शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पुन्हा लॉकडाऊनची वेळ जनतेने आणू नये, ज्येष्ठांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:03 IST

Senior Citizen, Coronavirus Unlock, sindhudurg लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने ज्येष्ठ नागरिक आता घराबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची वेळ जनतेने आणू नये. त्यासाठी कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचे पालन करावे, असा सल्ला अनेक ज्येष्ठ नागरिकांकडून दिला जात आहे.

ठळक मुद्देपुन्हा लॉकडाऊनची वेळ जनतेने आणू नये, ज्येष्ठांचे आवाहन आवश्यक नियमांचे पालन करावे

कणकवली : कोरोनाचा धोका ज्येष्ठांना अधिक असल्याने लॉकडाऊन सुरू झाल्यापासूनच त्यांना घरातच थांबावे लागले आहे. त्यामुळे त्यांची विविध प्रकारे गैरसोय झाली आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने ज्येष्ठ नागरिक आता घराबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची वेळ जनतेने आणू नये. त्यासाठी कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचे पालन करावे, असा सल्ला अनेक ज्येष्ठ नागरिकांकडून दिला जात आहे.कोरोनाचा धोका ज्येष्ठ नागरिकांना अधिक असल्याने लॉकडाऊन सुरू होताच ज्येष्ठ नागरिकांच्या फिरण्यावर बंधने आली होती. त्यामुळे त्यांचा सकाळी आणि संध्याकाळी फिरण्याचा व्यायाम बंद झाला होता.

काहींची मुले परदेशात अथवा मुंबई, पुण्यासारख्या शहरात होती. त्यामुळे घरात वयोवृद्ध पती-पत्नी दोघेच होती. त्यामुळे किराणा, दूध, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू किंवा तातडीची औषधे आणण्यासाठी बाहेर पडताही येत नव्हते. तसेच ऐनवेळी काही त्रास झाला तर डॉक्टरांकडे जाणेही शक्य होत नव्हते.अशावेळी ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक वेळी शेजाऱ्यांचे सहकार्य मिळतेच असे नाही. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली होती. आता लॉकडाऊन शिथिल झाले तरीही ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडायला सरकारने पूर्णतः मुभा दिलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात घरात राहून ज्येष्ठ नागरिक कंटाळले.लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यक्तींना योग्य वेळी उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांचे मृत्यू या काळात झाले. अनेक ठिकाणी उपचारासाठी बाहेर नेण्यासाठी वाहनाची उपलब्धता नव्हती तर काही ठिकाणी डॉक्टर वेळेवर उपलब्ध झाले नाहीत, ही त्यामागची मुख्य कारणे होती. त्यामुळे लॉकडाऊन कधी संपतेय, असे सर्वाना वाटत होते. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनचे संकट नको, असेच ज्येष्ठ नागरिकांना वाटते.नियम पाळा, कोरोना टाळाकोरोनाला टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेत नियम पाळले तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येणार नाही, असे मत ज्येष्ठ व्यक्त करीत आहेत. पुन्हा लॉकडाऊन झाले तर ज्येष्ठ नागरिकांचेच अधिक हाल होतील, असे त्यांना वाटते. त्यामुळे ही वेळ येऊ न देण्यासाठी प्रत्येकानेच काळजी घ्यायला हवी, असे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.शिस्त पाळायला हवीकोरोनाने देशावरच मोठे संकट आणले आहे. त्यामुळे नाईलाजाने सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. मात्र, सर्वांनीच शिस्त पाळणे गरजेचे आहे. तरच कोरोनाचा संसर्ग टाळता येईल व प्रभावदेखील कमी होईल आणि संकटातून मुक्ती मिळेल.

पुन्हा लॉकडाऊन नकोच !लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद होते. त्यामुळे देशाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांचे हाल अधिक झाले. काहींच्या घरात दुसरे कुणीच नसल्याने महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणे मुश्किल झाले होते. काही वेळा आजारी असतानाही औषधोपचार मिळत नव्हता. आता थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन नको.- दादा कुडतरकर,जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, सिंधुुुदुर्ग

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकsindhudurgसिंधुदुर्ग