शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवास भावपूर्ण वातावरणात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 15:34 IST

पुढील तीन दिवस हा विधी होणार आहे. तसेच पुण्यतिथी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून आणि मुंबई, पुणे अशा विविध भागांतून हजारोंच्या संख्यने भाविक कणकवलीत दाखल झाले आहेत . त्यांनी भालचंद्र महराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

सुधीर राणे 

कणकवली : योगियांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४२ व्या पुण्यतिथी महोत्सवास शुक्रवारपासून येथील आश्रमात भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या उत्सवामुळे अवघी कनकनगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे.भालचंद्र महाराजांचा प्रत्येक उत्सव हा भक्तगणांसाठी चैतन्याची, आनंदाची आणि भक्तीची पर्वणीच असतो. शुक्रवारी पहाटे समाधीपूजन,काकड आरतीपासूनच परमहंस भालचंद्र महाराज संस्थान भक्तांच्या गर्दीने फुलून गेले. बाबांच्या या उत्सवानिमित्त समाधीस्थळ फुलांनी तर परिसरात मंडप,विद्युतरोषणाईनी सजवण्यात आले आहे.सर्व भक्तांच्या कल्याणार्थ भालचंद्र महारूद्र महाअभिषेक अनुष्ठान हा धार्मिक विधी काशिनाथ कसालकर यांनी सपत्नीक केला. यावेळी ब्रम्हवृंद व संस्थांनचे अध्यक्ष सुरेश कामत, व्यवस्थापक विजय केळुसकर, इतर सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील तीन दिवस हा विधी होणार आहे. तसेच पुण्यतिथी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून आणि मुंबई, पुणे अशा विविध भागांतून हजारोंच्या संख्यने भाविक कणकवलीत दाखल झाले आहेत . त्यांनी भालचंद्र महराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

तद्नंतर आरती व दुपारी महाप्रसादाचा लाभ घेतला.दुपारपासून ४ वाजेपर्यंत विविध सुश्राव्य भजने झाली. सायंकाळी ४ वाजल्यानंतर ह.भ.प. कीर्तनचंद्र श्रेयस बडवे ,रा.पुणे यांचे 'नामदेवांना सद्गुगुरू दर्शन ' या विषयावर किर्तन झाले. या किर्तनालाही भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती.

यापुढील चार दिवस हा सोहळा असाच भावभक्तीची अनुभुती देणारा ठरणार असून या पुण्यतिथी महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन भालचंद्र संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग