शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली तालुक्यात पावसाचा जोर कायम: महामार्गावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 11:24 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून रविवारी सकाळपासून अधून-मधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, या पावसाने कुठेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद आपत्ती नियंत्रण कक्षात झालेली नव्हती.

ठळक मुद्दे कणकवली तालुक्यात पावसाचा जोर कायम: महामार्गावर खड्डेच खड्डेनद्या, नाले पुन्हा एकदा तुडुंब : महामार्गावर खड्डेच खड्डे

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून रविवारी सकाळपासून अधून-मधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, या पावसाने कुठेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद आपत्ती नियंत्रण कक्षात  झालेली नव्हती.कणकवली तालुक्यात मागील दोन-चार दिवस जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे तालुक्यातील नद्या, नाल्यांची पुन्हा पाण्याची पातळी वाढली आहे. यावर्षी पाऊस काहीसा उशिराने पडायला सुरुवात झाली होती. मात्र, गतवर्षीप्रमाणेच तालुक्यात पावसाने आतापर्यंत सरासरी गाठली आहे. या सातत्यपूर्ण पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.गेला आठवडाभर जोरदार पडणाºया पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत.कणकवली शहरालगत असलेल्या गडनदी व जानवली नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे पादचाऱ्यांवर चिखलाचे पाणी उडत आहे.रविवारी मुंबई-गोवा महामार्गावरील प्रांताधिकारी कार्यालयासमोरून जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते.

त्यामुळे या रस्त्यावरून चालताना पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच वाहन चालकांनाही वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत होती. पाऊस थांबल्यावर येथील पाणी ओसरले. अशीच स्थिती शहरातील काही ठिकाणच्या रस्त्यांवर दिसून येत होती.वाहनचालकांना करावी लागतेय कसरतमुंबई-गोवा महामार्गावर दोन आठवड्यांपूर्वी नव्याने पावसाळी डांबरीकरण करून महामार्ग तयार केला होता. ज्याठिकाणी खड्डे पडले होते त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात महामार्गाच्या ठेकेदाराने खड्डे बुजविले होते. मात्र, दोन आठवड्यांनंतर पुन्हा महामार्गावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना या मार्गावर मोठी कसरत करावी लागत आहे. गेले दोन दिवस पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाल्याने त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून खड्डे मोठे होत आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. 

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग