शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

कणकवलीला पावसाचा फटका, रामेश्वर प्लाझात पाणी शिरले, लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 16:35 IST

कणकवली शहरासह परिसरात गेले दोन दिवस धुवाँधार बरसणाऱ्या पावसाचा फटका नागरिकांना रविवारी बसला. अनेक ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच महामार्ग ठेकेदाराने चौपदरीकरणाचे काम करताना आवश्यक ती काळजी न घेतल्याने गटारे, नाले तुंबून नागरी वस्तीत पाणी साचत आहे.

ठळक मुद्देकणकवली शहराला पावसाचा फटका, रामेश्वर प्लाझात पाणी शिरले, लाखो रुपयांचे नुकसाननागरिकांनी केले मदत कार्य; तहसीलदार कार्यालयामागील रस्त्यावर पाणी

कणकवली : कणकवली शहरासह परिसरात गेले दोन दिवस धुवाँधार बरसणाऱ्या पावसाचा फटका नागरिकांना रविवारी बसला. अनेक ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच महामार्ग ठेकेदाराने चौपदरीकरणाचे काम करताना आवश्यक ती काळजी न घेतल्याने गटारे, नाले तुंबून नागरी वस्तीत पाणी साचत आहे.मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करीत असताना ठेकेदार कंपनीकडून अ‍ॅड. उमेश सावंत यांच्या निवासस्थानाजवळील नाल्याचे काम अपूर्ण ठेवण्यात आले आहे. त्यातच हॉटेल गोकुळधामच्या बाजूने पाणी विसर्गासाठी असलेला पाईपदेखील मातीच्या भरावामुळे बंद झाला होता. त्यामुळे पावसाचे पाणी रामेश्वर प्लाझामधील सारस्वत बँकेसह तेथील अनेक दुकानांमध्ये घुसले. तेथील निवासी संकुलाजवळील ४ चारचाकी गाड्या तसेच १२ दुचाकी आणि तीन विहिरी रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पाण्याखाली गेल्या होत्या.या परिसरात पाणी भरताच संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी नागरिकानी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता भ्रमणध्वनी बंद अथवा नॉटरिचेबल असल्याचा संदेश मिळत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली. वाहतूक पोलीस प्रकाश गवस, भूषण सुतार आदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांची समजूत काढत वाहतूक सुरळीत केली.पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचले होते. कणकवलीतील अनेक घरांमध्ये पाणी घुसले. याबाबत माहिती समजताच पाण्याचा विसर्ग करण्यासाठी सकाळपासूनच नगरसेवक अबिद नाईक, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, माजी जिल्हा परिषद सदस्या सुगंधा दळवी, नगरसेविका मेघा गांगण, विराज भोसले, सुशांत दळवी, संजय मालंडकर, संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, अण्णा कोदे, प्रदीप मांजरेकर, राजू राठोड , सचिन सावंत, मिथुन ठाणेकर, बंडू गांगण, सुशील पारकर, अरुण चव्हाण, शामसुंदर दळवी, अभय राणे, बच्चू प्रभुगावकर यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न केले.महामार्ग ठेकेदाराच्या अनास्थेचा फटकाकणकवलीत नाले, गटारे, मोऱ्या यांचे काम व्यवस्थित न केल्यामुळे कणकवली तुंबणार हे निश्चितच होते. त्याची प्रचिती पुन्हा एकदा रविवारी कणकवलीवासीयांना आली. महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व ठेकेदाराच्या अनास्थेमुळेच कणकवली पहिल्याच पावसात पाण्याखाली गेली. ही पावसाची सुरुवात असताना अनेक ठिकाणी घातलेला मातीचा भराव खचला आहे.

उबाळे मेडिकलसमोरील नालादेखील दोन्ही बाजूंनी खचत चालला आहे. अ‍ॅड. उमेश सावंत यांच्या घराशेजारील नाल्याचे काम व्यवस्थितरित्या करावे यासाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकवेळा आवाज उठविला होता़ तरीसुध्दा दिलीप बिल्डकॉनच्या मुजोर अधिकाऱ्यांनी चालढकलपणा केला आहे. त्यामुळे कणकवलीकरांची लाखो रूपयांची हानी झाली आहे.तहसीलदारांनी दिले पंचनाम्याचे आदेश!कणकवली शहरात घरे, दुकाने, विहिरी, गाड्यांचे नुकसान पावसाच्या पाण्याने झाल्याने प्रभारी तहसीलदार आर. जे. पवार यांनी स्वत: सकाळपासूनच घटनास्थळी उपस्थिती दर्शविली. तलाठी अजय परब तसेच महसूलच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. नागरिकांचे झालेले नुकसान पाहून तहसीलदार आर. जे. पवार यांनी नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी, मंडल अधिकाºयांना दिले. तसेच संबंधित ठेकेदाराच्या कामाबाबत तहसीलदारांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.नदी, नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ !धुवाँधार पावसाने नदी, नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गडनदी, जानवली नदी यांच्या पाण्याची पातळी वाढली असून कनकनगर तसेच मराठा मंडळ येथील बंधाऱ्यांवरूनही काही काळ पाणी वाहत असल्याने तेथील मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले होते. तेथील पाण्याच्या प्रवाहाचे दृश्य बघण्यासाठी तसेच आपल्या भ्रमणध्वनीच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेक नागरिकांनी हजेरी लावली होती. त्यात तरुणाईचे प्रमाण जास्त होते.विजेचा लपंडाव दिवसभर सुरूच!एकीकडे जोरदार पाऊस पडत असतानाच कणकवलीसह परिसरात रविवारी दिवभर विजेचा लपंडाव अधूनमधून सुरू होता. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. रविवारची सुटी असल्याने शासकीय कार्यालये तसेच खासगी आस्थापने, बँका बंद होत्या. त्यामुळे त्यांना वीज प्रवाह खंडित होण्याचा फटका बसला नाही.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग