शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अवकाळी पावसाची सिंधुदुर्गात हजेरी, भातशेतीचे मोठे नुकसान; शेतकरी चिंतित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 07:55 IST

बुधवारी दिवसभर पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या तरीही ढगाळ वातावरण कायम होते.

कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळीसुद्धा पावसाची रिपरिप सुरूच होती. तर सिंधुदुर्गात अजूनही भातकापणी शिल्लक असून या अवकाळी पावसामुळे भातशेती आडवी होऊन नुकसान झाले आहे.

मंगळवारी रात्री वीज चमकण्यासह ढगांचा गडगडाट जोरदार सुरू होता. त्याच्याच जोडीने जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. दिवाळीपूर्वी भात कापणी संपविण्यासाठी शेतकरी वर्ग प्रयत्नशील आहे. मात्र, पावसाने त्यात व्यत्यय आणला आहे. अनेक ठिकाणी उभे भात पीक जमिनीवर पडले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे.

बुधवारी दिवसभर पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या तरीही ढगाळ वातावरण कायम होते. पुढील काही दिवस सलग पाऊस झाल्यास भात शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. यापूर्वी ज्यांची भातकापणी पूर्ण झाली आहे, ते शेतकरी  नुकसानीपासून वाचले आहेत.

- या अवकाळी पावसाचा फटका व्यापाऱ्यांनाही बसला आहे. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना पावसाने परत जोर धरला आहे. - दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल होणाऱ्या ग्राहकांच्या संख्येवर याचा मोठा परिणाम होणार आहे. विविध साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत. ग्राहकांची वाट व्यापारी बघत आहेत. त्यातच जर पावसाने पुढील काही दिवस सातत्य राखले तर व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान होणार आहे. - त्याचप्रमाणे दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याचे नियोजन मनोमन केलेल्या नागरिकांचाही हिरमोड होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये  पाऊस पडू नये अशी इच्छा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग