शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
2
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
3
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
4
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
5
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
6
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
7
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
8
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
9
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
10
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
11
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
12
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
13
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
14
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
15
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
16
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
17
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
18
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
19
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीला दांडी मारणारे शिक्षक अडचणीत, पगार कापण्याचे बीडीओंचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 16:02 IST

मालवण पंचायत समिती सभेत शिवजयंती साजरी करण्याच्या सूचना ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळांना देण्यात आले होते. मात्र बहुतांशी शाळांमध्ये शिवजयंती कार्यक्रमासाठी शिक्षकांनीच दांडी मारल्याची धक्कादायक माहिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी सभागृहात दिली.

ठळक मुद्देशिवजयंतीला दांडी मारणारे शिक्षक अडचणीत, पगार कापण्याचे बीडीओंचे आदेशपंचायत समिती मासिक सभेत माहिती

सिंधुदुर्ग : मालवण पंचायत समिती सभेत शिवजयंती साजरी करण्याच्या सूचना ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळांना देण्यात आले होते. मात्र बहुतांशी शाळांमध्ये शिवजयंती कार्यक्रमासाठी शिक्षकांनीच दांडी मारल्याची धक्कादायक माहिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी सभागृहात दिली.

याबाबत गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेताना शिवजयंती कार्यक्रमास अनुपस्थित राहणाऱ्या संबंधित शिक्षकांचा त्या दिवशीचा पगार काढू नका, अशा सूचना शिक्षण विभागाला दिल्या.दरम्यान, शिरवंडे प्रशालेत शिवजयंती साजरी करण्यासाठी मुख्याध्यापिके व्यतिरिक्त अन्य शिक्षक उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवजयंती कार्यक्रमही १५ मिनिटात गुंडाळण्यात आला. शिवजयंतीला दांडी मारणाऱ्या त्या शिक्षकांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी घाडीगांवकर यांनी सांगितले. याबाबत शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांचा अहवाल बनवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.मालवण पंचायत समितीची मासिक सभा गुरुवारी सभापती सोनाली कोदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, उपसभापती अशोक बागवे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, विनोद आळवे, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, सुनील घाडीगांवकर, मनीषा वराडकर, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, सागरिका लाड, गायत्री ठाकूर यांच्यासह विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या श्याम चव्हाण यांचे सभापती कोदे व बागवे यांनी स्वागत केले. तर मालवण तालुक्यात नरेगा अंतर्गत ३ कोटी ५७ लाखाचा निधी खर्ची घालण्यात आला असून जिल्ह्यात मालवण तालुका अग्रक्रमावर आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी पराडकर यांनी दिली.ठेकेदाराकडून काजू पिकाचे नुकसानसध्या काजू पिकाचा हंगाम सुरू असताना वीज वितरणच्या ठेकेदाराकडून श्रावण परिसरातील ग्रामस्थांना विश्वासात न घेता काजूच्या झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात तोडल्या जात आहे. काजू पिकाचा हंगाम संपल्यानंतर फांद्या तोडण्यास काही हरकत नसताना ठेकेदाराकडून मनमानी सुरू असल्याचे राजू परुळेकर यांनी सांगितले. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराकडून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान वसूल करून द्यावे, अशी सूचना मांडली.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग