिवरेकर यांच्या दालनामध्ये माजी आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पंचायत समितीच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण शासन स्तरावरती करण्यासाठी विकासकामांच्या पाठपुरावा बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी सभापती जयश्री आडिवरेकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी शारदा नाडेकर, संतोष किंजवडेकर, जयदेव कदम, पंचायत समिती सदस्य रवींद्र तिर्लोटकर, सदाशिव ओगले, सुनील पारकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर व पंचायत समितीच्या सर्व खात्यांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

भाजपाचे महाराष्ट्रामध्ये सरकार असून यामुळे आपण पंचायत समितीमध्ये प्रलंबित राहिलेल्या कामांची माहिती घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्या त्या खात्याच्या मंत्रिमहोदयांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार असल्याचे जठार यांनी सांगितले. शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, कृषी विभाग, सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत विभाग अशा विभागांच्या प्रलंबित कामांची माहिती जठार यांनी जाणून घेतली. 

हजारोंना रोजगार देणार गिर्ये-रामेश्वर या ठिकाणी विजयदुर्ग बंदर होण्यासाठी जागा हस्तांतरित करण्याच्या प्राथमिक प्रक्रियेला शेतकऱ्यांना नोटीस देऊन सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा औष्णीक प्रकल्प होणार नाही. या ठिकाणी जागतिक दर्जाचे बंदर निर्माण होऊन आयात-निर्यात या ठिकाणावरुन करणार आहे.

ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा राजापूर तालुक्यात नाणार या ठिकाणी होणार आहे. हा प्रकल्प हजारो बेरोजगारांना रोजगार देणारा ठरणार आहे. या ग्रीन रिफायनरी  प्रकल्पासाठी आयात व निर्यात विजयदुर्ग बंदरामधून केली जाणार आहे. यामुळेच विजयदुर्ग बंदर विकसित होण्यासाठी गिर्ये-रामेश्वर येथे शासन जमीन हस्तांतरित करणार असल्याची माहिती प्रमोद जठार यांनी दिली. ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा पर्यावरणाचा ऱ्हास करणारा नसून हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन येथे आर्थिक सुबत्ता आणणारा प्रकल्प आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरी