शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रस्त्यावरून शेतात जाण्यास शेतकरी घाबरतात; पाडलोस व दांडेलीत शेतकऱ्यांच्या जीवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 16:52 IST

गेल्या महिन्यात पाडलोस केणीवाडा येथे अंगणात बसलेल्या शेतकºयाचा गव्याने पाठलाग केला. तसेच भुईमूग, माड, काजू, पोफळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. अशा घटना ताज्या असताना पुन्हा एकदा दांडेली येथील शेतात चार ते पाच गव्यांनी काजू बागायतीत

ठळक मुद्देपाडलोस, दांडेलीत गव्यांकडून नासधूस

बांदा : पाडलोस व दांडेलीत गव्यांचा कळप रस्त्यानजीक असलेल्या काजू बागायतीत बिनधास्त घुसूून नासधूस करीत आहे. तर काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला दुचाकीचालकांना निदर्शनास येत आहे. यामुळे रस्त्यावरून शेतात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत. त्यामुळे वनविभागाने एक तर अशा उपद्रवी प्राण्यांचा बंदोबस्त करावा किंवा शेतकऱ्यांना थेट शेतावरच भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतक-यांमधून होत आहे.

गेल्या महिन्यात पाडलोस केणीवाडा येथे अंगणात बसलेल्या शेतकºयाचा गव्याने पाठलाग केला. तसेच भुईमूग, माड, काजू, पोफळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. अशा घटना ताज्या असताना पुन्हा एकदा दांडेली येथील शेतात चार ते पाच गव्यांनी काजू बागायतीत घुसून नुकसान केल्याचे शेतकरी उत्तम परब यांनी सांगितले.

तसेच जंगलमय भाग असल्याने तेथून ये-जा करताना जीव मुठीत धरून बाजार किंवा घर गाठावे लागत आहे. सध्या काजूचा हंगाम सुरू असून शेतकºयांना बागायतीत जाण्याशिवाय पर्याय नाही. वनविभागाने शेतक-यांच्या काजू वाचविण्यासाठी अशा उपद्रवी गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांतून होत आहे.

मडुरा येथून जीवनाश्यक वस्तू खरेदी करून येत असताना बांदा शिरोडा मार्गावरील केणीवाडा (डोंगराची कोंड) येथे सुमारे दहा गवे दुचाकीचालक हर्षद परब व अजित कोरगावकर यांना शनिवारी दृष्टीस पडले. रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या काजू बागायतीत गव्यांचा कळप पाहून ते घाबरले. परंतु त्यांनी हुशारीने त्यांना हुसकावून लावले. अशा घटना वारंवार होत असून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांच्या जीवास पर्यायाने शेती उत्पादनालाही धोका निर्माण झाला आहे. या गव्यांचा त्वरित बंदोबस्त करावा.

प्रशासनाने शेतक-यांकडे लक्ष द्यावेकोरोनाच्या संकटाला सामोरे जात असता एकीकडे काजू बियांच्या दरात होणारी घट आणि दुसरीकडे गव्यांकडून काजूचे होणारे नुकसान यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकºयावर आर्थिक संकट ओढवले आहे. या अवस्थेत असलेल्या शेतक-याने करावे तरी काय? असा सवाल सर्वसामान्य शेतक-यांतून होत आहे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन गव्यांचा बंदोबस्त करून आमच्या काजू बागायती वाचवाव्यात, अशी मागणी पाडलोस तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल यांनी केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकण