शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने नुकसान भरपाई द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 10:50 IST

कणकवली तालुक्यातील ७० टक्के भात शेतीचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकर्‍यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कणकवली शिवसेनेकडून मंगळवारी करण्यात आली. याबाबतचे निवेदन तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी तहसीलदार आर.जे.पवार यांना दिले.

ठळक मुद्देओला दुष्काळ जाहीर करून तातडीने नुकसान भरपाई द्या !शिवसेनेची मागणी : कणकवली तहसीलदारांना निवेदन

कणकवली: कणकवली तालुक्यातील ७० टक्के भात शेतीचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकर्‍यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कणकवली शिवसेनेकडून मंगळवारी करण्यात आली. याबाबतचे निवेदन तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी तहसीलदार आर.जे.पवार यांना दिले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत , राजू शेट्ये, अँड.हर्षद गावडे, राजु राठोड, शेखर राणे, विलास कोरगावकर, राजु राणे, प्रतिक्षा साटम, वैदेही गुडेकर, अजित काणेकर, राजन म्हाडगुत, ललित घाडीगांवकर, आनंद आचरेकर, विलास गुडेकर, दामू सावंत, सिद्धेश राणे, योगेश मुंज, निकेत भिसे, तेजस राणे, भाई साटम आदी शिवसेना पदाधिकार्‍यांनी आज कणकवली तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.या निवेदनात म्हटले आहे की, जुलै तसेच ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातही प्रचंड प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. यात ७० टक्के भात शेतीचे नुकसान झाले आहे. काही भागात तर नुकसानीची तीव्रता ९० टक्केपर्यंत आहे. याखेरीज पुढील दोन दिवसांतही अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड होते. या सर्व शेतकर्‍यांना शेतकरी सन्मान योजेंगतर्गत सन २०१७ मध्ये कर्जमाफीचा फायदा अल्प प्रमाणात झाला होता. इथल्या शेतकर्‍यांवर कर्जाचा बोजा वाढला आहे. तसेच यंदाचे जवळपास संपूर्ण भातपीक वाया गेल्याने शेतकरीवर्ग आर्थिकदृष्ट्या पूर्णतः कोलमडून गेला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे तातडीने करावेत आणि एकही शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहू नये याची दक्षता शासनाने घ्यावी.शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी असते, ही बाब लक्षात घेऊन इथल्या शेतकर्‍यांना ५० हजार ते ६०हजार प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई मिळावी. तसेच तालुक्यात गुंठ्यावर आधारीत भरपाईचे निकष असावेत. अनेक शेतकरी कुळ अथवा देवस्थान जमिनीवर शेती करतात. अशा शेतकर्‍यांचीही खात्री करून भरपाई देण्यात यावी.यंदा शेतीसाठी राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा बँक यांच्याकडून ८० कोटींचे शेतीकर्ज वाटप झाले आहे. हे कर्ज पूर्णतः माफ व्हावे. ज्या भातशेतीचे पंचनामे झालेले आहेत. त्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी. तसेच पंचनाम्यासाठी जादा कर्मचारी नेमले जावेत अशीही मागणी शिवसेना पदाधिकार्‍यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRainपाऊसFarmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग