शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत खांदेपालट होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 15:23 IST

मी मंत्रिपदावर असेन किंवा नसेन, पण जनतेचे प्रश्न हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे सूचक वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

सिंधुदुर्ग - मी मंत्रिपदावर असेन किंवा नसेन, पण जनतेचे प्रश्न हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे सूचक वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आगामी काळात शिवसेनेत मोठे फेरबदल पाहायला मिळतील. त्या पार्श्वभूमीवर केसरकरांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. मंत्री केसरकर हे गुरूवारी एक दिवसाच्या सावंतवाडी दौ-यावर होते. यावेळी त्यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या अनेक प्रश्नांना हात घातला. मात्र कोकण पदवीधर मतदार संघाची सध्या आचारसंहिता आहे.

त्यामुळे मी कुठच्या विकासाच्या प्रश्नावर बोलणार नाही, असे सांगत जिल्ह्याचा विकास व्हावा हीच माझी अपेक्षा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. चांदा ते बांदा योजना कशी राबविली जाईल, तसेच सिंधुदुर्गमध्ये कोट्यवधीचा निधी आला तो कसा मागे गेला यावर मंत्री केसरकर यांनी प्रकाश टाकला. आपण जे अधिकारी जिल्ह्याच्या विकासात लक्ष घालत नाहीत त्यांना बदलण्याचे धोरण आखल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था सुधारावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. यात येणारे अडथळे अशा अनेक गोष्टींचा उहापोह यावेळी मंत्री केसरकर यांनी केला आहे.  

टॅग्स :Dipak Kesarkarदीपक केसरकरPoliticsराजकारणShiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग