शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कवितांचा कणकवलीत जागर, आवानओल प्रतिष्ठानचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 15:46 IST

तुला आदरांजली म्हणून त्याच उजेडात लिहिली एक कविता की, तुझ्या माझ्या ओल्या जखमांची सरणात होत गेली राख, कविवर्य आ. सो. शेवरे यांची अशी आशयघन कविता अ‍ॅड. विलास परब यांनी सादर केली .  

ठळक मुद्देशेवरे यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य आ. सो. शेवरे यांच्या कवितांचा कणकवलीत जागरमृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत कवितेचीच आस लागलेला कवी

कणकवली , दि. २८ : तुझ्या चितेच्या उजेडात मी कविता वाचली. माणसांच्या कहाण्यांची तेव्हा वेदनेची पाखरे सहज उडून गेली सरणावरून. शेवटी तुला आदरांजली म्हणून त्याच उजेडात लिहिली एक कविता की, तुझ्या माझ्या ओल्या जखमांची सरणात होत गेली राख, कविवर्य आ. सो. शेवरे यांची अशी आशयघन कविता अ‍ॅड. विलास परब यांनी सादर केली .

 शेवरे यांच्या एकापेक्षा एक समाज जाणीवांच्या कविता ऐकताना अंतर्मुखच व्हायला झाले. निमित्त होते ते शेवरे यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य साधून आवानओल प्रतिष्ठानतर्फे येथे आयोजित करण्यात आलेल्या जागल्या या कार्यक्रमाचे. यावेळी शेवरे यांच्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत कवितेचीच आस लागलेला कवी अशा प्रकारच्या अनेक आठवणी जागृत करण्यात आल्या.

आ. सो. शेवरे तथा आबा यांनी आयुष्यभर फक्त काव्यलेखन आणि सामाजिक कामच केले. त्यांची कविता आणि सामाजिक कृती ही जागल्याचेच काम करत होती. त्यांनी जागल्या नावाची अप्रतिम कविताही लिहिली होती.

९० च्या दशकाच्या प्रारंभी तळकोकणात पहिली विद्रोही साहित्य चळवळ सुरू करणाऱ्या या कलावंत-समाज चिंतकाचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजिलेल्या या कार्यक्रमात अ‍ॅड. परब यांच्या बरोबरच अजय कांडर, राजेश कदम, विनायक सापळे, अच्युत देसाई, किशोर कदम यांनी आबांच्या आठवणी जागृत केल्या आणि त्यांच्या कवितांचे वाचन केले.

शेवरे यांनी जाती धर्मापलीकडला समाज निर्माण व्हावा असे स्वप्न पाहिले आणि समाजाला समजून घेत एकूण समाजासाठीच काम करताना समाजासाठीच कविता लिहिली. हे करताना आधी आपल्यातले माणूसपण जपण्याचा सतत प्रयत्न केला. म्हणून किशोर कदम यांनी यावेळी सादर केलेल्या त्यांच्या ह्यसत्याला सत्य नि असत्याला असत्य म्हणावे, सम्यक दृष्टी प्राप्त करत चालत रहावे अखंड माणूस म्हणून जगतानाह्ण या कवितेतून माणुसकीचेच दर्शन झाले.

यावेळी देसाई यांनी शेवरे यांची  कमळ चिखलात राहिले म्हणून ही कविता सादर करून समाजात मानल्या गेलेल्या कनिष्ठ जातीतील गुणवत्ता दुर्लक्षित करता येत नाही याचीच प्रचिती दिली तर राजेश कदम यांनी घुसमटलेल्या माणसांचा प्रश्न ही कविता सादर करून आबांच्या कवितेतील तळातल्या माणसांचेच दु:ख मांडले तर कांडर यांनी  पक्ष्याचे झाड ही त्यांची कविता सादर करताना समाजातील संवेदनशीलताच हरवत असल्याचे दाखवून दिले.

मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत कवितेची आस लागलेला कवीयावेळी अजय कांडर म्हणाले, आबा आपल्यातून निघून गेले तरी त्यांनी जी कवितेतून दृष्टी दिली. त्यातूनच अनेकांना लिहिण्याची प्रेरणा मिळाली. मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत आस लागलेला हा कवी होता.

निधनाच्या आदल्या दिवशी त्यांना अनेक कवी भेटायला गेले तर त्यांनी मृत्यूशयेवर असतानाही त्यांच्याकडून कविताच ऐकल्या. त्यांच्यामुळेच तळकोकणात प्रथम विद्रोही साहित्य चळवळ सुरू झाली आणि त्यातून अनेक परिवर्तन विचारांचे कवी लिहिते झाले.

सध्या तांबे, सुनील हेतकर, अरूण नाईक, मधुकर मातोंडकर, सिद्धार्थ तांबे, राजेश कदम, विठ्ठल कदम, अनिल जाधव, मनिषा जाधव, अंकुश कदम ही आजची लिहिती मंडळी म्हणजे आबांच्या चळवळीची फलश्रृती होय.

आबा नसते तर...यावेळी शेवरे यांच्या सहवासात वाढलेल्या कवी राजेश आणि किशोर कदम यांनी आबांमुळेच आम्ही चळवळीकडे ओढले गेलो आणि लिहूही लागलो. त्यांच्या सहवासात आलो नसतो तर आमचा इथवरचा प्रवासच होऊ शकला नसता अशी सहृदयी भावना व्यक्त केली. 

टॅग्स :literatureसाहित्यkonkanकोकण