शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कवितांचा कणकवलीत जागर, आवानओल प्रतिष्ठानचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 15:46 IST

तुला आदरांजली म्हणून त्याच उजेडात लिहिली एक कविता की, तुझ्या माझ्या ओल्या जखमांची सरणात होत गेली राख, कविवर्य आ. सो. शेवरे यांची अशी आशयघन कविता अ‍ॅड. विलास परब यांनी सादर केली .  

ठळक मुद्देशेवरे यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य आ. सो. शेवरे यांच्या कवितांचा कणकवलीत जागरमृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत कवितेचीच आस लागलेला कवी

कणकवली , दि. २८ : तुझ्या चितेच्या उजेडात मी कविता वाचली. माणसांच्या कहाण्यांची तेव्हा वेदनेची पाखरे सहज उडून गेली सरणावरून. शेवटी तुला आदरांजली म्हणून त्याच उजेडात लिहिली एक कविता की, तुझ्या माझ्या ओल्या जखमांची सरणात होत गेली राख, कविवर्य आ. सो. शेवरे यांची अशी आशयघन कविता अ‍ॅड. विलास परब यांनी सादर केली .

 शेवरे यांच्या एकापेक्षा एक समाज जाणीवांच्या कविता ऐकताना अंतर्मुखच व्हायला झाले. निमित्त होते ते शेवरे यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य साधून आवानओल प्रतिष्ठानतर्फे येथे आयोजित करण्यात आलेल्या जागल्या या कार्यक्रमाचे. यावेळी शेवरे यांच्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत कवितेचीच आस लागलेला कवी अशा प्रकारच्या अनेक आठवणी जागृत करण्यात आल्या.

आ. सो. शेवरे तथा आबा यांनी आयुष्यभर फक्त काव्यलेखन आणि सामाजिक कामच केले. त्यांची कविता आणि सामाजिक कृती ही जागल्याचेच काम करत होती. त्यांनी जागल्या नावाची अप्रतिम कविताही लिहिली होती.

९० च्या दशकाच्या प्रारंभी तळकोकणात पहिली विद्रोही साहित्य चळवळ सुरू करणाऱ्या या कलावंत-समाज चिंतकाचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजिलेल्या या कार्यक्रमात अ‍ॅड. परब यांच्या बरोबरच अजय कांडर, राजेश कदम, विनायक सापळे, अच्युत देसाई, किशोर कदम यांनी आबांच्या आठवणी जागृत केल्या आणि त्यांच्या कवितांचे वाचन केले.

शेवरे यांनी जाती धर्मापलीकडला समाज निर्माण व्हावा असे स्वप्न पाहिले आणि समाजाला समजून घेत एकूण समाजासाठीच काम करताना समाजासाठीच कविता लिहिली. हे करताना आधी आपल्यातले माणूसपण जपण्याचा सतत प्रयत्न केला. म्हणून किशोर कदम यांनी यावेळी सादर केलेल्या त्यांच्या ह्यसत्याला सत्य नि असत्याला असत्य म्हणावे, सम्यक दृष्टी प्राप्त करत चालत रहावे अखंड माणूस म्हणून जगतानाह्ण या कवितेतून माणुसकीचेच दर्शन झाले.

यावेळी देसाई यांनी शेवरे यांची  कमळ चिखलात राहिले म्हणून ही कविता सादर करून समाजात मानल्या गेलेल्या कनिष्ठ जातीतील गुणवत्ता दुर्लक्षित करता येत नाही याचीच प्रचिती दिली तर राजेश कदम यांनी घुसमटलेल्या माणसांचा प्रश्न ही कविता सादर करून आबांच्या कवितेतील तळातल्या माणसांचेच दु:ख मांडले तर कांडर यांनी  पक्ष्याचे झाड ही त्यांची कविता सादर करताना समाजातील संवेदनशीलताच हरवत असल्याचे दाखवून दिले.

मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत कवितेची आस लागलेला कवीयावेळी अजय कांडर म्हणाले, आबा आपल्यातून निघून गेले तरी त्यांनी जी कवितेतून दृष्टी दिली. त्यातूनच अनेकांना लिहिण्याची प्रेरणा मिळाली. मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत आस लागलेला हा कवी होता.

निधनाच्या आदल्या दिवशी त्यांना अनेक कवी भेटायला गेले तर त्यांनी मृत्यूशयेवर असतानाही त्यांच्याकडून कविताच ऐकल्या. त्यांच्यामुळेच तळकोकणात प्रथम विद्रोही साहित्य चळवळ सुरू झाली आणि त्यातून अनेक परिवर्तन विचारांचे कवी लिहिते झाले.

सध्या तांबे, सुनील हेतकर, अरूण नाईक, मधुकर मातोंडकर, सिद्धार्थ तांबे, राजेश कदम, विठ्ठल कदम, अनिल जाधव, मनिषा जाधव, अंकुश कदम ही आजची लिहिती मंडळी म्हणजे आबांच्या चळवळीची फलश्रृती होय.

आबा नसते तर...यावेळी शेवरे यांच्या सहवासात वाढलेल्या कवी राजेश आणि किशोर कदम यांनी आबांमुळेच आम्ही चळवळीकडे ओढले गेलो आणि लिहूही लागलो. त्यांच्या सहवासात आलो नसतो तर आमचा इथवरचा प्रवासच होऊ शकला नसता अशी सहृदयी भावना व्यक्त केली. 

टॅग्स :literatureसाहित्यkonkanकोकण