शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
2
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
3
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
5
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
6
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
7
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
8
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
9
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
10
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
11
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
12
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
13
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
14
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
15
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
16
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
17
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
18
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
19
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
20
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गचा विकास करण्यात सत्ताधारी अपयशी : परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 16:39 IST

सिंधुदुर्गचा विकास करण्यात हे सत्ताधारी अपयशी ठरले आहेत हे सिद्ध होत आहे, अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केली.

ठळक मुद्देसिंधुदुर्गचा विकास करण्यात सत्ताधारी अपयशी : परशुराम उपरकरआयुष रुग्णालयासाठी सिंधुदुर्गातून प्रस्तावच नाही

कणकवली : शिवसेना तसेच भाजप या सत्ताधारी पक्षातील आमदार व पदाधिकाऱ्यांनी जनतेला दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. आतापर्यंत त्यांनी केलेल्या घोषणांचा पाठपुरावा करण्यातही ते कमी पडले असून त्याचेच उदाहरण म्हणजे आयुष रुग्णालयासाठी सिंधुदुर्गातून प्रस्तावच पाठविण्यात आलेला नाही. त्यामुळे सिंधुदुर्गचा विकास करण्यात हे सत्ताधारी अपयशी ठरले आहेत हे सिद्ध होत आहे, अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केली.कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आडाळी येथील एमआयडीसी तसेच आयुष रुग्णालय याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राजन तेली, अतुल काळसेकर यांनी अनेकवेळा घोषणा केल्या आहेत. त्याला अनुसरुन पाठपुरावा करणे आवश्यक होते. तो करण्यात आलेला नाही. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सिंधुदुर्गचा आयुष रुग्णालयाच्या बाबतीतील प्रकल्प केंद्र शासनाकडे गेलेलाच नाही, असे सांगितले आहे.दोडामार्ग येथे जनतेला आरोग्य सेवेसाठी आक्रोश आंदोलन करावे लागले. यावेळी गोवा येथील बांबुळीतील रुग्णालयाला सिंधुदुर्गातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अडीच कोटी रुपये देण्यात येतील अशी घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती. ती फसवीच ठरली आहे. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.आता पुन्हा एकदा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे जनतेला भुलविण्यासाठी या सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या जातील. त्यापासून जनतेने सावध रहावे. मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच केलेली ७५००० पदांच्या भरती बाबतची घोषणाही फसवीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घोषणेला बळी पडून नोकरी स्वीकारणारे त्यांची नोकरी गेल्यावर अधांतरीच राहणार आहेत.

या सर्व घोळात नोकरीसाठी असलेली त्यांची वयोमर्यादा संपल्यावर ते बरबाद होणार आहेत. त्यामुळे मनसेच्यावतीने यापुढील काळात शासनाच्या फसव्या घोषणा जनतेसमोर आणण्यात येतील. तसेच कोणत्याही परिस्थितीत जनतेची फसवणूक होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही उपरकर यांनी यावेळी सांगितले.पालकमंत्री अपयशीजिल्ह्याचे पालकमंत्री अपयशी ठरले आहेत. ते निष्क्रिय असून जिल्ह्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधणार असे त्यांनी घोषित केले होते. त्याचे काय झाले? जिल्ह्यातील जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे जनता त्रस्त आहे. त्यांना जिल्ह्यातील जनतेबद्दल काही देणे घेणे नाही. अशी स्थिती आहे. असे उपरकर म्हणाले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसे