शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रस्त्यावरून शेतात जाण्यास शेतकरी घाबरतात; पाडलोस व दांडेलीत शेतकऱ्यांच्या जीवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 16:52 IST

गेल्या महिन्यात पाडलोस केणीवाडा येथे अंगणात बसलेल्या शेतकºयाचा गव्याने पाठलाग केला. तसेच भुईमूग, माड, काजू, पोफळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. अशा घटना ताज्या असताना पुन्हा एकदा दांडेली येथील शेतात चार ते पाच गव्यांनी काजू बागायतीत

ठळक मुद्देपाडलोस, दांडेलीत गव्यांकडून नासधूस

बांदा : पाडलोस व दांडेलीत गव्यांचा कळप रस्त्यानजीक असलेल्या काजू बागायतीत बिनधास्त घुसूून नासधूस करीत आहे. तर काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला दुचाकीचालकांना निदर्शनास येत आहे. यामुळे रस्त्यावरून शेतात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत. त्यामुळे वनविभागाने एक तर अशा उपद्रवी प्राण्यांचा बंदोबस्त करावा किंवा शेतकऱ्यांना थेट शेतावरच भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतक-यांमधून होत आहे.

गेल्या महिन्यात पाडलोस केणीवाडा येथे अंगणात बसलेल्या शेतकºयाचा गव्याने पाठलाग केला. तसेच भुईमूग, माड, काजू, पोफळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. अशा घटना ताज्या असताना पुन्हा एकदा दांडेली येथील शेतात चार ते पाच गव्यांनी काजू बागायतीत घुसून नुकसान केल्याचे शेतकरी उत्तम परब यांनी सांगितले.

तसेच जंगलमय भाग असल्याने तेथून ये-जा करताना जीव मुठीत धरून बाजार किंवा घर गाठावे लागत आहे. सध्या काजूचा हंगाम सुरू असून शेतकºयांना बागायतीत जाण्याशिवाय पर्याय नाही. वनविभागाने शेतक-यांच्या काजू वाचविण्यासाठी अशा उपद्रवी गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांतून होत आहे.

मडुरा येथून जीवनाश्यक वस्तू खरेदी करून येत असताना बांदा शिरोडा मार्गावरील केणीवाडा (डोंगराची कोंड) येथे सुमारे दहा गवे दुचाकीचालक हर्षद परब व अजित कोरगावकर यांना शनिवारी दृष्टीस पडले. रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या काजू बागायतीत गव्यांचा कळप पाहून ते घाबरले. परंतु त्यांनी हुशारीने त्यांना हुसकावून लावले. अशा घटना वारंवार होत असून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांच्या जीवास पर्यायाने शेती उत्पादनालाही धोका निर्माण झाला आहे. या गव्यांचा त्वरित बंदोबस्त करावा.

प्रशासनाने शेतक-यांकडे लक्ष द्यावेकोरोनाच्या संकटाला सामोरे जात असता एकीकडे काजू बियांच्या दरात होणारी घट आणि दुसरीकडे गव्यांकडून काजूचे होणारे नुकसान यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकºयावर आर्थिक संकट ओढवले आहे. या अवस्थेत असलेल्या शेतक-याने करावे तरी काय? असा सवाल सर्वसामान्य शेतक-यांतून होत आहे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन गव्यांचा बंदोबस्त करून आमच्या काजू बागायती वाचवाव्यात, अशी मागणी पाडलोस तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल यांनी केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकण