शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

प्लाझ्मा थेरपी मशीनसाठी २५ लाखांच्या निधीची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 15:31 IST

CoroanVirus Sindhudurg Uday Samant : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक आहे. त्यामुळे पुढील धोका लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० खाटांचे कोविड सेंटर उभे करण्यासंदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच प्लाझ्मा थेरपी मशीनसाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देप्लाझ्मा थेरपी मशीनसाठी २५ लाखांच्या निधीची तरतूदजिल्ह्यात ५० खाटांचे कोविड सेंटर उभारणार- उदय सामंत यांची माहिती

ओरोस : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक आहे. त्यामुळे पुढील धोका लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० खाटांचे कोविड सेंटर उभे करण्यासंदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच प्लाझ्मा थेरपी मशीनसाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्याची गरज ओळखून विविध सुविधा निर्माण केल्या जात आहेत. कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी अतिशय घातक आहे. याचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात ५० खाटांचे कोविड सेंटर उभे करण्यासंदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या कोविड सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या लहान मुलांना अत्यंत चांगल्या पद्धतीने घरच्यासारखी वागणूक दिली जाईल, असे यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.दरम्यान, प्लाझ्मा थेरपीचे मशीन जिल्ह्यासाठी देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर २५ लाख रुपयांची तरतूद या मशीनसाठी केली आहे. आता या थेरपीबाबत मतमतांतरे असली तरी त्याचा फायदा भविष्यात जिल्ह्यातील रुग्णांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मंत्री सामंत म्हणाले, लॉकडाऊनला प्रतिसाद दिला त्या जिल्हावासीयांचे आपण आभारी आहोत. त्याचा फायदा जिल्ह्यातील रुग्ण कमी होण्यास होत आहे. त्यामुळे निश्चितच कोविड रुग्णांची वाढलेली संख्या भविष्यात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जिल्हा प्रशासनाच्या वतीने माझा सिंधुदुर्ग - माझी जबाबदारी अशी मोहीम राबविण्यात आली होती.

या मोहिमेअंतर्गत २ लाख ९० हजार १२ लोकांपर्यंत जाऊन त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ५६ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा तत्काळ उपचार करण्यासाठी झालेला आहे. ही मोहीम आतापर्यंत ४० टक्के पूर्ण झाली असून, ६० टक्के लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. लवकरच याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.लसीचा तुटवडा भासणार नाहीलसीचा तुटवडा आता भासणार नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करीत मंत्री सामंत यांनी सिंधुदुर्गचा मृत्युदर कमी करण्यासाठी आमचे जिल्हा प्रशासन म्हणून प्रयत्न आहेत, असे सांगितले. आगामी काळात शिक्षकांना व फ्रंटलाइनवर काम करणाऱ्यांना लसीकरण करण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. लॉकडाऊन वाढणार का? याबाबत विचारले असता त्यांनी अद्यापपर्यंत आपण त्यावर काही भाष्य करू शकत नाही, असे सांगून अधिक बोलणे त्यांनी टाळले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKankavliकणकवलीUday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग