शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांवरील अन्याय दूर करण्यासाठी राजकीय नेत्यांनी एकत्र यावे, राजन तेली यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 21:02 IST

कणकवली: मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात कणकवली शहरातील प्रकल्प बाधितांवर अन्याय होत आहे.

कणकवली: मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात कणकवली शहरातील प्रकल्प बाधितांवर अन्याय होत आहे. तशीच स्थिती कुडाळ शहरातही आहे. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ नये. तसेच त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी कोणतेही राजकारण न करता एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी केले.कणकवली येथील निवासस्थानी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजन तेली म्हणाले, महामार्गाच्या संदर्भात भाजप पदाधिकारी तसेच प्रकल्प बाधितांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे प्रधान सचिव विकास खारगे व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही केली आहे. कसाल येथील एक गुंठा जागेला चार पट म्हणजे 8 लाख रुपये मोबदला दिला जात आहे. तर कणकवली शहरातील एक गुंठा जागेला दुप्पट म्हणजे पाच लाख तीस हजार रुपये इतका मोबदला प्रकल्पग्रस्तांना दिला जात आहे, हे अन्यायकारक आहे.कणकवली शहरात दहा झोन करण्यात आलेले आहेत. मात्र, त्या दहाही झोनमधून महामार्ग जात नाही. मग प्रकल्प बाधितांना मोबदला देताना तफावत का केली जात आहे? असे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले. बांधकाम विभागाने जागेचे तसेच मालमत्तेचे केलेले मूल्यांकन चुकीचे आहे. हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर कणकवली शहर ही बाजारपेठ आहे. त्याचा विचारही दर ठरविताना झालेला नाही. त्यामुळे प्रकल्प बाधितावर अन्याय होत आहे.कणकवलीतील प्रकल्प बाधित व राजकीय पक्षाच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेतली. हे चांगले आहे. सर्वच पक्ष प्रकल्प बाधितांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. महामार्ग प्राधिकरणचे केंद्रीय अधिकारी विनय देशपांडे यांच्याशी आपण चर्चा केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेले प्रस्ताव होते तसे आम्ही मंजूर केले आहेत. जमीन अथवा मालमत्ता यांचा दर ठरविणे हा केंद्राच्या कामाचा भाग नाही असे त्यांनी सांगितले आहे . त्यामुळे दरात तफावत असेल तर त्यासाठी नेमलेल्या लवादाकडे दाद मागावी लागेल.राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याना वस्तुस्थिती समजावून सांगावी लागेल. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे मूल्यांलन केले असेल तर त्याबाबतची सर्व माहिती कागदपत्रासह द्या .त्यांच्यावर कारवाई करु असेही मंत्री तसेच अधिकाऱ्यांनी भेटी दरम्यान आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे कोणावरहि अन्याय होणार नाही यासाठी आमचे प्रयत्न रहाणार आहेत. मोबदला देताना भाडोत्री तसेच व्यापाऱ्यांचा विचारही व्हायला हवा अशी आमची भूमिका असल्याचे राजन तेली यांनी सांगितले.राज्यात कुठल्याही भागात मी पक्षाचे काम करू शकतो!भाजपचा मी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातच नव्हे तर राज्यात कुठल्याही भागात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करु शकतो. त्यासाठी मला विशिष्ट भागाची मर्यादा नाही. असे ए्का प्रश्नाच्या उत्तरा दरम्यान राजन तेली यांनी स्पष्ट केले.मुंबईतील घटनेबाबतचे 'ते'वृत्त चकीचे !मुंबई येथे मंत्रालयात माझ्यावर हल्ला झाला असे सोशल मिडियाद्वारे सर्वत्र पसरलेले वृत्त चुकीचे आहे. असे काहीच झालेले नाही. मंत्रालयात माझ्या सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. माझे जूने सहकारी काका कुडाळकर, धोंडी चिंदरकर तसेच माझा मुलगा सर्वेश हा सुध्दा माझ्या बरोबर होता . त्यामुळे कोणी माझ्यावर हात उचलला असता तर त्याचा हात शिल्लक राहिला असता का? माझ्या वाटेला जाणारा स्वतःच्या पायावर मंत्रालयाबाहेर आला असता काय? याचा विचार करा.सोशल मीडियावर ते वृत्त पसरविणाऱ्यांनी माझी 30 वर्षांची राजकीय कारकीर्द पहावी.मी मी म्हणणारे अनेक थकले आहेत. माझ्या घराची रेकी केली. माझ्यावर पाळत ठेवली. माझ्या मुलावर दोन वेळा हल्ला झाला. तरीही मी घाबरलो नाही. परमेश्वरा व्यतिरिक्त मी कोणालाही घाबरत नाही. आतापर्यंत ज्यांनी मला नाहक त्रास दिला त्यांना नियतीने धडा शिकवला आहे. सत्यविजय भिसे हत्या प्रकरणात मला नाहक गोवणाऱ्या छगन भुजबळांची आज अवस्था काय आहे? ते पाहा. या प्रकरणात मला विनाकारण गुंतवणाऱ्या आणखीन काही जणांना लवकरच नियतीच धडा शिकवेल. त्यामुळे विनाकारण कोणी माझी बदनामी करू नये, असे राजन तेली यावेळी म्हणाले.

टॅग्स :Rajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्ग