शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम, गाव न सोडण्याच्या भूमिकेवर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 13:46 IST

उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे समजून घेत विस्थापितांच्या १०० टक्के स्थलांतरासाठी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु पुनर्वसन गावठाणात २३ नागरी सुविधांची पूर्तता, मोबदला वाटप आणि भूखंड वाटप होत नाही; तोपर्यंत गाव सोडणार नाही या भूमिकेवर काही प्रकल्पग्रस्त ठाम राहिले आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या ह्यठामह्ण भूमिकेमुळे तिढा वाढत चालला आहे.

ठळक मुद्दे गाव न सोडण्याच्या भूमिकेवर काही प्रकल्पग्रस्त ठामसमजूत घालण्याचे प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ

वैभववाडी : उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे समजून घेत विस्थापितांच्या १०० टक्के स्थलांतरासाठी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु पुनर्वसन गावठाणात २३ नागरी सुविधांची पूर्तता, मोबदला वाटप आणि भूखंड वाटप होत नाही; तोपर्यंत गाव सोडणार नाही या भूमिकेवर काही प्रकल्पग्रस्त ठाम राहिले आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या ह्यठामह्ण भूमिकेमुळे तिढा वाढत चालला आहे.अरुणा प्रकल्पग्रस्त व सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १०० प्रकल्पग्रस्त गाव न सोडण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान, भाजपचे अतुल रावराणे व संदेश पारकर, सभापती लक्ष्मण रावराणे आदींनी पुनर्वसन गावठाणांसह बुडीत क्षेत्राची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपजिल्हाधिकारी जोशी, तहसीलदार रामदास झळके, पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा केली.त्यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आम्ही गावठाणांतील पत्रा शेडमध्ये कसे रहायचे? तिथे अजून पाणी, वीज या मूलभूत सुविधा नाही. पत्रा शेड पहिल्याच पावसात गळायला लागल्या आहेत. काही प्रकल्पग्रस्तांना अद्यापही भूखंड मिळालेले नाहीत. काहींना मोबदलाही नाही. मग गाव कसे सोडायचे? असा प्रश्न उपस्थित केला.प्रशासन आम्हांला हुसकावून लावू पहातेयआखवणे-भोम गावात अजूनही प्रकल्पग्रस्तांचे वास्तव्य असताना प्रशासनाने आधी वीजपुरवठा खंडित करून गैरसोय केली आहे. त्यातच दोन दिवसांपासून गावात येणारा पर्यायी रस्ता खोदून एसटी सेवाही बंद केली आहे. आम्ही माणसे आहोत. प्रशासन आमच्यावर जुलूम करीत असून मोबदला, भूखंड आणि निवारा न देताच गावातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, आम्ही तसे हटणार नाही, अशी ठाम भूमिका प्रकल्पग्रस्तांनी उपजिल्हाधिकारी जोशी यांच्यासमोर मांडली.प्रशासन सकारात्मक : मंगेश जोशी७५ टक्के प्रकल्पग्रस्तांना मोबदला वाटप झाले आहे. तर ८०० कुटुंबांना भूखंड दिले आहेत. पुनर्वसन गावठाणात तात्पुरत्या ४०० निवारा शेड बांधण्यात आल्या असून प्राथमिक सुविधा देण्याची आमची जबाबदारी आहे. याशिवाय ज्यांना शेड नाहीत त्यांना घरभाडे देण्याची व्यवस्थाही करण्यात येईल.बुडीत क्षेत्रातील शासकीय कार्यालये पुनर्वसन गावठाणात हलविण्यात आली आहेत. धरणाच्या घळभरणीचे काम झाले असून पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी केले आहे. 

टॅग्स :Damधरणsindhudurgसिंधुदुर्ग