शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

प्रलंबित प्रश्न मार्गी लागेपर्यंत जमिनीला हात लावू देणार नाही :  राजन साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 4:26 PM

ज्या ज्या ठिकाणी प्रश्न प्रलंबित आहेत, ते पुर्णत्वाला जात नाहीत तो पर्यंत लांजा शहरातील जमिनीला हात लावू देणार नाही, अशी ठोस भूमिका लांजा-राजापुरचे आमदार राजन साळवी यांनी मांडली.

ठळक मुद्देप्रलंबित प्रश्न मार्गी लागेपर्यंत जमिनीला हात लावू देणार नाही : राजन साळवी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाबाबत लांजात बैठक

लांजा : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम झाले पाहिज,े ही भावना आहेच. मात्र लांजा शहरातील उध्वस्त होत असलेल्या नागरिक, व्यापारी, खोकेधारक, दुकानदार व सर्व इमारत मालक या सर्वांचे न्यायालय, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय ज्या ज्या ठिकाणी प्रश्न प्रलंबित आहेत, ते पुर्णत्वाला जात नाहीत तो पर्यंत लांजा शहरातील जमिनीला हात लावू देणार नाही, अशी ठोस भूमिका लांजा-राजापुरचे आमदार राजन साळवी यांनी मांडली.सोमवार दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजी लांजा शहरामध्ये महामर्गाच्या चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शहरातील व्यापाºयांनी काम न करु देता पिटाळून लावले होते. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील वादावादीची दखल त्याक्षणी आमदार राजन साळवी यांनी घेउन व्यापाºयांच्या पाठीशी राहण्याची भुमिका घेतली होती.

कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून काम बंद ठेवण्याच्या सुचनाही दिल्या होत्या. यासह ४ डिसेंबर २०१८ रोजी लांजा शहरातील नागरीक, व्यापारी व महामार्ग अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांची एक संयुक्त सभा घेण्याचे आश्वासन साळवी यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी ही सभा शहरातील सांस्कृतीक भवन लांजा येथे नागरिक व व्यापाऱ्यांचे प्रश्न आणि अधिकाऱ्यांच्या उत्तराने दीड ते दोन तास सुरू होती. या सभे प्रसंगी आमदार राजन साळवी बोलत होते.या सभेला संघर्ष समितीचे अध्यक्ष महंमद रखांगी, व्यापारी संघटनचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, नगराध्यक्ष सुनिल कुरूप, परवेश घारे, जयवंत शेट्ये, जगदीश राजापकर, संदीप दळवी, हेमंत शेट्ये, रुपेश गांगण, सचिन भिंगार्डे, खलिल मणेर, सुरेंद्र लाड, महेश नारकर, अनिल लांजेकर, प्रभाकर शेट्ये आदी उपस्थित होते.आमदार राजन साळवी लांजा शहरातील प्रकल्पबाधित व्यापारी व नागरिकांशी बोलताना पुढे म्हणाले की, महामार्गाचे चौपदरीकरण होत असल्याने लांजा शहरातील अनेक खोकेधारक, दुकानदार, इमारती मालक हे सर्व उध्वस्त होत असल्याचे समोर आल्यानतर या मार्गाला बायपास मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र लांजा शहर जिथे सुरू होते व व शहराचा शेवट जिथे संपतो, त्यावरती पुल होणार हे महामार्ग प्रशासनाने समोर ठेवले.

मात्र महामार्ग प्रशासनाने शहरातील नागरीक, खोकेधारक, व्यापारी यांच्या समस्या, प्रश्न व ज्यांना मोबदला मिळाला नाही, ज्यांचा अर्धवट मिळालेला आहे, अशा सर्व प्रकल्प बाधितांना पुर्णत्वाला केल्याशिवाय शहरात कामाला सुरूवात करु नये नाहीतर जनतेस रस्यावर उतरुन शहरातील जमिनीला हात लावू देणार नाही, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला.या सभेला महामार्ग चौपदरिकरणाचे अधिकारी, प्रांतकार्यालयाचे प्रतिनिधी, महामार्ग ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम, महावितरण या खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच व्यापारी आणि नागरिकांच्यावतीने संघर्ष समितीचे अध्यक्ष महंमद रखांगी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना महामार्गाच्या वेळोवेळी बदलत असणाऱ्या जागा हस्तांतरणाबाबत चांगलेच धारेवर घेतले होते.

नागरीक व व्यापारी यांच्यावतीने बोलताना महंमद रखागी म्हणाले की, ३० ते ४० वषार्पासून छत्री डोक्यावर घेउन कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. आज तेच सर्व महामार्गात उध्वस्त होत आहेत. शहराची बाजारपेठ रस्त्यावरच आहे. आज उध्वस्त होणाऱ्यांकडे अन्य कोणाताही रोजगारदृष्ट्या दुसरा पर्याय नाही, असे असतानाही कोणतीच माहिती नाही.

एकाएकी नोटीसा येतात, त्यामध्ये मोबदला, जागा किती घेतली जातेय, नेमकी शहरात मार्ग कसा असणार हे निश्चित नाही आणि नोटीसा पाठवून व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेशी खेळण्याचे काम महामार्ग प्रशासन करत आहे, असे ते म्हणाले.नळपाणी योजनेवर चर्चा सभेत लांजा नगरपंचायतीच्या नळपाणी योजनेचा विषयावर चर्चा करण्यात आली. महामार्ग प्रशासनाने नुकसान भरपाई म्हणून नगरपंचायतीला देऊ केलेली रक्कम पुरेसी नसून ती वाढीव स्वरुपाने मिळावी, असे उपस्थित अधिकाºयांना नगराध्यक्ष सुनिल कुरुप व परवेश घारे यांनी ठणकावून सांगितले. शहराचा वाढता आलेख आणि अल्प मोबदला यावर महामार्ग प्रशासनाने विचार करावा असे सांगण्यात आले.

टॅग्स :highwayमहामार्गRajan Salviराजन साळवीsindhudurgसिंधुदुर्ग