शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

रस्त्यावरून शेतात जाण्यास शेतकरी घाबरतात; पाडलोस व दांडेलीत शेतकऱ्यांच्या जीवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 16:52 IST

गेल्या महिन्यात पाडलोस केणीवाडा येथे अंगणात बसलेल्या शेतकºयाचा गव्याने पाठलाग केला. तसेच भुईमूग, माड, काजू, पोफळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. अशा घटना ताज्या असताना पुन्हा एकदा दांडेली येथील शेतात चार ते पाच गव्यांनी काजू बागायतीत

ठळक मुद्देपाडलोस, दांडेलीत गव्यांकडून नासधूस

बांदा : पाडलोस व दांडेलीत गव्यांचा कळप रस्त्यानजीक असलेल्या काजू बागायतीत बिनधास्त घुसूून नासधूस करीत आहे. तर काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला दुचाकीचालकांना निदर्शनास येत आहे. यामुळे रस्त्यावरून शेतात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत. त्यामुळे वनविभागाने एक तर अशा उपद्रवी प्राण्यांचा बंदोबस्त करावा किंवा शेतकऱ्यांना थेट शेतावरच भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतक-यांमधून होत आहे.

गेल्या महिन्यात पाडलोस केणीवाडा येथे अंगणात बसलेल्या शेतकºयाचा गव्याने पाठलाग केला. तसेच भुईमूग, माड, काजू, पोफळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. अशा घटना ताज्या असताना पुन्हा एकदा दांडेली येथील शेतात चार ते पाच गव्यांनी काजू बागायतीत घुसून नुकसान केल्याचे शेतकरी उत्तम परब यांनी सांगितले.

तसेच जंगलमय भाग असल्याने तेथून ये-जा करताना जीव मुठीत धरून बाजार किंवा घर गाठावे लागत आहे. सध्या काजूचा हंगाम सुरू असून शेतकºयांना बागायतीत जाण्याशिवाय पर्याय नाही. वनविभागाने शेतक-यांच्या काजू वाचविण्यासाठी अशा उपद्रवी गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांतून होत आहे.

मडुरा येथून जीवनाश्यक वस्तू खरेदी करून येत असताना बांदा शिरोडा मार्गावरील केणीवाडा (डोंगराची कोंड) येथे सुमारे दहा गवे दुचाकीचालक हर्षद परब व अजित कोरगावकर यांना शनिवारी दृष्टीस पडले. रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या काजू बागायतीत गव्यांचा कळप पाहून ते घाबरले. परंतु त्यांनी हुशारीने त्यांना हुसकावून लावले. अशा घटना वारंवार होत असून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांच्या जीवास पर्यायाने शेती उत्पादनालाही धोका निर्माण झाला आहे. या गव्यांचा त्वरित बंदोबस्त करावा.

प्रशासनाने शेतक-यांकडे लक्ष द्यावेकोरोनाच्या संकटाला सामोरे जात असता एकीकडे काजू बियांच्या दरात होणारी घट आणि दुसरीकडे गव्यांकडून काजूचे होणारे नुकसान यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकºयावर आर्थिक संकट ओढवले आहे. या अवस्थेत असलेल्या शेतक-याने करावे तरी काय? असा सवाल सर्वसामान्य शेतक-यांतून होत आहे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन गव्यांचा बंदोबस्त करून आमच्या काजू बागायती वाचवाव्यात, अशी मागणी पाडलोस तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल यांनी केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकण