शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

शिवजयंतीला दांडी मारणारे शिक्षक अडचणीत, पगार कापण्याचे बीडीओंचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 16:02 IST

मालवण पंचायत समिती सभेत शिवजयंती साजरी करण्याच्या सूचना ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळांना देण्यात आले होते. मात्र बहुतांशी शाळांमध्ये शिवजयंती कार्यक्रमासाठी शिक्षकांनीच दांडी मारल्याची धक्कादायक माहिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी सभागृहात दिली.

ठळक मुद्देशिवजयंतीला दांडी मारणारे शिक्षक अडचणीत, पगार कापण्याचे बीडीओंचे आदेशपंचायत समिती मासिक सभेत माहिती

सिंधुदुर्ग : मालवण पंचायत समिती सभेत शिवजयंती साजरी करण्याच्या सूचना ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळांना देण्यात आले होते. मात्र बहुतांशी शाळांमध्ये शिवजयंती कार्यक्रमासाठी शिक्षकांनीच दांडी मारल्याची धक्कादायक माहिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी सभागृहात दिली.

याबाबत गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेताना शिवजयंती कार्यक्रमास अनुपस्थित राहणाऱ्या संबंधित शिक्षकांचा त्या दिवशीचा पगार काढू नका, अशा सूचना शिक्षण विभागाला दिल्या.दरम्यान, शिरवंडे प्रशालेत शिवजयंती साजरी करण्यासाठी मुख्याध्यापिके व्यतिरिक्त अन्य शिक्षक उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवजयंती कार्यक्रमही १५ मिनिटात गुंडाळण्यात आला. शिवजयंतीला दांडी मारणाऱ्या त्या शिक्षकांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी घाडीगांवकर यांनी सांगितले. याबाबत शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांचा अहवाल बनवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.मालवण पंचायत समितीची मासिक सभा गुरुवारी सभापती सोनाली कोदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, उपसभापती अशोक बागवे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, विनोद आळवे, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, सुनील घाडीगांवकर, मनीषा वराडकर, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, सागरिका लाड, गायत्री ठाकूर यांच्यासह विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या श्याम चव्हाण यांचे सभापती कोदे व बागवे यांनी स्वागत केले. तर मालवण तालुक्यात नरेगा अंतर्गत ३ कोटी ५७ लाखाचा निधी खर्ची घालण्यात आला असून जिल्ह्यात मालवण तालुका अग्रक्रमावर आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी पराडकर यांनी दिली.ठेकेदाराकडून काजू पिकाचे नुकसानसध्या काजू पिकाचा हंगाम सुरू असताना वीज वितरणच्या ठेकेदाराकडून श्रावण परिसरातील ग्रामस्थांना विश्वासात न घेता काजूच्या झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात तोडल्या जात आहे. काजू पिकाचा हंगाम संपल्यानंतर फांद्या तोडण्यास काही हरकत नसताना ठेकेदाराकडून मनमानी सुरू असल्याचे राजू परुळेकर यांनी सांगितले. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराकडून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान वसूल करून द्यावे, अशी सूचना मांडली.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग