शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

पुन्हा लॉकडाऊनची वेळ जनतेने आणू नये, ज्येष्ठांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:03 IST

Senior Citizen, Coronavirus Unlock, sindhudurg लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने ज्येष्ठ नागरिक आता घराबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची वेळ जनतेने आणू नये. त्यासाठी कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचे पालन करावे, असा सल्ला अनेक ज्येष्ठ नागरिकांकडून दिला जात आहे.

ठळक मुद्देपुन्हा लॉकडाऊनची वेळ जनतेने आणू नये, ज्येष्ठांचे आवाहन आवश्यक नियमांचे पालन करावे

कणकवली : कोरोनाचा धोका ज्येष्ठांना अधिक असल्याने लॉकडाऊन सुरू झाल्यापासूनच त्यांना घरातच थांबावे लागले आहे. त्यामुळे त्यांची विविध प्रकारे गैरसोय झाली आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने ज्येष्ठ नागरिक आता घराबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची वेळ जनतेने आणू नये. त्यासाठी कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचे पालन करावे, असा सल्ला अनेक ज्येष्ठ नागरिकांकडून दिला जात आहे.कोरोनाचा धोका ज्येष्ठ नागरिकांना अधिक असल्याने लॉकडाऊन सुरू होताच ज्येष्ठ नागरिकांच्या फिरण्यावर बंधने आली होती. त्यामुळे त्यांचा सकाळी आणि संध्याकाळी फिरण्याचा व्यायाम बंद झाला होता.

काहींची मुले परदेशात अथवा मुंबई, पुण्यासारख्या शहरात होती. त्यामुळे घरात वयोवृद्ध पती-पत्नी दोघेच होती. त्यामुळे किराणा, दूध, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू किंवा तातडीची औषधे आणण्यासाठी बाहेर पडताही येत नव्हते. तसेच ऐनवेळी काही त्रास झाला तर डॉक्टरांकडे जाणेही शक्य होत नव्हते.अशावेळी ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक वेळी शेजाऱ्यांचे सहकार्य मिळतेच असे नाही. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली होती. आता लॉकडाऊन शिथिल झाले तरीही ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडायला सरकारने पूर्णतः मुभा दिलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात घरात राहून ज्येष्ठ नागरिक कंटाळले.लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यक्तींना योग्य वेळी उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांचे मृत्यू या काळात झाले. अनेक ठिकाणी उपचारासाठी बाहेर नेण्यासाठी वाहनाची उपलब्धता नव्हती तर काही ठिकाणी डॉक्टर वेळेवर उपलब्ध झाले नाहीत, ही त्यामागची मुख्य कारणे होती. त्यामुळे लॉकडाऊन कधी संपतेय, असे सर्वाना वाटत होते. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनचे संकट नको, असेच ज्येष्ठ नागरिकांना वाटते.नियम पाळा, कोरोना टाळाकोरोनाला टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेत नियम पाळले तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येणार नाही, असे मत ज्येष्ठ व्यक्त करीत आहेत. पुन्हा लॉकडाऊन झाले तर ज्येष्ठ नागरिकांचेच अधिक हाल होतील, असे त्यांना वाटते. त्यामुळे ही वेळ येऊ न देण्यासाठी प्रत्येकानेच काळजी घ्यायला हवी, असे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.शिस्त पाळायला हवीकोरोनाने देशावरच मोठे संकट आणले आहे. त्यामुळे नाईलाजाने सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. मात्र, सर्वांनीच शिस्त पाळणे गरजेचे आहे. तरच कोरोनाचा संसर्ग टाळता येईल व प्रभावदेखील कमी होईल आणि संकटातून मुक्ती मिळेल.

पुन्हा लॉकडाऊन नकोच !लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद होते. त्यामुळे देशाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांचे हाल अधिक झाले. काहींच्या घरात दुसरे कुणीच नसल्याने महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणे मुश्किल झाले होते. काही वेळा आजारी असतानाही औषधोपचार मिळत नव्हता. आता थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन नको.- दादा कुडतरकर,जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, सिंधुुुदुर्ग

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकsindhudurgसिंधुदुर्ग